शहरं
Join us  
Trending Stories
1
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
2
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
3
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
4
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
5
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
6
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
8
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
9
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
10
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
11
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
12
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
13
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
14
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
15
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
16
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!
17
देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
18
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
19
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन
20
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'

Kolhapur: कर्णकर्कश आवाजावेळी चिडीचूप.. अंबाबाईच्या मंजूळ स्तोत्राचा मात्र त्रास

By भारत चव्हाण | Updated: July 22, 2025 12:06 IST

ध्वनियंत्रणेला विरोध : पावणेतीन कोटी खर्चून १२० खांब उभारले

भारत चव्हाणकोल्हापूर : एकीकडे मोठ्या साउंड सिस्टममुळे कानठळ्या बसविणारा आवाज सोडला जात असताना मिरवणुकीतील संयोजकांविरुद्ध तक्रारीचा ‘ब्र’सुद्धा न काढणाऱ्या शहरवासीयांना अंबाबाई मंदिर परिसरात सकाळी आणि संध्याकाळी उमटणाऱ्या मंजूळ स्वरांचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या ध्वनियुक्त हेरिटेज खांबांची अवस्था ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ अशी झाली आहे.करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी प्रत्येकवर्षी लाखो भाविक येत असतात, या भाविकांचे मंदिराच्या परिसरात आगमन होताच मन प्रसन्न व्हावे, त्यांच्या कानावर देवीच्या स्तोत्राचे मंजूळ स्वर पडावेत. त्यांना आध्यात्मिक समाधान लाभावे, म्हणून मंदिर परिसरात ध्वनियंत्रणा उभारली आहे. ध्वनियुक्त खांबांसाठी २ कोटी ६५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मंदिर परिसरातील दोनशे ते तीनशे मीटर परिसरात देवीचे स्तोत्र, आरती, भक्तिगीते भाविकांना ऐकायला मिळतील, अशा पद्धतीने १२० खांब उभे केले आहेत;परंतु हेच खांब मंदिर परिसरातील व्यापारी, विक्रेते, तसेच काही नागरिकांना त्रासदायक ठरत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. लग्नाची वरात असो, शिवजयंतीची मिरवणूक असो, की गणेशोत्सवातील मिरवणुका असोत, त्यात वाजणाऱ्या मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टमचा कोणाला त्रास होत नाही आणि झाला तरी कोणी तक्रार करीत नाही. सर्व जण ते मुकाट्याने सहन करतात; परंतु मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या ध्वनियुक्त खांबाचा त्रास होऊ लागल्याने देवस्थान समितीकडे अनेक तक्रारी येत असल्याचे समिती कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.महाद्वार रोडवरील व्यापारी, मंदिर परिसरातील विक्रेते यांच्याकडून या ध्वनियुक्त खांबावर लावल्या जाणाऱ्या भक्तिगीतांच्या आवाजाबाबत तक्रारी होत आहेत. रोज होणाऱ्या तक्रारीमुळे मध्यंतरी काही दिवस ही यंत्रणा बंद ठेवली होती. त्यानंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली; परंतु आवाज एकदम कमी करण्यात आला आहे. देवीचे स्तोत्र आणि गणपतीची गाणी लावण्याने त्रास होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मंदिर परिसरात आवाज मंजूळ असावा. तो कर्णकर्कश असू नये, अशी आमची अपेक्षा आहे. व्यापारी, विक्रेत्यांना त्रास होत असल्याने त्यांच्या वतीने मी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे तक्रार केली आहे. आवाज मंजूळ असावा, सकाळी ०६:०० ते ११:०० व सायंकाळी ०६:०० ते ०९:००, अशा विशिष्ट वेळेत स्तोत्र लावले जावे. शाळेच्या आणि कामाच्या वेळेत ध्वनियंत्रणा बंद ठेवावी. - श्याम जोशी, महाद्वार रोड व्यापारी 

मंदिर परिसरातील ध्वनियंत्रणेचा त्रास होत असल्याच्या रोज तक्रारी येत आहेत. ध्वनियंत्रणा बंद करा इथपासून खांब काढून टाका, अशाही सूचना फोनवर केल्या जात आहेत. आम्ही मर्यादित आवाजात ही ध्वनियंत्रणा सुरू ठेवली असून, त्यावर देवीचे स्त्रोत्र, तसेच काही गाणी लावतो. - अभिजीत पाटील, यंत्रणा हाताळणारे मंदिर कर्मचारी