शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी अंबाबाईला साकडे, ‘संगम ते उगम’ पायी यात्रा कोल्हापुरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 16:24 IST

कुरुंदवाड ते प्रयाग चिखली अशी ‘संगम ते उगम’ निघालेली पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठीची पायी जागर यात्रा नदीकाठावरील १३ गावांतून ७२ किलोमीटरचा प्रवास करून रविवारी कोल्हापुरात दाखल झाली. सकाळी आमदार उल्हास पाटील, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या नेतृत्वाखाली हजारभर कार्यकर्त्यांनी मंदिरात जाऊन अंबाबाईला प्रदूषणमुक्तीसाठी साकडे घातले.

ठळक मुद्देपंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी अंबाबाईला साकडे‘संगम ते उगम’ पायी यात्रा कोल्हापुरात दाखल

कोल्हापूर : कुरुंदवाड ते प्रयाग चिखली अशी ‘संगम ते उगम’ निघालेली पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठीची पायी जागर यात्रा नदीकाठावरील १३ गावांतून ७२ किलोमीटरचा प्रवास करून रविवारी कोल्हापुरात दाखल झाली. सकाळी आमदार उल्हास पाटील, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या नेतृत्वाखाली हजारभर कार्यकर्त्यांनी मंदिरात जाऊन अंबाबाईला प्रदूषणमुक्तीसाठी साकडे घातले.रविवारी रात्री पंचगंगेचे उगमस्थान असलेल्या प्रयाग चिखली येथील दत्त मंदिरात या यात्रेची सांगता होणार असून, तेथेच मुक्काम होणार आहे. आज, सोमवारी तेथून निघून दसरा चौकात जमून ११ वाजता जाहीर सभा होणार आहे. येथे स्वत: डॉ. मुळीक, आमदार उल्हास पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेश क्षीरसागर सभेला मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देऊन प्रदूषणमुक्तीसाठी कराव्या लागणाºया उपाययोजनांच्या संदर्भात चर्चा करणार आहेत.भूमाता संघटनेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून संघटनेचे डॉ. बुधाजीराव मुळीक व आमदार उल्हास पाटील यांनी पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी पायी जागर यात्रा सुरू केली आहे. शुक्रवार (दि. ४)पासून सुरू झालेली ही यात्रा कुरुंदवाड येथील घाटावरील संताजी घोरपडे समाधीस्थळावर पाणी पूजनाने झाली. कुरुंदवाड, नृसिंहवाडी, भैरववाडी, इचलकरंजी असा पहिल्या दिवशी प्रवास झाला.

दुसऱ्या दिवशी चंदूर, रुई, माणगाव, रुकडी, वळीवडे अशा मार्गावर प्रबोधनाचा जागर झाला. तिसऱ्या दिवशी गांधीनगरातून तावडे हॉटेलमार्गे ही यात्रा कोल्हापुरात दाखल झाली. कोल्हापुरात आल्यानंतर अंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेत देवीला साकडे घालण्यात आले. त्यानंतर ही रॅली प्रयाग चिखलीकडे मार्गस्थ झाली. रविवारी तेथे वस्ती करून सोमवारी ती दसरा चौकात परतणार आहे. तेथे दुपारी १२ च्या सुमारास जाहीर सभा होणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणारचार दिवसांच्या या पायी यात्रेत पंचगंगेला प्रदूषणापासून मुक्ती देण्याचा नारा देत, त्या दिशेने ठोस पावले उचलण्याची मानसिकता लोकांमध्ये तयार करण्याचा प्रयत्न झाला. आता या चार दिवसांत नदीकाठावरून येताना नदीतील जे दृश्य दिसले त्यावर आता शासनस्तरावर कोणत्या उपाययोजना कराव्या लागणार, याबाबतीत आता शासनपातळीवर पाठपुरावा करण्याचे आयोजकांचे धोरण आहे. त्याुनसार प्राथमिक टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. 

नदी वाचवण्याची जाणीव प्रकटचार दिवसांच्या या पायी यात्रेत नदीकाठावरील १२ गावांतील ५0 हजार लोक सहभागी झाले. जवळपास २४ हजार शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून प्रदूषणमुक्तीच्या जागरात सहभाग घेतला. ही यात्रा ज्या-ज्या गावांतून गेली, तेथील स्थानिक ग्रामस्थांसह लोकप्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रबोधनाचे विचार ऐकतानाच कार्यकर्त्यांची जेवण-खाण्याची आणि निवासाच्या व्यवस्थेसह संपूर्ण यंत्रणा राबली. यातून एकीचा संदेश तर दिसलाच, शिवाय आपली नदी आपण वाचवायला पाहिजे, ही जाणीवही दिसली. 

 

टॅग्स :environmentवातावरणpollutionप्रदूषणkolhapurकोल्हापूर