शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

अनोखा उपक्रम; अनाथ मुली, महिलांना मिळणार माहेरचा आनंद, रत्नागिरीत माहेरवाशीण मेळाव्याचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 11:55 IST

हा माहेरवाशीण मेळावा चिखलगाव (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथे होणार आहे. हा राज्यातलाच नाही तर देशातील पहिलाच असा अनाथ मुलींचा माहेरवाशिणींचा मेळावा ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

कोल्हापूर : अनाथ मुली, महिला व त्यांची मुले यांना माहेरपण अनुभवता यावे यासाठी चिखलगाव येथील लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट (लोकसाधना) व पुण्यातील सनाथ वेल्फेअर फाउंडेशनतर्फे १३ ते १७ मे दरम्यान माहेर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा माहेरवाशीण मेळावा चिखलगाव (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथे होणार आहे. हा राज्यातलाच नाही तर देशातील पहिलाच असा अनाथ मुलींचा माहेरवाशिणींचा मेळावा ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील बालगृहातील (अनाथालयातील) माजी संस्थाश्रयी मुले-मुली अनाथ आणि निराश्रित असल्याने त्यांना १८ वर्षांनंतर 'माहेर' म्हणून कोणतेच हक्काचे ठिकाण नाही. माहेरचा आनंद या मुली कधीच उपभोगू शकत नाही. बालगृहात वाढल्यानंतर संस्थेने एकदा लग्न लावून दिले की या मुली कधीच आपल्या संस्थेच्या प्रांगणात माहेरी आल्यासारखा आनंद घेऊ शकल्या नाहीत.शासकीय नियमांमुळे त्या आपल्या बालगृहात माहेर म्हणून एक दिवसही राहू शकत नाहीत. अठरा वर्षांनंतर त्या त्यांच्या बालगृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांना कोणतेही हक्काचे, विश्रांतीचे, आश्वस्त करणारे 'माहेर' म्हणून विसावा ठरू शकणारे हक्काचे ठिकाण नाही. अशा अनाथ मुली आणि निराश्रित, एकल पालक असलेल्या, लग्नानंतरचे कुटुंब असूनही कौटुंबिक कलहात एकटे पडलेल्या महिला आज राज्यात खूप आहेत. त्यांनाही चार दिवस का होईना पण सुट्टीला आपल्या माहेरी जावेसे वाटते; पण त्यांच्यासाठी अशी कोणतीच हक्काची अशी जागा नाही. त्यांच्या आयुष्यातील ही एक मोठी पोकळी भरून काढण्यासाठीच हा मेळावा होत आहे.या मेळाव्यात नागपूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, यवतमाळ, पंढरपूर, मुंबई, पुणे अशा सर्व जिल्ह्यातील माजी संस्थाश्रयी विवाहित, अविवाहित, एकल पालक असलेल्या मुली, महिला त्यांची बाळं अशा शंभर ते दीडशे महिला सहभागी होतील असा अंदाज आहे. या माहेरवाशिणींच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल, ट्रस्टच्या 'लोकनिर्माण भवन' वसतिगृहात होणार आहे.मदतीचे आवाहनहा माहेरवाशीण आनंद मेळावा यशस्वीपणे पार पडावा, यासाठी दानशूर व्यक्तींकडून आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे. आपापल्या परीने मेळाव्यासाठी आर्थिक सहकार्य करता येईल तेवढे करावे. संपर्कासाठी सनाथ संस्थेच्या संचालिका गायत्री पाठक- पटवर्धन,पुणे (7776043131), प्रा. डॉ. सुनीलकुमार लवटे, कोल्हापूर (9881250093) यांना संपर्क करू शकता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRatnagiriरत्नागिरी