शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पक्षात राहून विरोधी प्रचार चालणार नाही, पदाचा राजीनामा द्यावा लागेल; मंत्री चंद्रकांत पाटील यांची सक्त ताकीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 14:19 IST

भोगावती : लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक नावाची घोषणा ही फक्त दिल्लीवरूनच केली जाईल. नाव कोणाचे आहे, हे महत्वाचे नसून आपला ...

भोगावती : लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक नावाची घोषणा ही फक्त दिल्लीवरूनच केली जाईल. नाव कोणाचे आहे, हे महत्वाचे नसून आपला उमेदवार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. समजून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन करत ज्यांना विरोधी प्रचार करावयाचा आहे. त्यांनी पहिला पक्षाचा राजीनामा ठेवावा आणि मगच विरोधात काम करावे, अशी सक्त ताकीद राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे.राधानगरी तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती रविश उदयसिंह पाटील कौलवकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या शेतकरी व युवक मेळाव्याच्या अध्यक्षपदावरून बोलत होते.           मंत्री पाटील पुढे म्हणाले, राज्यातील उमेदवारांची निवड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून केली जाईल. जे पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींचे हात बळकट करतील त्यांनाच या निवडणुकीत संधी देतील. उमेदवार कोण आहे, चिन्ह कोणते आहे. यापेक्षा पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान पदावर विराजमान करावयाचे आहे. या ध्येयाने काम करा, असे आवाहन केले. 

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, काँग्रेसवाल्यांच्याकडून एवढ्या छोट्या कार्यकर्त्याच्या प्रवेशासाठी एवढे मोठे व्यासपीठ केले. म्हणून खिल्ली उडवली जात आहे. मात्र रविश पाटील हे छोटा पॅकेट मे बडा धमाका आहेत, भाजपचे काम करण्यासाठी संधी दिली जाते. वर्षानुवर्षी गरिबी हटाव हा एकच नारा घेऊन राहुल गांधी आज देखील भारत जोडो यात्रा करत आहेत. एकीकडे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना काँग्रेसचा हा नेता भटकत आहे. अशा दिशाहीन झालेल्या काँग्रेसला कंटाळून तरुण मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. जिल्हा नियोजन मंडळाच्यामार्फत कधी एवढा निधी जिल्ह्याला मिळाला नाही, तो मिळाला असून विमानतळ, रेल्वे स्टेशन यांचा चेहरामोहरा बदलला.रविश पाटील म्हणाले, गेल्या तीन पिढ्यांच्यापासून आम्ही काँग्रेसमध्ये झोकून काम केले. मात्र सातत्याने आमचे खच्चीकरण करण्यासाठी प्रयत्न केले. गोकुळ दूध संघ, भोगावती साखर कारखाना निवडणुकीत तर आमच्यासोबत उघड विश्वासघात केला. अशा विश्वासघातकी प्रवृत्ती सोबत राहण्यापेक्षा स्वाभिमानाने राहणे पसंत करीन, ही भाजपची विचारसरणी पटली म्हणून जाहीर प्रवेश करत आहे.डॉ. सुभाष जाधव यांनी स्वागत तर नाथाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. माजी जिल्हा अध्यक्ष समरजीत घाटगे, बिद्रीचे संचालक राहुल देसाई यांची भाषणे झाली. लहू जरग, राहुल चिकोडे, माजी आमदार भरमूअण्णा पाटील, संभाजी आरडे, राधानगरी तालुका अध्यक्ष विलास रणदिवे, महिला तालुकाध्यक्ष सविता पाटील, ऋतुजा पाटील, करवीर तालुका अध्यक्ष दत्तात्रय मेडशिंगे, हंबीरराव पाटील आदी उपस्थित होते. दीपक शिरगावकर यांनी आभार मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटील