शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

गाडी, बंगल्याचा हव्यास बायकोच्या गळी.. छळाने जातो तिचाच बळी

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: December 29, 2023 12:19 IST

एकीकडे मुली मिळत नाहीत म्हणून अनेक मुलांचे लग्न होत नाहीत. दुसरीकडे मिळालेली पत्नी, सुनेचा हुंड्यासाठी छळ

इंदुमती गणेशकोल्हापूर : नव्या फ्लॅटसाठी माहेराहून पैसे आण, नवी गाडी घेऊन द्यायला सांग, नोकरी लावून द्या, नोकरीसाठी पैसे द्या अशा पुरुषसत्ताक पद्धतीच्या शारीरिक व मानसिक छळांपासून विवाहिता व बालकांचे आयुष्य वाचवायचे असेल तर तिला शिक्षणाने आर्थिक स्वावलंबी बनविणे हाच शाश्वत उपाय आहे. मुलगी सासरी दिली की आपली जबाबदारी संपली, ही पालकांची मानसिकता, सून-पत्नी ही अधिकार गाजविण्यासाठीच असते हा अहंकार आणि आपलं कुणी नाही ही अगतिकता तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरते.गारगोटी येथील विवाहितेने दोन वर्षांच्या बाळासह आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. ही प्रातिनिधिक घटना असली तरी पिढ्यानपिढ्यांपासून समाजात हेच घडत आले आहे. कारणं वेगवेगळी असली तरी विवाहितेचा आणि बालकांचा बळी हेच अंतिम सत्य ठरते. 

शिक्षणाने आर्थिक स्वावलंबी बनवा..

आर्थिक सक्षम असलेल्या स्त्रीमध्ये कोणत्याही प्रसंगाला धाडसाने निभावून नेण्याचा आत्मविश्वास आपसूक येतो. त्यामुळे मुलींना किमान पदवीपर्यंतचे शिक्षण देणे व त्यानंतर नोकरी, व्यवसाय किंवा कलाकौशल्याने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे अत्यंतिक महत्त्वाचे आहे. असे झाले तर पैशासाठी होणारा छळ कमी होईल. छळ झालाच तर ती घराबाहेर पडून स्वत:चे व मुलांचे पालनपोषण करू शकेल इतकी सक्षम राहील.

माहेरचीही तितकीच जबाबदारीएकदा तुझं लग्न करून दिलं ना आाता तू तिथेच जगायचं..तुझा शेवटही तिथेच ही पालकांची मानसिकता मुलींसाठी घातक आहे. आपण न सासरचे ना माहेरचे या टोकाच्या विचारापर्यंत मुली जातात. आधीच वर्षानुवर्षे छळ सोसताना आलेली अगतिकता असह्य झाल्यावर आपल्या पाठीशी कोणी नाही याची जाणीव आत्महत्येला प्रवृत्त करते. त्यामुळे पालकांनी वेळीच दखल घेऊन या त्रासातून बाहेर काढण्यासाठी तिला मदत केली पाहिजे.

समुपदेशक, कायद्याची मदत घ्याछळाला मृत्यू हा अंतिम पर्याय असू शकत नाही. त्यातून सुटका व्हायची असेल तर समुपदेशकांची, महिला तक्रार निवारण कक्षाची, भरोसा सेलसारख्या विभागाची मदत घ्या. समजुतीने किंवा कायद्याच्या धाकाने फरक नाहीच पडला तर वेगळे राहून किमान शांत आयुष्य जगता येते.

मुलगी मिळेपर्यंत पुरेवाट..एकीकडे मुली मिळत नाहीत म्हणून अनेक मुलांचे लग्न होत नाहीत. दुसरीकडे मिळालेली पत्नी, सुनेचा हुंड्यासाठी छळ हाेतो हे दोन टोकाचे विरोधाभास समाजात दिसतात.

स्त्रियांसाठी अनेक कायदे असले तरी समाजाची मानसिकता बदलणे आणि शिक्षणातून आर्थिक स्वावलंबन हाच कायमस्वरुपी उपाय आहे. पत्नी किंवा सून मिळाली हेच खूप महत्त्वाचे आहे. माहेरकडून हुंडा पाहिजेच कशाला, यावर सासरच्या मंडळींचे प्रबोधन झाले पाहिजे. -ॲड. मंजूषा पाटील 

मुलगी किमान २१ वर्षांची झाल्याशिवाय, मुलाच्या कुटुंबीयाची पूर्णत: चौकशी केल्याशिवाय लग्न करू नये. माहेरचे दरवाजे तिच्यासाठी उघडे आहेत याचा विश्वास आणि समान हक्क दिला पाहिजे. पत्नी, सून, आई या भूमिका निभावताना व्यक्ती म्हणून प्रत्येक स्त्रीने स्वतंत्र अस्तित्व जपले पाहिजे. - अनुराधा मेहता, महिला दक्षता समिती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWomenमहिलाDivorceघटस्फोट