शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, ८२ बंधारे पाण्याखाली; ‘राधानगरी’च्या विसर्गाने प्रशासन दक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 16:35 IST

सतर्कता म्हणून जिल्हा प्रशासनाने नागरिकांचे स्थलांतर सुरूच ठेवले आहे 

कोल्हापूर : शहरात आज दुपारपासून पावसाचा जोर कमी असला तरी जिल्ह्यात संततधार सुरुच आहे. धरणपाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाच्या स्वयंचलित दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे भोगावतीसह पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 40ʼ08'' फुटावर गेली आहे. तर ८२ बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सतर्कता म्हणून जिल्हा प्रशासनाने नागरिकांचे स्थलांतर सुरूच ठेवले आहे. आज, गुरुवारी हवामान विभागाने ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे-साताऱ्यातील घाट परिसर, कोल्हापूरचा काही भाग, हिंगोली, यवतमाळ, परभणी आणि लगतच्या भागात येत्या ३, ४ तासात पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात काल, बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर एकदम कमी झाला. दिवसभर अधूनमधून सरी कोसळत होत्या, मात्र पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात एक इंचाने कमी झाली. आज सकाळपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने तसेच ‘राधानगरी’तून विसर्ग सुरु असल्याने नदी पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली. यामुळे शहरासह परिसरातील नागरिकांची धाकधूक वाढली आहे. अचानक पाणी वाढले तर रात्रीच्या वेळी जायचे कोठे? म्हणून नागरिक सावध राहिले आहेत.चार तालुक्यांनी सरासरी ओलांडलीगेल्या वर्षी जून व जुलैमध्ये सरासरी ६२९ मिलीमीटर पाऊस झाला होता. जून कोरडा गेल्याने यंदा सरासरी गाठणार का? असे वाटत असतानाच गेल्या २० दिवसात जोरदार पाऊस कोसळला. आतापर्यंत जून व जुलैमध्ये सरासरी ६०२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.दृष्टिक्षेपात अलमट्टी धरण :पाण्याची आवक : प्रतिसेंकद १ लाख ३८ हजार ४७३ घनफूटजावक : १४ हजार ६९० घनफूटक्षमता : १२३ टीएमसीभरले : ६४ टीएमसीदृष्टिक्षेपात स्थलांतरित कुटुंबे :

एकूण निवारागृहे : ४७८ग्रामीण : ६५ कुटुंबातील ३१९ नागरिक व १२७ जनावरेमहापालिका : १५ कुटुंबातील ५१ नागरिकपडझडीत १६ लाखांचे नुकसानजिल्ह्यात ४४ खासगी मालमत्तांची पडझड झाली असून १६ लाख २ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

प्रमुख धरणातील साठा टक्के व कंसात विसर्ग प्रतिसेकंद घनफूट असा -राधानगरी : १०० (८५४०)वारणा : ८१ ( ९११)कासारी : ७९ (१०००)कडवी : ९० (१८०)कुंभी : ८१ (७००)घटप्रभा : १०० ( ३९९३)जांबरे : १०० (२०२०)कोदे : १०० (१२३१)

  • अलमट्टी विसर्ग : प्रतिसेकंद ७५ हजार घनफूट
  • पूरबाधित गावातील शाळांना सुट्टीच
  • गुरुवारसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट
  • भोगावती नदीवरील बालिंगा पुलावरील वाहतूक पुन्हा सुरु
टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसradhanagari-acराधानगरीDamधरणriverनदी