शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोधच, ग्रामपंचायतींनी ठराव पाठविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 19:15 IST

प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण

कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीतील पुढचा टप्पा पार पडला असून, कोल्हापूरशेजारील आठ ग्रामपंचायतींनी हद्दवाढीला विरोध केला आहे. तशी पत्रे करवीर पंचायत समितीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा परिषदेला दाखल करण्यात आली आहेत. ही सर्व गोपनीय पत्रे देण्यात आली असली तरी त्यातून या आठही ग्रामपंचायतींनी कोल्हापूर शहरात समाविष्ट होण्यास विरोध दर्शवला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तांना हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार महापालिकेने कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून आठ गावांचा अहवाल पाठवण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत कार्यवाही होऊन करवीर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून या गावांना हद्दवाढीबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे पत्र पाठवण्यात आले होते.यानंतर उचगाव, पाचगाव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, कळंबा, नवे बालिंगा, नवे पाडळी, नवी उजळाईवाडी या गावांनी ठाम भूमिका घेऊन आपली भूमिका ठरावाद्वारे करवीर पंचायत समितीकडे कळवली. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी आपले पत्र जोडून ही पत्रे शुक्रवारी जिल्हा परिषदेकडे पाठवली आहेत. या आठही गावांची भूमिका मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुन्हा महापालिकेला पाठवण्यात येणार असून, हद्दवाढ प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा यातून पूर्ण होणार आहे.