शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

आर्थिक मंदीतही अर्थव्यवस्थेला सुधारण्याची संधी --वसंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 11:56 AM

कोल्हापूर : आर्थिक मंदी असली, तरी देखील आगामी वर्षामध्ये अर्थव्यवस्था सुधारण्याची नक्की संधी आहे. उद्योजकांना केंद्रीय अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा ...

कोल्हापूर : आर्थिक मंदी असली, तरी देखील आगामी वर्षामध्ये अर्थव्यवस्था सुधारण्याची नक्की संधी आहे. उद्योजकांना केंद्रीय अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा आहेत, असे प्रतिपादन रिलायन्स इंडस्ट्रीजमधील पॉलिस्टर म्यॅन्युफॅक्चर विभागाचे प्रमुख वसंत पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.

कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. शिवाजी उद्यमनगर येथील माधवराव बुधले सभागृहातील त्यांच्या व्याख्यानाचा विषय ‘उद्योगांसमोरील आव्हाने’ असा होता. वसंत पाटील म्हणाले, सरकारने गेल्या नऊ महिन्यांमध्ये ६४ बिलियन डॉलर इतकी परकीय गुंतवणूक केली असून, त्याद्वारे आर्थिक मंदीमधून सावरण्यासाठी मदत होईल. या मंदीच्या स्थितीतही भारतातील शेअर बाजार स्थिर असल्याने अर्थव्यवस्था नवी भरारी घेईल, असे वाटते. त्यामुळे फारसे घाबरण्याची गरज नाही.

या कार्यक्रमास उद्योजक रामप्रताप झंवर, बाबाभाई वसा, व्ही. एन. देशपांडे, सचिन मेनन, ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील, इंजिनिअरिंग असोसिएशनचे हर्षद दलाल, कमलाकांत कुलकर्णी, नरेंद्र माटे, दिनेश बुधले, डॉ. व्ही. व्ही. कार्जिनी, प्रदीपभाई कापडिया, मोहन पंडितराव, शिवाजीराव पोवार, संजय पेंडसे, आदी उपस्थित होते. इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष अतुल आरवाडे यांनी स्वागत केले. नितीन वाडीकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रदीप व्हरांबळे यांनी सूत्रसंचालन केले. तर इंजिनिअरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष रणजित शहा यांनी आभार मानले. दरम्यान, वसंत पाटील हे कोल्हापूरचे आहेत. गेल्या २८ वर्षांपासून ते रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये कार्यरत आहेत.अर्थसंकल्पाबाबत पाटील यांचे अंदाज* कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात होईल.* उद्योगांवरील करांमध्ये आणि वैयक्तिक प्राप्तिकरात दिलासा मिळू शकतो.* लाभांशांवरील (डिव्हिडंड) करामध्ये सुधारणा होईल.* उद्योगांना चालना देण्यासाठी विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद.

 

  • संशोधन, नवतंत्रज्ञानावर खर्च करा. रोबोटिक तंत्रज्ञानामुळे रोजगार कमी होतील हा समज चुकीचा आहे. कारण रोबोट तयार करण्यासाठी सुद्धा नवीन उद्योग उभारणी करावी लागते. त्यासाठी मनुष्यबळाची खूप आवश्यकता असते. संशोधन आणि नवतंत्रज्ञानावर जास्तीत जास्त खर्च करून उद्योजकांनी परकीय बाजारपेठ काबीज करावी, असे आवाहन पाटील यांनी केले.

  

 

टॅग्स :Budgetअर्थसंकल्पkolhapurकोल्हापूर