शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

नोटिसीशिवाय शेतीपंपांचे कनेक्शन तोडू नये, ऊर्जामंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 10:59 IST

शेती पंपांच्या वीज बिलांच्या वसुलीबाबत संबंधित शेतकऱ्यांना नोटीसा दिल्याशिवाय वीज कनेक्शन तोडू नये, असे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकारांना दिली.

ठळक मुद्देनोटिसीशिवाय शेतीपंपांचे कनेक्शन तोडू नये, ऊर्जामंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेशरघुनाथदादा पाटील यांची माहिती

कोल्हापूर : शेती पंपांच्या वीज बिलांच्या वसुलीबाबत संबंधित शेतकऱ्यांना नोटीसा दिल्याशिवाय वीज कनेक्शन तोडू नये, असे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकारांना दिली.शेतीपंपांचे वीज बिल माफ करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली होती. त्यानंतर सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी मोफत वीज देता येणार नसल्याचे सांगितले, त्याविरोधात शेतकरी संघटनेने आंदोलन केले. चर्चेअंती शेती पंपांच्या वीज बिलांपैकी ६७ टक्के सरकार, तर ३३ टक्के शेतकऱ्यांनी बिल भरायचा निर्णय झाला.

दिवसातील २४ तासांपैकी १६ तासांचे पैसे सरकार आणि आठ तासांचे पैसे शेतकऱ्यांनी भरायचे होते; पण शेतकऱ्यांना केवळ आठ तासच वीज मिळाल्याने शेतकऱ्यांचेच पैसे महावितरणकडे शिल्लक आहेत.

याबाबत एका शेतकऱ्याच्या खात्यावरील माहिती घेतली, तर २०१२ ते २०१५ या कालावधीत संबंधित शेतकऱ्याच्या वीज बिलापोटी सरकारने ४६ हजार ६६५ रुपये भरले व शेतकऱ्याने ३ हॉर्स पॉवरसाठी २५ हजार ५०० रुपये वीज बिल भरले. म्हणजेच कंपनीकडे शेतकऱ्यांचे २१ हजार १६५ रुपये शिल्लक आहेत.

याप्रमाणे  महाराष्ट्रातील सर्वच शेतकऱ्यांचे पैसे महावितरण कंपनीकडे शिल्लक आहेत. ही बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. १५ दिवसांची नोटीस दिल्याशिवाय शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडू नये, असे न्यायालयाने आदेश दिल्याची माहिती पाटील यांनी दिली.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर