शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

भात, नागलीने माना टाकल्या, पावसाने पाठ फिरविल्याने खरीप धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 17:25 IST

कोल्हापूर जिल्ह्यात गेली पंधरा दिवस पावसाने पाठ फिरविल्याने खरीप पीक धोक्यात आले असून माळरान व डोंगरमाथ्यावरील पिके पिवळी पडली आहेत. भात व नागली पिकांनी माना टाकल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी उभा राहिले आहे.

ठळक मुद्देभात, नागलीने माना टाकल्या, पावसाने पाठ फिरविल्याने खरीप धोक्यात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेली पंधरा दिवस पावसाने पाठ फिरविल्याने खरीप पीक धोक्यात आले असून माळरान व डोंगरमाथ्यावरील पिके पिवळी पडली आहेत. भात व नागली पिकांनी माना टाकल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी उभा राहिले आहे.गेल्या पाच-सात वर्षांत पहिल्यांदाच जुलै महिन्यात सलग पंधरा दिवस पावसाने दडी मारली आहे. ऐन खरिपाची वाढ होण्याच्या कालावधीतच पाणी नसल्याने पिके अडचणीत आली आहेत. विशेषत: भातपिकाला सतत पाण्याची गरज असते, रोप लागणी झाल्यापासून पाऊस गायब झाल्याने रोप लावलेली जमिनींना भेगा पडल्या आहेत.

माळरान व डोंगरमाथ्यावरील भात, नागली, भूईमूग पिके पाण्याअभावी पिवळी पडू लागली आहेत. काही ठिकाणी तर भात व नागली पिकांनी माना टाकल्या असून मोठ्या कष्टाने जगवलेली पिके करपू लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी उभा राहिले आहे.शुक्रवारी सकाळी जिल्ह्यात काही ठिकाणी नुसती भुरभूर होती. मात्र, दिवसभर कडक ऊन राहिले. दुपारनंतर आकाशातून काळे ढग पुढे सरकत राहिले, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात नुसती भुरभुर सुरू होती. शुक्रवारी दिवसभरात कोल्हापूर जिल्ह्याचे किमान तापमान २२ तर कमाल ३० डिग्रीपर्यंत पोहोचले होते. किमान तापमानात वाढ झाल्याने वातावरणात उष्मा जाणवत होता.नदीकाठची कनेक्शन जोडण्याची मागणीअनेक गावांत महावितरण कंपनीने नदीकाठच्या विद्युत पंपाची कनेक्शन सोडवलेली आहेत. पाऊस नसल्याने आता शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे, मात्र वीज नसल्याने अडचण झाली आहे. महावितरण कार्यालयात हेलपाटे मारून शेतकरी वैतागले असून कनेक्शन जोडण्याची मागणी करत आहेत.धुक्यामुळे धास्ती वाढलीकोकणसह कोल्हापुरात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता, मात्र तो कोरडाच गेला. उलट पहाटे दाट धुक्याची चादर पसरलेली दिसते. साधारणता असे धूके परतीचा पाऊस सुरू झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात पडते. त्यामुळे शेतकऱ्यांची धास्ती वाढली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरीRainपाऊसkolhapurकोल्हापूर