शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

..तरच मराठा आरक्षण मिळू शकेल, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी व्यक्त केलं स्पष्ट मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 13:48 IST

मुंबईत नव्हे दिल्लीत बैठका घ्या

पोपट पवारकोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी सध्या राज्यकर्ते महाराष्ट्रात बैठका घेत आहेत. मात्र, आरक्षणासाठी ५० टक्क्यांची मर्यादा असून ती वाढवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी या आरक्षणासाठी मुंबईत बैठका न घेता त्या दिल्लीत घेऊन ५० टक्क्यांची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्राला भाग पाडावे, तरच मराठा आरक्षण मिळू शकेल असे मत माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते, आमदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी व्यक्त केले.कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या आमदार चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले,  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार केंद्राने पारित केला. त्यावेळी महाविकास आघाडीच्या सर्वच खासदारांनी पहिल्यांदा आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्याची मागणी केंद्राकडे लावून धरली, मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, हे आरक्षण न्यायालयात टिकले नाही.  मुळात आरक्षणाचा विषय केंद्राच्या अखत्यारित आहे. यात राज्य सरकार काहीच करू शकत नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांनी मुंबईऐवजी दिल्लीत बैठक घेऊन पंतप्रधानांसह इतर संबधितांची भेट घ्यायला हवी.

काका-पुतण्यांच्या भेटीमुळे संभ्रमराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटीमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यानी हा संशयकल्लोळ दूर करून त्यावर स्पष्टीकरण द्यायला हवे अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली. 

..म्हणे ४२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्याराज्य सरकारने अधिवेशनात ४२ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या केल्या आहेत. मात्र, याची खरेच अंमलबजावणी होते का हे पाहायला हवे. या सरकारकडून नुसत्या घोषणांचाच सुकाळ पाहायला मिळतो, असा टोलाही चव्हाण यांनी सरकारला लगावला. 

कोल्हापुरात लाेकसभेची एक जागा काँग्रेसला हवीकोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आहे. मात्र, येणाऱ्या निवडणुकीत यातील एक कॉग्रेसने लढवायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यासाठी मी वरिष्ठ पातळीवरही बोलायला तयार असल्याचे आ.चव्हाण यांनी सांगितले. 

हे तर झेंडावंदन मंत्रीअनेक जिल्ह्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत, कोल्हापूर महापालिकेत अडीच महिन्यांपासून आयुक्त नाही. अनेक जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत. जे आहेत ते केवळ झेंडावंदन मंत्री आहेत, या शब्दांत चव्हाण यांनी राज्य सरकारच्या संथगती कारभाराचा समाचार घेतला.

समर्थन नाही अन कृतीही नाहीवादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या संभाजी भिडेंचे आम्ही समर्थन करत नसल्याचा दावा भाजपचे नेते करतात. मात्र, ते त्यांच्यावर कारवाईही करत नाहीत, असा आरोप करत राज्य सरकाने भिडेंना तत्काळ अटक करावी अशी मागणी चव्हाण यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAshok Chavanअशोक चव्हाणMaratha Reservationमराठा आरक्षण