शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

आनंददायी शिक्षण देणारी शाळा

By admin | Updated: June 30, 2017 01:12 IST

अभिमानास्पद : ‘शिष्यवृत्तीतील यशामुळे महापालिका शाळा राज्याच्या नकाशावर

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पटसंख्या आणि शिक्षणाच्या दर्जामुळे महापालिकेच्या शाळांवर वारंवार टीका होत असते. मात्र, हा दृष्टिकोन फोल ठरवत टेंबलाईवाडी विद्यालय शाळा क्रं. ३३ या शाळेतील वर्धन माळीने पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावून महानगरपालिकेतील शैक्षणिक गुणवत्तेची पोहोचपावती राज्याला दिली आहे. महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण सुमार दर्जाचे मिळते असा गैरसमज असल्याने पालकांचा खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी ओढा असतो. त्यामुळेच महानगरपालिकेच्या शाळेत मोफत शिक्षण असूनसुद्धा कष्टकरी वर्गातील पालकही आपल्या पाल्यांना खासगी शाळांतून शिक्षण देण्यास प्राध्यान्य देऊ लागला आहे. मात्र, या सर्वांना मतांना छेद देत टेंबलाईवाडी विद्यालय या शाळांतील शिक्षकांच्या अथक परिश्रमातून व अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांवर भर दिल्याने शिष्यवृत्ती परीक्षेतील यशामुळे महानगरपालिकेची ही शाळा आता राज्यातील नजरेत अव्वल ठरली आहे. टेंबलाई विद्यालयात बहुतांशी विद्यार्थी हे सामान्य कुटुंबांतील व ग्रामीण भागातील असल्याने त्यांना ज्ञानार्जनाबरोबर आनंददायी शिक्षणासाठी येथील शिक्षकांनी प्राध्यान्य देण्यास सुरुवात केली. शाळेत भौतिक सोयी-सुविधा निर्माण करतानाच ज्ञान घेण्यासाठी पूरक वातावरणनिर्मिती केली. महानगरपालिकेच्या शाळांविषयी जनसामान्यांच्या दृष्टिकोन बदलायचा असेल तर परिवर्तन महत्त्वाचे, हा विचार येथील शिक्षकांनी जाणला आणि मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक, शिपाई कामाला लागले आणि अवघ्या काही वर्षांत या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले. शाळेला भव्य क्रीडांगण, त्यामुळे क्रीडा स्पर्धांतूनही शाळा मागे नाही. या सर्व गोष्टींमुळे महानगरपालिकेच्या या शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. काही पालकांनी इंग्रजी माध्यमातील खासगी शाळेतून काढून या शाळेत दाखल केले. त्यामुळे या शाळेची ६०० विद्यार्थ्यांची क्षमता असतानासुद्धा ७१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पहिले ते चौथीच्या तीन तुकड्या झाल्या आहेत. पटसंख्या वाढविण्यासह गुणवत्ता वाढविण्याकडे येथील शिक्षक काम करत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते. सुविधांकडे लक्षदेणे गरजेचे दर्जेदार शिक्षण मिळत असल्यामुळेच शाळेची क्षमता ६०० असताना शाळेत ७१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे येथील वर्ग खोल्या व अन्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. शाळेतील वर्गखोल्यांसह, बेंच आणि इमारतीची डागडुजी करणे गरजे आहे. या प्राथमिक सुविधा पुरविण्याकडे महानगरपालिकेसह व दानशूर व्यक्तींनी मदत केल्यास नक्कीच सामान्य कुटुंबीतील मुले आणखीन उभारी घेऊ शकतात. यशाचे गमक....शाळेतील शिक्षिका पुष्पा गायकवाड यांनी गेली वर्षभर एकही सुटी न घेता, मुलांना अभ्यासाची गोडी लावून शिष्यवृत्तीच्या अभ्यास मुलांच्याकडून करून घेतला. शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम येण्यासह राज्याच्या यादीत चौघे आणि जिल्ह्णाच्या गुणवत्ता यादीत सहाजण आले आहेत. दररोज सकाळी ९.३० ते ११ व सायंकाळी ५ ते ६, शनिवारी ११ ते २, रविवार सकाळी १० ते ५ या वेळेत त्या शिष्यवृत्तीचा अभ्यास घेत. घोंकपट्टीपेक्षा मुले स्वत: अभ्यास कसा करतील यावर त्यांनी भर दिला. त्यासोबत आत्मविश्वास वाढविणारे विविध पुस्तकांतील मुद्दे त्या मुलांना सांगत असल्याने या मुलांचाही आत्मविश्वास वाढल्याचे गायकवाड यांनी सांगितले. अर्धवट शिक्षण सोडण्याचे प्रमाण कमी शाळेची स्थापना १९५३ मध्ये झाली आहे. पहिली ते सातवी इयत्ता असणाऱ्या या शाळेमध्ये सन २००८ मध्ये सेमी इंग्रजी अभ्यासक्रम सुरू करण्यात आली. यावेळी डिसेंबर- जानेवारीमध्ये शाळेतील शिक्षक आसपासच्या बालवाडी, अंगणवाडी येथे जाऊन मुलांची यादी घेऊन येत नंतर शिक्षकांचे गट करून येथील परिसरात जाऊन शाळेच्या उपक्रमांची माहिती देण्याचे काम करतात. शाळेत शासनाचा मोफत शिक्षणांच्या सर्व सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जातात, तसेच गरीब विद्यार्थ्यांची संमेलन फी, सहल फी किंवा त्यांना शिक्षणासाठी काही गरज लागल्यास येथील शिक्षक पुढाकार घेत असल्याने अर्धवट शिक्षण सोडण्याचे प्रमाण येथे कमी आहे.