शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

कोल्हापुरातील पंचगंगा नदी धोका पातळीकडे, नदीकाठच्या गावांचे स्थलांतर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 12:30 IST

धरण क्षेत्रात धुवाधार, तीन दिवस ‘यलो’ अलर्ट

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर संततधार, तर धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे. नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून रविवारी रात्री उशिरा पंचगंगेने इशारा पातळी (३९ फूट) ओलांडून धोका (४३ फूट) पातळीकडे आगेकूच सुरू ठेवली आहे. नदीकाठच्या आंबेवाडी, प्रयाग चिखली आदी गावांचे स्थलांतर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. हवामान विभागाने आगामी तीन दिवस ‘यलो’ अलर्ट दिल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.शनिवारपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा व चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात तब्बल १०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. संततधार सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. अलमट्टीमधून विसर्ग वाढवल्याने पंचगंगा नदीच्या पातळीत हळूहळू वाढ होत आहे. तरीही रविवारी रात्री उशिरा ३९ फुटांच्या वर गेल्याने पाडळी बु्द्रूक, आंबेवाडी, प्रयाग चिखली आदी नदी गावांचे स्थलांतर सुरू केले आहे.

रेड अलर्ट; पण पाऊस जेमतेमचभारतीय हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी रविवारी रेड अलर्ट दिला होता. मात्र, प्रत्यक्षात पाऊस जेमतेमच होता.

धामणी परिसरातील गावांना बेटाचे स्वरूपगोठे, आकुर्डे, तांदुळवाडी, पणुत्रे, निवाचीवाडी, गवशी, हारपवडे या धामणी खोऱ्यातील गावांना पुराच्या पाण्यामुळे बेटाचे स्वरूप आले आहे.

एसटीचे नऊ मार्ग पूर्णपणे बंदएसटी महामंडळाच्या बसची नऊ मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. इतर ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.

जिल्ह्यातील २५ मार्गांवरील वाहतूक ठप्पजिल्ह्यातील इतर जिल्हा मार्ग ११, तर ग्रामीण मार्ग १४, अशा २५ मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. त्याशिवाय सहा राज्य मार्गही पाण्याखाली गेले आहेत.

पंचगंगेचे पाणी गायकवाड वाड्यापर्यंतपंचगंगेचे पाणी रविवारी दुपारी गायकवाड वाड्याजवळ पोहोचले आहे. त्यामुळे गंगावेश ते शिवाजी पुलापर्यंतची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

‘राधानगरी’ ८५; ‘वारणा’ ७४ टक्के भरले‘राधानगरी’ धरण ८५ टक्के भरले असून, त्यातून प्रतिसेकंद १४०० घनफूट पाणी वीजनिर्मितीसाठी सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर वारणा धरण ७४ टक्के भरले असून, त्यातून ९१६, कासारीमधून ५००, घटप्रभामधून ३९९३, तर कोदे धरणातून १६९६ घनफूट पाणी सोडण्यात आल्याने नद्यांची पातळी वाढत आहे. ‘राधानगरी’ पूर्ण क्षमतेने भरले तर महापुराचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदीfloodपूर