शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
3
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
4
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
5
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
6
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
7
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
8
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
9
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
10
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
11
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
12
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
13
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
14
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
15
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
16
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
17
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
18
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
19
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
20
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान

जनतेचा श्रावणबाळ, तीच मला गुलाल लावणार -- हसन मुश्रीफ : रोखठोक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 01:00 IST

माझ्या दारात आलेला माणूस, कधीही त्याला काही मदत झाली नाही म्हणून रिकाम्या हाताने परत गेला नाही. सामान्य जनतेशी ‘श्रावणबाळ’ म्हणून असलेली नाळच पाचव्यांदा विजयाचा गुलाल लावेल, असा विश्वास कागलचे राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार हसन मुश्रीफ यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.

ठळक मुद्दे लोकप्रेम हीच चांगल्या कामाची पोचपावती; माझी लढत शिवसेनेशीच; विजयाचा आत्मविश्वास

विश्र्वास पाटील।कोल्हापूर : सामान्य माणसांच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीकडून असणाऱ्या अपेक्षांची पूर्ती मी केली आहे. या अपेक्षांना कायमच पुरून उरण्याचा प्रयत्न मी केला आहे, असे आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

ते म्हणाले, सकाळी सहा वाजल्यापासून मी लोकांसाठी उपलब्ध असतो. माझा फोन कधीही नॉट रिचेबल नसतो. आपल्या दारात आलेला माणूस कोणत्या राजकीय गटाचा आहे, हे मी कधीच पाहत नाही. प्रश्न घेऊन आलेला माणूस परत जाताना हसत गेला पाहिजे, यासाठी मला जेवढी करता येईल तेवढी मदत मी करतो. ग्रामपंचायतीला सलग दोन वेळा निवडून आला आणि पुन्हा निवडणुकीस उभा राहिला तरी लोकांमध्ये नाराजी असते. कागलच्या जनतेने मला सलग २० वर्षे आमदार केले. त्यांतील १४ वर्षे जनतेच्या आशीर्वादामुळेच मी मंत्री होतो. तरीही मी सहाव्यांदा निवडणुकीस अर्ज भरताना लोकगंगेला महापूर आला. हे लोकप्रेमच माझ्या चांगल्या कामाची पोहोचपावती आहे. त्याच बळावर मला विजयाचा आत्मविश्वास वाटतो.’

गेली निवडणूक मी चार प्रमुख सूत्रांवर लढविली. त्यामध्ये विकास, बेरोजगाऱ्यांच्या हातांना काम, दीनदलित, गरीब लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे व लोकसंपर्क याचा समावेश होता. या चारीही बाबतींत नजरेत भरण्याइतके काम करू शकलो. गावागावांना जोडणारे रस्ते केले, किमान ५०० देवालये बांधली. व्यायामशाळा, दलितवस्ती सुधारणा केली. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमुळे तालुक्यातील शेकडो हातांना रोजगार मिळाला.मुश्रीफ फौंडेशनच्या माध्यमातून गेली १२ वर्षे आम्ही निरंतर राज्य, लोकसेवा परीक्षांचे मोफत प्रशिक्षण देत आहोत. त्यातून अनेक मुलांचे भवितव्य घडले आहे. तालुक्यातील गोरगरीबांच्या आजारपणांमध्ये त्यांच्या हाकेला धावून गेलो आहे.

मुळात कुणी आजारीच पडू नये; परंतु पडलेच तर माझ्याकडे या. त्यांच्यावरील सर्व उपचारांची जबाबदारी मी घेतली आहे. कर्ता पुरुष या वडिलकीच्या नात्याने अडचणीच्या काळात लोकांच्या पाठीशी मी पहाडासारखा उभा राहिलो आहे. त्यामुळेच कुणी कितीही वल्गना केल्या, शड्डू मारले तरी लोक माझ्या पाठीशी असल्याने मला विजयाची खात्री वाटते, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

विजयाच्या दाव्याची कारणे

  • तिरंगी लढतीचा फायदा मला होणार आहे. गेल्या निवडणुकीत मी व स्वर्गीय नेते विक्रमसिंह घाटगे एकत्र होतो. कागलमध्ये आम्हा दोघांचेच प्रबळ गट असतानाही मला कागलमधून फक्त पाच हजारांचे मताधिक्य मिळाले. याचा अर्थ घाटगे गटाची मते त्यावेळी संजय घाटगे यांनाच गेली होती, तरीही मी जिंकलो होतो.
  • या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची एकजूट झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाठबळ आहे. आमदार सतेज पाटील यांनी ‘आमचं ठरलंय’च्या माध्यमातून पाठिंबा दिल्याने त्याचाही फायदा होणार आहे. गडहिंग्लजला जनता दलाचे नेते श्रीपतराव शिंदे यांच्या पाठिंब्यामुळे माझा विजय सोपा झाला आहे.
  • लोकांमध्ये कर्जमाफीत सरकारने फसवणूक केल्याची नाराजी आहे. रेशनिंग नीट मिळत नसल्याने महिलांमध्ये नाराजी आहे. यामुळे सरकारविरोधातील रोष निवडणुकीत व्यक्त होईल.

माझी लढत शिवसेनेच्या उमेदवाराशीच असून विरोधकांमध्ये कोण दुसऱ्या क्रमांकावर, कोण तिस-या क्रमांकावर राहणार यासाठीच स्पर्धा लागली आहे.

 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकkolhapurकोल्हापूर