शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

क्रांतिज्योतींचा समतेचा मंत्रच देशाला वाचवेल : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 4:20 PM

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी तत्कालीन समाजाला सामाजिक क्रांतीची नवी दृष्टी दिली. नायगाव हे सर्वांचे शक्तिपीठ आहे. त्यामुळे त्यांच्या स्मारकाबाबत सर्व कामे निश्चितपणे होतील. क्रांतिज्योतींचा समतेचा मंत्रच देशाला वाचवू शकतो, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले

ठळक मुद्देक्रांतिज्योतींचा समतेचा मंत्रच देशाला वाचवेल : छगन भुजबळसावित्रीबाई फुले यांना नायगावमध्ये अभिवादन

खंडाळा : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी तत्कालीन समाजाला सामाजिक क्रांतीची नवी दृष्टी दिली. नायगाव हे सर्वांचे शक्तिपीठ आहे. त्यामुळे त्यांच्या स्मारकाबाबत सर्व कामे निश्चितपणे होतील. क्रांतिज्योतींचा समतेचा मंत्रच देशाला वाचवू शकतो, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.नायगाव येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मंत्री बाळासाहेब पाटील, मंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार मकरंद पाटील, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार शशिकांत शिंदे, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, नितीन बानगुडे-पाटील, कमलताई ढोले-पाटील, बापूसाहेब भुजबळ, सभापती राजेंद्र तांबे, उपसभापती वंदना धायगुडे, जिल्हा परिषदेच्या सदस्या दीपाली साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, प्रा. हरी नरके, मंजिरी धाडगे, राजेंद्र नेवसे, सरपंच सुधीर नेवसे, उपसरपंच सीमा कांबळे उपस्थित होते.मंत्री छगन भुजबळ म्हणाले, ह्यनायगावच्या सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे काम खडतर परिस्थितीमध्ये सुरू केले. शेती आणि उद्योगाचे ज्ञान शिक्षणातून दिले पाहिजे, हा विचार महात्मा फुले यांनी दीडशे वर्षांपूर्वी मांडला. महिलांच्या शिक्षणासाठी ज्यांनी बीजं रोवली, त्या सावित्रीबार्इंनाच शिक्षणाची खरी देवता मानली पाहिजे.आमदार मकरंद पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यातील युगपुरुषांची जन्मगाव जिल्ह्याचे वैभव आहे.सावित्रीबार्इंचे कार्य महिलांसह समाजाला प्रेरणादायी आहे. नायगावचा विकास आणि फुले दाम्पत्यांच्या विचारावर महाराष्ट्राची विकासाची घोडदौड सुरू ठेवण्यासाठी छगन भुजबळ यांचे मोठे योगदान आहे. नायगावच्या विकास आराखड्यासाठी विशेष बैठक घ्यावी. मांढरदेव रस्ता आराखडा तयार आहे, तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न व्हावेत.ह्णजिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांनी स्वागत केले. सरपंच सुधीर नेवसे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी आभार मानले.उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गौरव करणारनायगाव येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित केले पाहिजे. त्यासाठी दरवर्षी एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्याचे नियोजन करणार आहे. त्यामुळे महिलांच्या चांगल्या कामाचा गौरव आणि इतरांना स्फूर्ती मिळेल, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळSatara areaसातारा परिसरSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुले