शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
2
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
3
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
4
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
5
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
6
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
7
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
8
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
9
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
10
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
11
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
12
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
13
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
14
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
15
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
16
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
17
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
18
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
19
Car Offers: निसान मॅग्नाइट, होंडा एलिव्हेटसह 'या' लोकप्रिय मॉडेल्सवर ३.२५ लाखांपर्यंत सूट!
20
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कर्णकर्कश आवाजावेळी चिडीचूप.. अंबाबाईच्या मंजूळ स्तोत्राचा मात्र त्रास

By भारत चव्हाण | Updated: July 22, 2025 12:06 IST

ध्वनियंत्रणेला विरोध : पावणेतीन कोटी खर्चून १२० खांब उभारले

भारत चव्हाणकोल्हापूर : एकीकडे मोठ्या साउंड सिस्टममुळे कानठळ्या बसविणारा आवाज सोडला जात असताना मिरवणुकीतील संयोजकांविरुद्ध तक्रारीचा ‘ब्र’सुद्धा न काढणाऱ्या शहरवासीयांना अंबाबाई मंदिर परिसरात सकाळी आणि संध्याकाळी उमटणाऱ्या मंजूळ स्वरांचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या ध्वनियुक्त हेरिटेज खांबांची अवस्था ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ अशी झाली आहे.करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी प्रत्येकवर्षी लाखो भाविक येत असतात, या भाविकांचे मंदिराच्या परिसरात आगमन होताच मन प्रसन्न व्हावे, त्यांच्या कानावर देवीच्या स्तोत्राचे मंजूळ स्वर पडावेत. त्यांना आध्यात्मिक समाधान लाभावे, म्हणून मंदिर परिसरात ध्वनियंत्रणा उभारली आहे. ध्वनियुक्त खांबांसाठी २ कोटी ६५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मंदिर परिसरातील दोनशे ते तीनशे मीटर परिसरात देवीचे स्तोत्र, आरती, भक्तिगीते भाविकांना ऐकायला मिळतील, अशा पद्धतीने १२० खांब उभे केले आहेत;परंतु हेच खांब मंदिर परिसरातील व्यापारी, विक्रेते, तसेच काही नागरिकांना त्रासदायक ठरत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. लग्नाची वरात असो, शिवजयंतीची मिरवणूक असो, की गणेशोत्सवातील मिरवणुका असोत, त्यात वाजणाऱ्या मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टमचा कोणाला त्रास होत नाही आणि झाला तरी कोणी तक्रार करीत नाही. सर्व जण ते मुकाट्याने सहन करतात; परंतु मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या ध्वनियुक्त खांबाचा त्रास होऊ लागल्याने देवस्थान समितीकडे अनेक तक्रारी येत असल्याचे समिती कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.महाद्वार रोडवरील व्यापारी, मंदिर परिसरातील विक्रेते यांच्याकडून या ध्वनियुक्त खांबावर लावल्या जाणाऱ्या भक्तिगीतांच्या आवाजाबाबत तक्रारी होत आहेत. रोज होणाऱ्या तक्रारीमुळे मध्यंतरी काही दिवस ही यंत्रणा बंद ठेवली होती. त्यानंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली; परंतु आवाज एकदम कमी करण्यात आला आहे. देवीचे स्तोत्र आणि गणपतीची गाणी लावण्याने त्रास होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मंदिर परिसरात आवाज मंजूळ असावा. तो कर्णकर्कश असू नये, अशी आमची अपेक्षा आहे. व्यापारी, विक्रेत्यांना त्रास होत असल्याने त्यांच्या वतीने मी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे तक्रार केली आहे. आवाज मंजूळ असावा, सकाळी ०६:०० ते ११:०० व सायंकाळी ०६:०० ते ०९:००, अशा विशिष्ट वेळेत स्तोत्र लावले जावे. शाळेच्या आणि कामाच्या वेळेत ध्वनियंत्रणा बंद ठेवावी. - श्याम जोशी, महाद्वार रोड व्यापारी 

मंदिर परिसरातील ध्वनियंत्रणेचा त्रास होत असल्याच्या रोज तक्रारी येत आहेत. ध्वनियंत्रणा बंद करा इथपासून खांब काढून टाका, अशाही सूचना फोनवर केल्या जात आहेत. आम्ही मर्यादित आवाजात ही ध्वनियंत्रणा सुरू ठेवली असून, त्यावर देवीचे स्त्रोत्र, तसेच काही गाणी लावतो. - अभिजीत पाटील, यंत्रणा हाताळणारे मंदिर कर्मचारी