शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, ८२ बंधारे पाण्याखाली; ‘राधानगरी’च्या विसर्गाने प्रशासन दक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 16:35 IST

सतर्कता म्हणून जिल्हा प्रशासनाने नागरिकांचे स्थलांतर सुरूच ठेवले आहे 

कोल्हापूर : शहरात आज दुपारपासून पावसाचा जोर कमी असला तरी जिल्ह्यात संततधार सुरुच आहे. धरणपाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाच्या स्वयंचलित दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे भोगावतीसह पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 40ʼ08'' फुटावर गेली आहे. तर ८२ बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सतर्कता म्हणून जिल्हा प्रशासनाने नागरिकांचे स्थलांतर सुरूच ठेवले आहे. आज, गुरुवारी हवामान विभागाने ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे-साताऱ्यातील घाट परिसर, कोल्हापूरचा काही भाग, हिंगोली, यवतमाळ, परभणी आणि लगतच्या भागात येत्या ३, ४ तासात पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात काल, बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर एकदम कमी झाला. दिवसभर अधूनमधून सरी कोसळत होत्या, मात्र पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात एक इंचाने कमी झाली. आज सकाळपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने तसेच ‘राधानगरी’तून विसर्ग सुरु असल्याने नदी पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली. यामुळे शहरासह परिसरातील नागरिकांची धाकधूक वाढली आहे. अचानक पाणी वाढले तर रात्रीच्या वेळी जायचे कोठे? म्हणून नागरिक सावध राहिले आहेत.चार तालुक्यांनी सरासरी ओलांडलीगेल्या वर्षी जून व जुलैमध्ये सरासरी ६२९ मिलीमीटर पाऊस झाला होता. जून कोरडा गेल्याने यंदा सरासरी गाठणार का? असे वाटत असतानाच गेल्या २० दिवसात जोरदार पाऊस कोसळला. आतापर्यंत जून व जुलैमध्ये सरासरी ६०२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.दृष्टिक्षेपात अलमट्टी धरण :पाण्याची आवक : प्रतिसेंकद १ लाख ३८ हजार ४७३ घनफूटजावक : १४ हजार ६९० घनफूटक्षमता : १२३ टीएमसीभरले : ६४ टीएमसीदृष्टिक्षेपात स्थलांतरित कुटुंबे :

एकूण निवारागृहे : ४७८ग्रामीण : ६५ कुटुंबातील ३१९ नागरिक व १२७ जनावरेमहापालिका : १५ कुटुंबातील ५१ नागरिकपडझडीत १६ लाखांचे नुकसानजिल्ह्यात ४४ खासगी मालमत्तांची पडझड झाली असून १६ लाख २ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

प्रमुख धरणातील साठा टक्के व कंसात विसर्ग प्रतिसेकंद घनफूट असा -राधानगरी : १०० (८५४०)वारणा : ८१ ( ९११)कासारी : ७९ (१०००)कडवी : ९० (१८०)कुंभी : ८१ (७००)घटप्रभा : १०० ( ३९९३)जांबरे : १०० (२०२०)कोदे : १०० (१२३१)

  • अलमट्टी विसर्ग : प्रतिसेकंद ७५ हजार घनफूट
  • पूरबाधित गावातील शाळांना सुट्टीच
  • गुरुवारसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट
  • भोगावती नदीवरील बालिंगा पुलावरील वाहतूक पुन्हा सुरु
टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसradhanagari-acराधानगरीDamधरणriverनदी