शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
3
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
4
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
5
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
6
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
7
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
8
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
9
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
10
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
11
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
12
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
13
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
14
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
15
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
16
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
17
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
18
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
19
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
20
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती

आनंददायी शिक्षण देणारी शाळा

By admin | Updated: June 30, 2017 01:12 IST

अभिमानास्पद : ‘शिष्यवृत्तीतील यशामुळे महापालिका शाळा राज्याच्या नकाशावर

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पटसंख्या आणि शिक्षणाच्या दर्जामुळे महापालिकेच्या शाळांवर वारंवार टीका होत असते. मात्र, हा दृष्टिकोन फोल ठरवत टेंबलाईवाडी विद्यालय शाळा क्रं. ३३ या शाळेतील वर्धन माळीने पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावून महानगरपालिकेतील शैक्षणिक गुणवत्तेची पोहोचपावती राज्याला दिली आहे. महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण सुमार दर्जाचे मिळते असा गैरसमज असल्याने पालकांचा खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी ओढा असतो. त्यामुळेच महानगरपालिकेच्या शाळेत मोफत शिक्षण असूनसुद्धा कष्टकरी वर्गातील पालकही आपल्या पाल्यांना खासगी शाळांतून शिक्षण देण्यास प्राध्यान्य देऊ लागला आहे. मात्र, या सर्वांना मतांना छेद देत टेंबलाईवाडी विद्यालय या शाळांतील शिक्षकांच्या अथक परिश्रमातून व अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांवर भर दिल्याने शिष्यवृत्ती परीक्षेतील यशामुळे महानगरपालिकेची ही शाळा आता राज्यातील नजरेत अव्वल ठरली आहे. टेंबलाई विद्यालयात बहुतांशी विद्यार्थी हे सामान्य कुटुंबांतील व ग्रामीण भागातील असल्याने त्यांना ज्ञानार्जनाबरोबर आनंददायी शिक्षणासाठी येथील शिक्षकांनी प्राध्यान्य देण्यास सुरुवात केली. शाळेत भौतिक सोयी-सुविधा निर्माण करतानाच ज्ञान घेण्यासाठी पूरक वातावरणनिर्मिती केली. महानगरपालिकेच्या शाळांविषयी जनसामान्यांच्या दृष्टिकोन बदलायचा असेल तर परिवर्तन महत्त्वाचे, हा विचार येथील शिक्षकांनी जाणला आणि मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक, शिपाई कामाला लागले आणि अवघ्या काही वर्षांत या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले. शाळेला भव्य क्रीडांगण, त्यामुळे क्रीडा स्पर्धांतूनही शाळा मागे नाही. या सर्व गोष्टींमुळे महानगरपालिकेच्या या शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. काही पालकांनी इंग्रजी माध्यमातील खासगी शाळेतून काढून या शाळेत दाखल केले. त्यामुळे या शाळेची ६०० विद्यार्थ्यांची क्षमता असतानासुद्धा ७१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पहिले ते चौथीच्या तीन तुकड्या झाल्या आहेत. पटसंख्या वाढविण्यासह गुणवत्ता वाढविण्याकडे येथील शिक्षक काम करत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते. सुविधांकडे लक्षदेणे गरजेचे दर्जेदार शिक्षण मिळत असल्यामुळेच शाळेची क्षमता ६०० असताना शाळेत ७१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे येथील वर्ग खोल्या व अन्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. शाळेतील वर्गखोल्यांसह, बेंच आणि इमारतीची डागडुजी करणे गरजे आहे. या प्राथमिक सुविधा पुरविण्याकडे महानगरपालिकेसह व दानशूर व्यक्तींनी मदत केल्यास नक्कीच सामान्य कुटुंबीतील मुले आणखीन उभारी घेऊ शकतात. यशाचे गमक....शाळेतील शिक्षिका पुष्पा गायकवाड यांनी गेली वर्षभर एकही सुटी न घेता, मुलांना अभ्यासाची गोडी लावून शिष्यवृत्तीच्या अभ्यास मुलांच्याकडून करून घेतला. शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम येण्यासह राज्याच्या यादीत चौघे आणि जिल्ह्णाच्या गुणवत्ता यादीत सहाजण आले आहेत. दररोज सकाळी ९.३० ते ११ व सायंकाळी ५ ते ६, शनिवारी ११ ते २, रविवार सकाळी १० ते ५ या वेळेत त्या शिष्यवृत्तीचा अभ्यास घेत. घोंकपट्टीपेक्षा मुले स्वत: अभ्यास कसा करतील यावर त्यांनी भर दिला. त्यासोबत आत्मविश्वास वाढविणारे विविध पुस्तकांतील मुद्दे त्या मुलांना सांगत असल्याने या मुलांचाही आत्मविश्वास वाढल्याचे गायकवाड यांनी सांगितले. अर्धवट शिक्षण सोडण्याचे प्रमाण कमी शाळेची स्थापना १९५३ मध्ये झाली आहे. पहिली ते सातवी इयत्ता असणाऱ्या या शाळेमध्ये सन २००८ मध्ये सेमी इंग्रजी अभ्यासक्रम सुरू करण्यात आली. यावेळी डिसेंबर- जानेवारीमध्ये शाळेतील शिक्षक आसपासच्या बालवाडी, अंगणवाडी येथे जाऊन मुलांची यादी घेऊन येत नंतर शिक्षकांचे गट करून येथील परिसरात जाऊन शाळेच्या उपक्रमांची माहिती देण्याचे काम करतात. शाळेत शासनाचा मोफत शिक्षणांच्या सर्व सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जातात, तसेच गरीब विद्यार्थ्यांची संमेलन फी, सहल फी किंवा त्यांना शिक्षणासाठी काही गरज लागल्यास येथील शिक्षक पुढाकार घेत असल्याने अर्धवट शिक्षण सोडण्याचे प्रमाण येथे कमी आहे.