शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

कोल्हापुरातील पंचगंगा नदी धोका पातळीकडे, नदीकाठच्या गावांचे स्थलांतर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 12:30 IST

धरण क्षेत्रात धुवाधार, तीन दिवस ‘यलो’ अलर्ट

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर संततधार, तर धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे. नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून रविवारी रात्री उशिरा पंचगंगेने इशारा पातळी (३९ फूट) ओलांडून धोका (४३ फूट) पातळीकडे आगेकूच सुरू ठेवली आहे. नदीकाठच्या आंबेवाडी, प्रयाग चिखली आदी गावांचे स्थलांतर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. हवामान विभागाने आगामी तीन दिवस ‘यलो’ अलर्ट दिल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.शनिवारपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा व चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात तब्बल १०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. संततधार सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. अलमट्टीमधून विसर्ग वाढवल्याने पंचगंगा नदीच्या पातळीत हळूहळू वाढ होत आहे. तरीही रविवारी रात्री उशिरा ३९ फुटांच्या वर गेल्याने पाडळी बु्द्रूक, आंबेवाडी, प्रयाग चिखली आदी नदी गावांचे स्थलांतर सुरू केले आहे.

रेड अलर्ट; पण पाऊस जेमतेमचभारतीय हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी रविवारी रेड अलर्ट दिला होता. मात्र, प्रत्यक्षात पाऊस जेमतेमच होता.

धामणी परिसरातील गावांना बेटाचे स्वरूपगोठे, आकुर्डे, तांदुळवाडी, पणुत्रे, निवाचीवाडी, गवशी, हारपवडे या धामणी खोऱ्यातील गावांना पुराच्या पाण्यामुळे बेटाचे स्वरूप आले आहे.

एसटीचे नऊ मार्ग पूर्णपणे बंदएसटी महामंडळाच्या बसची नऊ मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. इतर ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.

जिल्ह्यातील २५ मार्गांवरील वाहतूक ठप्पजिल्ह्यातील इतर जिल्हा मार्ग ११, तर ग्रामीण मार्ग १४, अशा २५ मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. त्याशिवाय सहा राज्य मार्गही पाण्याखाली गेले आहेत.

पंचगंगेचे पाणी गायकवाड वाड्यापर्यंतपंचगंगेचे पाणी रविवारी दुपारी गायकवाड वाड्याजवळ पोहोचले आहे. त्यामुळे गंगावेश ते शिवाजी पुलापर्यंतची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

‘राधानगरी’ ८५; ‘वारणा’ ७४ टक्के भरले‘राधानगरी’ धरण ८५ टक्के भरले असून, त्यातून प्रतिसेकंद १४०० घनफूट पाणी वीजनिर्मितीसाठी सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर वारणा धरण ७४ टक्के भरले असून, त्यातून ९१६, कासारीमधून ५००, घटप्रभामधून ३९९३, तर कोदे धरणातून १६९६ घनफूट पाणी सोडण्यात आल्याने नद्यांची पातळी वाढत आहे. ‘राधानगरी’ पूर्ण क्षमतेने भरले तर महापुराचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदीfloodपूर