शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

नोटिसीशिवाय शेतीपंपांचे कनेक्शन तोडू नये, ऊर्जामंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 10:59 IST

शेती पंपांच्या वीज बिलांच्या वसुलीबाबत संबंधित शेतकऱ्यांना नोटीसा दिल्याशिवाय वीज कनेक्शन तोडू नये, असे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकारांना दिली.

ठळक मुद्देनोटिसीशिवाय शेतीपंपांचे कनेक्शन तोडू नये, ऊर्जामंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेशरघुनाथदादा पाटील यांची माहिती

कोल्हापूर : शेती पंपांच्या वीज बिलांच्या वसुलीबाबत संबंधित शेतकऱ्यांना नोटीसा दिल्याशिवाय वीज कनेक्शन तोडू नये, असे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकारांना दिली.शेतीपंपांचे वीज बिल माफ करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली होती. त्यानंतर सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी मोफत वीज देता येणार नसल्याचे सांगितले, त्याविरोधात शेतकरी संघटनेने आंदोलन केले. चर्चेअंती शेती पंपांच्या वीज बिलांपैकी ६७ टक्के सरकार, तर ३३ टक्के शेतकऱ्यांनी बिल भरायचा निर्णय झाला.

दिवसातील २४ तासांपैकी १६ तासांचे पैसे सरकार आणि आठ तासांचे पैसे शेतकऱ्यांनी भरायचे होते; पण शेतकऱ्यांना केवळ आठ तासच वीज मिळाल्याने शेतकऱ्यांचेच पैसे महावितरणकडे शिल्लक आहेत.

याबाबत एका शेतकऱ्याच्या खात्यावरील माहिती घेतली, तर २०१२ ते २०१५ या कालावधीत संबंधित शेतकऱ्याच्या वीज बिलापोटी सरकारने ४६ हजार ६६५ रुपये भरले व शेतकऱ्याने ३ हॉर्स पॉवरसाठी २५ हजार ५०० रुपये वीज बिल भरले. म्हणजेच कंपनीकडे शेतकऱ्यांचे २१ हजार १६५ रुपये शिल्लक आहेत.

याप्रमाणे  महाराष्ट्रातील सर्वच शेतकऱ्यांचे पैसे महावितरण कंपनीकडे शिल्लक आहेत. ही बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. १५ दिवसांची नोटीस दिल्याशिवाय शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडू नये, असे न्यायालयाने आदेश दिल्याची माहिती पाटील यांनी दिली.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर