शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कंबरडे मोडले । कोल्हापूर जिल्ह्यात साडेचार हजार पोल्ट्रीधारक; १५ कोटींची मासिक उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 16:34 IST

नसीम सनदी । कोल्हापूर : कोरोना विषाणूपेक्षा कित्येक पटीने अधिक वेगाने पसरलेल्या अफवेने पोल्ट्री व्यवसायाचे कंबरडेच मोडले आहे. लाखो ...

ठळक मुद्देकोंबडीचा उत्पादन खर्च ७० रुपये येत असताना केवळ १० रुपये किलो या दराने विकावे लागत आहे.आम्ही अक्षरश: रस्त्यावर आलो आहे.

नसीम सनदी ।कोल्हापूर : कोरोना विषाणूपेक्षा कित्येक पटीने अधिक वेगाने पसरलेल्या अफवेने पोल्ट्री व्यवसायाचे कंबरडेच मोडले आहे. लाखो रुपये गुंतवून लखपती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या व्यावसायिकांवर अक्षरश: रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. कर्जाचा डोंगर फेडायचा कसा असा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.

बेरोजगारी आणि बेभरवशाच्या शेतीमुळे अनेक तरुण पोल्ट्री व्यवसायाकडे वळले, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला; पण कोणताही विषाणू आला की त्याचा पहिला बळी पोल्ट्रीच पडत आहे. स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू ही त्याचीच काही अलीकडची उदाहरणे आहेत. जिल्ह्यात ४५०० पोल्ट्रीधारक आहेत. महिन्याची उलाढाल १५ कोटींच्या घरात आहे. गेल्या १५ दिवसांपासून चिकन खाऊच नये असा अप्प्रचार झाल्याने चिकन विक्री आणि मागणी निम्म्यावर आली आहे. दर निम्म्याने कमी झाले आहेत, जिवंत कोंबडी दराने तर कहरच केला आहे. ज्या कोंबडीचा उत्पादन खर्च ७० रुपये येत असताना केवळ १० रुपये किलो या दराने विकावे लागत आहे.

चिकनची मागणीच नसल्याने कोंबड्यांचा उठाव थंडावला आहे. या पक्ष्यांच्या खाण्या-पिण्याचा खर्च अंगावर पडत आहे. हा खर्च मिळणा-या उत्पन्नापेक्षा जास्त होत असल्याने कोंबड्यांच्या आठवडी बाजारात १०० रुपयांना ३ ते ४ याप्रमाणे विकण्याची पाळी पोल्ट्रीधारकांवर आली आहे. काही ठिकाणी तर फुकट विक्री सुरू आहे. आरोग्यमंत्री व राज्य शासनातर्फे चिकनमुळे कोरोना होत नाही, असे वारंवार स्पष्ट केले आहे, तरीदेखील अफवा पसरविणे सुरूच आहे. त्याचा फास पोल्टीधारकांच्या गळ््याला लागला आहे.

नागरिकांचा दुटप्पीपणाचिकन विकत आणायचे म्हटले तर कोरोना विषाणू आहे, असे सांगणारे ते कमी दरात आणि फुकटात मिळत आहे म्हटल्यावर घेऊन खाताना दिसत आहेत. या प्रवृत्तीमुळे मात्र पोल्ट्रीधारक अक्षरश: खड्ड्यात गेले आहेत.शेतकरी संघटनेने कर्जमाफी व नुकसानभरपाईची मागणी केली आहे. होणारे नुकसान मोठे असल्याने ही माफी मिळायला हवी म्हणून स्वाभिमानीने थेट मुख्यमंत्री यांची भेट घेऊन मदतीची मागणी केली आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांनीही हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला आहे.फायदा राहू दे; खर्चही अंगावरएकेक पोल्ट्रीमध्ये ३ ते ८ हजार पक्षी असतात. त्यासाठी १० ते २० लाखांचा खर्च येतो. रोजचा खर्च किमान १५ हजारांचा असतो.कोरोनामुळे फायदा राहू दे, घातलेला खर्चही निघत नसल्याने पोल्ट्री व्यवसाय आतबट्ट्यात आला आहे.

 

आम्ही अक्षरश: रस्त्यावर आलो आहे. ६० दिवसांत कंपनी कोंबड्या घेऊन जात होती; आता ८० दिवस झाले तरी उचल होत नाही. त्यामुळे खाद्यावरचा खर्च दुपटीने वाढला आहे.- विनायक क्षीरसागर, पोल्ट्रीधारक

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbusinessव्यवसायCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस