शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मागासवर्गीय विद्यार्थ्यांची फी परत द्या-गडहिंग्लज पंचायत समिती सभा : विद्याधर गुरबे यांची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 22:32 IST

इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क माफीपोटी शासनाकडून आलेली रक्कम संबंधित पालकांना तातडीने परत देण्याची व्यवस्था करावी,

गडहिंग्लज : इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क माफीपोटी शासनाकडून आलेली रक्कम संबंधित पालकांना तातडीने परत देण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना विद्याधर गुरबे यांनी येथील पंचायत समितीच्या मासिक सभेत केली.

सभापती प्रा. जयश्री तेली यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी विविध खात्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. शिक्षण विभागावरील चर्चेत गुरबे यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काचा मुद्दा उपस्थित केला. त्यासंदर्भात सविस्तर अहवाल देण्याचा आदेश सभापतींनी गटशिक्षण अधिकाºयांना दिला.यावेळी गुरबे म्हणाले, विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची ‘फी’ शासनाने संबंधित शाळांना अदा केली आहे. तरीदेखील काही शाळांनी संबंधित पालकांकडून जबरदस्तीने ‘फी’ वसूल केली आहे. ती संबंधित पालकांना परत देण्याची गरज आहे.

यासंदर्भात दलित महासंघाने मे महिन्यात पंचायत समितीला निवेदन दिले आहे. जूनमध्ये ‘वही फाड..पाटी फोड’ आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी ‘कोंबडा भेट’ देण्याचा इशारा दिला आहे. शासनाकडून आलेल्या शैक्षणिक शुल्क माफीची रक्कम परत मिळावी म्हणून पंचायत समितीच्या दारात आंदोलन ‘होणे’ ही दुर्दैवी बाब आहे. गटशिक्षणाधिकाºयांनी संबंधित शाळांना सदरची रक्कम तातडीने परत देण्याचे आदेश द्यावेत, अशी आग्रही मागणी गुरबे यांनी केली.

केंद्रप्रमुखांच्या १० पैकी आठ जागा रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज चालविणे अडचणीचे होत असून, लवकरच तालुक्यातील संबंधित शाळांकडून माहिती घेऊन अहवाल सादर करीत आहे, अशी ग्वाही गटशिक्षण अधिकारी रमेश कोरवी यांनी दिली.अकरावी विज्ञान केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत अनुदानित तुकड्यांमधील रिक्त जागांवर विनाअनुदानित तुकडीतील विद्यार्थी घेतलेजातात. मात्र, विनाअनुदानित तुकडीत प्रवेश देण्यासाठी त्यांच्याकडून घेतलेली ‘फी’ परत दिली जातनाही, ही अन्यायी बाब आहे. अनुदानित तुकडीत प्रवेश मिळणाºया विनाअनुदानित तुकडीतीलसंबंधित विद्यार्थ्यांची फी परत द्यावी, अशीही मागणी गुरबे यांनी यावेळी केली.

दीक्षित बोळातील पंचायत समिती आवाराच्या संरक्षक भिंतीलगत खोकी बसविण्यासाठी नगरपालिकेने परवानगी दिली आहे. ही बाब चुकीची आहे. नगरपालिकेने बॅ. नाथ पै विद्यालयाच्या संरक्षक भिंतीला लागून ही खोकी बसवावीत, अन्यथा वाचनालय आणि नगरपालिका कार्यालयादरम्यान बसस्थानकापर्यंत जाण्यासाठी जिल्हा परिषदेने दिलेला रस्ता बंद करावा, अशी मागणी विठ्ठल पाटील यांनी केली. तालुका कृषी अधिकारी सभेला गैरहजर राहिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.उपसभापती बनश्री चौगुले यांच्यासह सर्व सदस्य आणि खातेप्रमुख उपस्थित होते. गटविकास अधिकारी सीमा जगताप यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली.

प्रतापराव गुर्जर स्मारकाचा निधी शिल्लकसरसेनापती प्रतापराव गुर्जर स्मारक कमिटीच्या खात्यावर सुमारे पाच लाखांचा निधी शिल्लक आहे. तो जिल्हा परिषदेने परत घ्यावा आणि बांधकाम विभागामार्फत तो त्याच ठिकाणी स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीसाठी खर्च करावा, असा ठराव गुरबे यांनी मांडला. त्यास सभागृहाने एकमताने मंजुरी दिली.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाMONEYपैसाfundsनिधी