शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
4
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
5
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
6
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
7
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
8
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
9
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
10
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
11
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
12
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
13
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
14
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
15
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
16
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
17
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
18
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
19
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
20
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर

कोल्हापुरातील पंचगंगा नदी धोका पातळीकडे, नदीकाठच्या गावांचे स्थलांतर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 12:30 IST

धरण क्षेत्रात धुवाधार, तीन दिवस ‘यलो’ अलर्ट

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर संततधार, तर धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे. नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून रविवारी रात्री उशिरा पंचगंगेने इशारा पातळी (३९ फूट) ओलांडून धोका (४३ फूट) पातळीकडे आगेकूच सुरू ठेवली आहे. नदीकाठच्या आंबेवाडी, प्रयाग चिखली आदी गावांचे स्थलांतर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. हवामान विभागाने आगामी तीन दिवस ‘यलो’ अलर्ट दिल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.शनिवारपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा व चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात तब्बल १०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. संततधार सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. अलमट्टीमधून विसर्ग वाढवल्याने पंचगंगा नदीच्या पातळीत हळूहळू वाढ होत आहे. तरीही रविवारी रात्री उशिरा ३९ फुटांच्या वर गेल्याने पाडळी बु्द्रूक, आंबेवाडी, प्रयाग चिखली आदी नदी गावांचे स्थलांतर सुरू केले आहे.

रेड अलर्ट; पण पाऊस जेमतेमचभारतीय हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी रविवारी रेड अलर्ट दिला होता. मात्र, प्रत्यक्षात पाऊस जेमतेमच होता.

धामणी परिसरातील गावांना बेटाचे स्वरूपगोठे, आकुर्डे, तांदुळवाडी, पणुत्रे, निवाचीवाडी, गवशी, हारपवडे या धामणी खोऱ्यातील गावांना पुराच्या पाण्यामुळे बेटाचे स्वरूप आले आहे.

एसटीचे नऊ मार्ग पूर्णपणे बंदएसटी महामंडळाच्या बसची नऊ मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. इतर ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.

जिल्ह्यातील २५ मार्गांवरील वाहतूक ठप्पजिल्ह्यातील इतर जिल्हा मार्ग ११, तर ग्रामीण मार्ग १४, अशा २५ मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. त्याशिवाय सहा राज्य मार्गही पाण्याखाली गेले आहेत.

पंचगंगेचे पाणी गायकवाड वाड्यापर्यंतपंचगंगेचे पाणी रविवारी दुपारी गायकवाड वाड्याजवळ पोहोचले आहे. त्यामुळे गंगावेश ते शिवाजी पुलापर्यंतची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

‘राधानगरी’ ८५; ‘वारणा’ ७४ टक्के भरले‘राधानगरी’ धरण ८५ टक्के भरले असून, त्यातून प्रतिसेकंद १४०० घनफूट पाणी वीजनिर्मितीसाठी सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर वारणा धरण ७४ टक्के भरले असून, त्यातून ९१६, कासारीमधून ५००, घटप्रभामधून ३९९३, तर कोदे धरणातून १६९६ घनफूट पाणी सोडण्यात आल्याने नद्यांची पातळी वाढत आहे. ‘राधानगरी’ पूर्ण क्षमतेने भरले तर महापुराचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदीfloodपूर