शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

वडिलांच्या नावाचे ‘महामंडळ’ तरी प्रत्यक्षात आणा पंकजा मुंडे यांच्याकडून केवळ घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 01:11 IST

निवडणुकीतील सर्व घोषणांची अंमलबजावणी करायची नसते, हा आपल्याकडे सिरस्ता आहे. पण स्वत:च स्वत:च्या वडिलांच्या नावाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केलेले ‘गोपीनाथरावजी मुंडे ऊस तोडणी-वाहतूक कामगार महामंडळ’चार वर्षे झाले तरी

ठळक मुद्दे: गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी महामंडळ कागदावरच

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : निवडणुकीतील सर्व घोषणांची अंमलबजावणी करायची नसते, हा आपल्याकडे सिरस्ता आहे. पण स्वत:च स्वत:च्या वडिलांच्या नावाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केलेले ‘गोपीनाथरावजी मुंडे ऊस तोडणी-वाहतूक कामगार महामंडळ’चार वर्षे झाले तरी अस्तित्वात न येणे हे दुर्दैवी आहे.

ऊस तोडणी कामगारांच्या दोन तपाच्या संघर्षानंतर २०१४ ला महामंडळाची घोषणा केली गेली. त्याला निधी सोडाच पण त्याची रूपरेषाही न ठरल्याने राज्यातील सात लाखांहून अधिक ऊस तोड मजूर, वाहतूकदार हक्काच्या लाभापासून उपेक्षित राहिले आहेत. आता मंत्री मुंडे यांनी पुन्हा दसऱ्याचा मुहूर्त दिला खरा, पण खरोखरच येणारा दसरा या कष्टकºयांच्या जीवनात आनंद घेऊन येईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

समाजातील सर्वांत कष्टकरी आणि असुरक्षित असणाºया ऊसतोड मजूर व वाहतूकदारांसाठी महामंडळ व्हावे, अशी मागणी गेले २५ वर्षे सुरू आहे. त्यानुसार १९९३ ला दादासाहेब रूपवते यांची समिती नेमून अभ्यास केला.या समितीने १९९९ मध्ये अहवाल दिला, यामध्ये ऊसतोड मजुरांचा आर्थिक, सामाजिक व शारिरीक स्तर पाहता त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची शिफारस सरकारकडे केली, पण शिफारसीचा कागद धूळखात पडून राहिला. पुन्हा २००३ मध्ये आमदार पंडितराव दौंड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली, त्यांनीही २००५ ला महामंडळाची शिफारस केली.पण महामंडळाचे घोडे पुढे सरकलेच नाही. राज्यात २०१४ ला सत्तांतर झाले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेत गोपीनाथरावजी मुंडे ऊस तोडणी-वाहतूक कामगार महामंडळाची घोषणा केली, पण केवळ नाव देण्याशिवाय पुढे काहीच झाले नाही.

या व्यवसायात जोखीम तर आहेच, त्यात भविष्यही नसल्याने तरुण इकडे फिरकत नाहीतच, पण जे आहेत तेही दुसºया व्यवसायाकडे वळले आहेत. गेल्या दहा वर्षांत मजुरांची संख्या ३० टक्क्यांनी घटल्याचे दिसते.पंकजातार्इंनी महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी दसºयाचा मुहूर्त काढला आहे, पण येणारा दसरा-दिवाळी कष्टकरी मजुरांच्या आयुष्यात अंधार खरोखरच दूर करेल, अशी अपेक्षा धरण्यास हरकत नाही. एकंदरीत पुन्हा ही घोषणाच ठरली, तर ऊसतोड मजुरांअभावी साखर कारखान्यांची धुराडी थंडावण्यास वेळ लागणार नाही, एवढे मात्र निश्चित म्हणावे लागेल.सर्वोच्च न्यायालयाचाही अवमानसर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०१६ला ऊस तोडणी मजुरांची माथाडी कामगारांप्रमाणे नोंदणी करून त्यांना ओळखपत्रे देण्याचे आदेश सरकारला दिले होते. परिपत्रक काढले पण त्याचे पुढे काहीच झाले नाही.करारातही पोटावर काठीचतीन वर्षांनी मजुरी व वाहतुकीबाबत त्रिपक्षीय करार होणे बंधनकारक असते. पण त्याचे पालन होतच नाही, कधी मावा, कधी दुष्काळ तर कधी साखरेच्या दरावरून मजुरी वाढ टाळली जाते. यावेळेला तर तीन ऐवजी दर पाच वर्षे कराराची मुदत करून मजुरांच्या पोटावर काठी मारल्याच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत.महामंडळाचे फायदेभविष्याबाबत सामाजिक सुरक्षितता .ग्रॅज्युएटी .प्रॉव्हिडंड फंड .मजुरांच्या नोंदणीमुळे वाहतूकदारांच्या फसवणुकीला चापतमिळनाडू, ‘आंध्र’मध्ये दीडपट मजुरीमहाराष्टÑातील विशेषत: बीडसह मराठवाड्यातील ऊसतोड मजूर गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश व तमिळनाडू येथे ऊस तोडणीसाठी जातात.महाराष्टÑापेक्षा दीड पट म्हणजे ऊस तोडणी यंत्राला प्रतिटन ३५० ते ४०० रुपये दिले जातात, तेवढेच पैसे ऊस तोडणी मजुरांना दिले जाते, त्यामुळेच दोन लाख मजूर परराज्यात जातात.पंकजा मुंडे यांनी वडिलांच्या नावाने महामंडळाची घोषणा केली. किमान वडिलांच्या नावासाठी तरी त्यांनी महामंडळाला मूूर्तरूप द्यावे.- प्रा. आबासाहेब चौगले (राज्य उपाध्यक्ष, ऊस तोडणी-वाहतूक कामगार संघटना)