शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पंचगंगा प्रदुषणाचा फटका, मच्छिमारांची जाळी अन् झोळी रिकामी; लाखो रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 12:13 IST

मोठ्या प्रमाणावर मासे मेल्यामुळे मच्छिमारांच्या मिळकतीचाही प्रश्न

समीर देशपांडे

कोल्हापूर : पंचगंगा ही रसायनगंगा झाल्यामुळे केवळ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अशातील भाग नाही. तर त्यामुळे अन्य प्रश्नही निर्माण झाले आहेत. कधी नव्हे ते यंदा मोठ्या प्रमाणावर मासे मेल्यामुळे मच्छिमारांच्या मिळकतीचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचा यंदाचा हंगामच वाया गेला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

वसगडे एक नंबर पंप ते रुई धरणापर्यंत भादोले मच्छिमार सोसायटीच्या सभासदांना मासे गोळा करण्यासाठी परवानगी आहे. यामधील बहुसंख्य मच्छिमार हे रुकडी गावातील आहेत. ५० जण या हंगामामध्ये मासे गोळा करून त्याची विक्री करतात. प्रत्येकाला किमात हजार,पंधराशेहे रुपये मिळतात. यात कधी कमी जास्त फरकही पडतो. तीन महिने हे काम चालते.

याच पट्ट्यात पंचगंगा रसायनयुक्त झाल्याने मासे मेले आणि त्याचा थेट फटका या सर्वांना बसणार आहे. प्रत्येकाचे किमान या हंगामातील पन्नास हजारांपासून लाख रुपयांपर्यंतचे नुकसान झाले आहे. दोन महिने घरात बसून काढण्याची वेळ आता या मच्छिमारांवर येणार आहे.

कारण ज्या पद्धतीने हे मासे मरून पडले आहेत. ते पाहता या परिसरातील ग्रामस्थांनी मासे विकत घेणे बंद केले आहे. मुळात या पट्ट्यात आता नव्याने माशांची पैदास होणार कधी, रसायनयुक्त पाणी खाली जाणार कधी असे अनेक प्रश्न या मच्छिमारांसमोर आहेत.

जाळ्या झाल्या तेलकट

यातूनही काही मच्छिमारांनी काही जिवंत मासे आहेत का, हे पाहण्यासाठी जाळ्या लावल्या होत्या. परंतू मेलेल्या माशांच्या तेलामुळे या जाळ्याच तेलकट होऊन बाहेर येत आहेत. त्यामुळे हा प्रयत्नही थांबवण्यात आला आहे.

पंचगंगेच्या प्रदूषणामुळे मासे मेले. परंतू त्याचा मोठा आर्थिक फटका आम्हांला बसला आहे. दरवर्षी आम्ही सर्वजण लाखो रुपयांचे मासे विकतो. परंतू ऐन हंगामातच मासे मेल्यामुळे आता दोन महिने घरात बसून काढण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नाही. शासनाच्या दुर्लक्षामुळे प्रदूषण झाले. मासे मेले. आता आम्हांला किमान नुकसानभरपाई तरी मिळावी अशी आमची मागणी आहे. -रमेश बागडी, मच्छिमार, रुकडी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषणFishermanमच्छीमार