शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
3
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
4
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
5
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
6
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
7
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
8
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
9
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
10
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
11
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
12
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
13
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
14
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
15
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
16
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
17
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
18
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
19
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी अंबाबाईला साकडे, ‘संगम ते उगम’ पायी यात्रा कोल्हापुरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 16:24 IST

कुरुंदवाड ते प्रयाग चिखली अशी ‘संगम ते उगम’ निघालेली पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठीची पायी जागर यात्रा नदीकाठावरील १३ गावांतून ७२ किलोमीटरचा प्रवास करून रविवारी कोल्हापुरात दाखल झाली. सकाळी आमदार उल्हास पाटील, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या नेतृत्वाखाली हजारभर कार्यकर्त्यांनी मंदिरात जाऊन अंबाबाईला प्रदूषणमुक्तीसाठी साकडे घातले.

ठळक मुद्देपंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी अंबाबाईला साकडे‘संगम ते उगम’ पायी यात्रा कोल्हापुरात दाखल

कोल्हापूर : कुरुंदवाड ते प्रयाग चिखली अशी ‘संगम ते उगम’ निघालेली पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठीची पायी जागर यात्रा नदीकाठावरील १३ गावांतून ७२ किलोमीटरचा प्रवास करून रविवारी कोल्हापुरात दाखल झाली. सकाळी आमदार उल्हास पाटील, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या नेतृत्वाखाली हजारभर कार्यकर्त्यांनी मंदिरात जाऊन अंबाबाईला प्रदूषणमुक्तीसाठी साकडे घातले.रविवारी रात्री पंचगंगेचे उगमस्थान असलेल्या प्रयाग चिखली येथील दत्त मंदिरात या यात्रेची सांगता होणार असून, तेथेच मुक्काम होणार आहे. आज, सोमवारी तेथून निघून दसरा चौकात जमून ११ वाजता जाहीर सभा होणार आहे. येथे स्वत: डॉ. मुळीक, आमदार उल्हास पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेश क्षीरसागर सभेला मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देऊन प्रदूषणमुक्तीसाठी कराव्या लागणाºया उपाययोजनांच्या संदर्भात चर्चा करणार आहेत.भूमाता संघटनेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून संघटनेचे डॉ. बुधाजीराव मुळीक व आमदार उल्हास पाटील यांनी पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी पायी जागर यात्रा सुरू केली आहे. शुक्रवार (दि. ४)पासून सुरू झालेली ही यात्रा कुरुंदवाड येथील घाटावरील संताजी घोरपडे समाधीस्थळावर पाणी पूजनाने झाली. कुरुंदवाड, नृसिंहवाडी, भैरववाडी, इचलकरंजी असा पहिल्या दिवशी प्रवास झाला.

दुसऱ्या दिवशी चंदूर, रुई, माणगाव, रुकडी, वळीवडे अशा मार्गावर प्रबोधनाचा जागर झाला. तिसऱ्या दिवशी गांधीनगरातून तावडे हॉटेलमार्गे ही यात्रा कोल्हापुरात दाखल झाली. कोल्हापुरात आल्यानंतर अंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेत देवीला साकडे घालण्यात आले. त्यानंतर ही रॅली प्रयाग चिखलीकडे मार्गस्थ झाली. रविवारी तेथे वस्ती करून सोमवारी ती दसरा चौकात परतणार आहे. तेथे दुपारी १२ च्या सुमारास जाहीर सभा होणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणारचार दिवसांच्या या पायी यात्रेत पंचगंगेला प्रदूषणापासून मुक्ती देण्याचा नारा देत, त्या दिशेने ठोस पावले उचलण्याची मानसिकता लोकांमध्ये तयार करण्याचा प्रयत्न झाला. आता या चार दिवसांत नदीकाठावरून येताना नदीतील जे दृश्य दिसले त्यावर आता शासनस्तरावर कोणत्या उपाययोजना कराव्या लागणार, याबाबतीत आता शासनपातळीवर पाठपुरावा करण्याचे आयोजकांचे धोरण आहे. त्याुनसार प्राथमिक टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. 

नदी वाचवण्याची जाणीव प्रकटचार दिवसांच्या या पायी यात्रेत नदीकाठावरील १२ गावांतील ५0 हजार लोक सहभागी झाले. जवळपास २४ हजार शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून प्रदूषणमुक्तीच्या जागरात सहभाग घेतला. ही यात्रा ज्या-ज्या गावांतून गेली, तेथील स्थानिक ग्रामस्थांसह लोकप्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रबोधनाचे विचार ऐकतानाच कार्यकर्त्यांची जेवण-खाण्याची आणि निवासाच्या व्यवस्थेसह संपूर्ण यंत्रणा राबली. यातून एकीचा संदेश तर दिसलाच, शिवाय आपली नदी आपण वाचवायला पाहिजे, ही जाणीवही दिसली. 

 

टॅग्स :environmentवातावरणpollutionप्रदूषणkolhapurकोल्हापूर