शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

लाचखोरीच्या ४० गुन्ह्यांत एकालाच शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:35 IST

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सरकारी कार्यालयांत लाच घेतल्याच्या प्रकरणात गेल्या दीड वर्षात आठ गुन्ह्यांचा न्यायालयीन निकाल लागला असून, त्यामध्ये एकालाच शिक्षा झाली आहे. लाचलुचपत विभागाच्या कारवाईमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण फारच कमी आहे. तक्रारदार किंवा साक्षीदार फितूर होणे हे याचे एकमेव कारण असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.इंदिरा आवास योजनेअंतर्गत ...

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सरकारी कार्यालयांत लाच घेतल्याच्या प्रकरणात गेल्या दीड वर्षात आठ गुन्ह्यांचा न्यायालयीन निकाल लागला असून, त्यामध्ये एकालाच शिक्षा झाली आहे. लाचलुचपत विभागाच्या कारवाईमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण फारच कमी आहे. तक्रारदार किंवा साक्षीदार फितूर होणे हे याचे एकमेव कारण असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.इंदिरा आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाचा धनादेश काढण्यासाठी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी पन्हाळा पंचायत समिती कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक मारुती नामदेव चौगुले (वय ३४) याला एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायाधीश पी. एस. नागलकर यांनी सुनावली होती. शिक्षा झाल्याने त्याला शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे. सरकारी कार्यालयांत लाच स्वीकारणाºया अधिकारी व कर्मचाºयांवर दीड वर्षात ४० गुन्हे दाखल असून १२० जणांना अटक केली आहे. कागदपत्रांमध्ये त्रुटी दाखविल्याने किरकोळ कामासाठी नागरिकांना दोन-तीन महिने हेलपाटे मारावे लागतात. शेवटी वैतागून काम पूर्ण करण्यासाठी ‘साहेब, पैसे घ्या; पण काम करा,’ असे म्हणण्याची वेळ येते. इंदिरा आवास घरकुल योजनेतून घराचे बांधकाम पूर्ण झाल्याचा दाखला देण्यासाठी, तर दुकानांचे वजनकाट्यांचे प्रमाणपत्र देण्यासाठी, सात-बारा दाखल्यावर नोंदणी किंवा कर्जबोजा नोंद करून देण्यासाठी पैशांची मागणी केली जाते.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या राज्यातील आठ परिक्षेत्रांमध्ये पुणे परिक्षेत्रातील कोल्हापूर विभागात जास्त कारवाई झाली अहे. ३२ प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. कारवाई होऊनही लाच घेण्याचे प्रमाण काही कमी झालेले नाही.शिक्षेची तरतूदशंभर रुपयांपासून ते दोन लाखांपेक्षा जास्त रकमेच्या लाचेची मागणी केल्यास सात वर्षांची, तर लाचेची मागणी करून ती स्वीकारल्यास दहा वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. आतापर्यंत कोल्हापूर विभागात या दोन्ही शिक्षा एकाही आरोपीला झालेल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा झालेल्या आरोपींना जामीन मंजूर करण्याचा नवा अध्यादेश काढल्याने दीड किंवा तीन वर्षांची शिक्षा होऊनही आरोपींना ती भोगावी लागत नाही.अशी होते कारवाईलाचेची कारवाई झाल्यावर संबंधित विभागाच्या वरिष्ठांना त्याचा अहवाल सादर झाल्यानंतर ‘त्या’ अधिकारी किंवा कर्मचाºयास निलंबित केले जाते. दोषारोपपत्र ९० दिवसांत न्यायालयात सादर केले जाते. त्यानंतर या प्रकरणाच्या खटल्यांचे निकाल लागतात. ही प्रकरणे लवकरात लवकर निकाली होण्याची गरज आहे. त्यासाठी जलदगती न्यायालयांची आवश्यकता असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.आरोपी सुटण्याचे कारणकाही गुन्ह्यांमध्ये उशिरा निकाल लागल्याने अधिकारी बदलून गेलेले असतात; तर फिर्यादी ‘नको ती कटकट’ म्हणून आरोपीलाच फितूर होतात. इन कॅमेरा शासकीय पंच म्हणून साक्षी घेतल्या असल्या तरीही ते फितूर होण्याची दाट शंका असते; त्यामुळे अशा काही प्रकरणांत आरोपी निर्दोष सुटतात.लोकांनी निर्भयपणे तक्रार करण्यास पुढे यावे. आम्ही स्वत:हून प्रत्येक शासकीय कार्यालयात जाऊन प्रलंबित प्रकरणांसाठी उंबरे झिजविणाºया नागरिकांची भेट घेऊन त्यांना दिलासा देत आहोत. त्यामुळे सध्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे.- गिरीश गोडे, पोलीस उपअधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभागकालावधी गेली दीड वर्षलाचप्रकरणी कारवाई ४०अटक केलेली संख्या १२०न्यायप्रविष्ट गुन्हे ३२निकाल लागला ०८शिक्षा झालेला आरोपी ०१