शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

कांदा ७० रुपये किलो, सीताफळाची आवक वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 1:50 PM

किरकोळ बाजारात कांदा ७० रुपये किलोपर्यंत गेला असून, तोही दुय्यम प्रतीचा आहे. सीताफळाची आवक वाढली असून, गत आठवड्याच्या तुलनेत दरात घसरण झाली आहे. भाजीपाल्याचे दर स्थिर राहिले असले तरी कडधान्य मात्र थोडेसे तेजीत आहे.

ठळक मुद्दे कांदा ७० रुपये किलो, सीताफळाची आवक वाढली भाजीपाला स्थिर, पण कडधान्य तेजीत

कोल्हापूर : परतीच्या पावसाने नवीन कांद्याचे पीक उद्ध्वस्त झाल्याने कांद्याने कमालीची उसळी खाल्ली आहे. किरकोळ बाजारात कांदा ७० रुपये किलोपर्यंत गेला असून, तोही दुय्यम प्रतीचा आहे. सीताफळाची आवक वाढली असून, गत आठवड्याच्या तुलनेत दरात घसरण झाली आहे. भाजीपाल्याचे दर स्थिर राहिले असले तरी कडधान्य मात्र थोडेसे तेजीत आहे.गेले वर्षभर कांदा २० ते २५ रुपये किलो राहिला. मध्यंतरी कांद्याच्या दरात थोडी वाढ झाली होती. गेले पंधरा-वीस दिवस परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. यामध्ये कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात आवक घटली असून, कोल्हापूर बाजार समितीत ५४७० पिशव्यांची आवक होत आहे. त्यामुळे दराने उसळी खाल्ली असून, घाऊक बाजारात १५ ते ५५ रुपयांपर्यंत कांद्याचा दर आहे. पण किरकोळ बाजारात ४० ते ७० रुपये दर पोहोचला आहे.

गेल्या आठवड्यात सरासरी ३० रुपये किलोचा दर होता. त्यामध्ये दुपटीने वाढ झाली असली तरी कांदाही ग्राहकांना दुय्यम प्रतीचा घ्यावा लागत आहे. बटाट्याचा दर प्रतिकिलो २५ रुपयांवर स्थिर असला तरी लसणाने मात्र भरारी घेतली आहे. घाऊक बाजारात ९० ते १८० रुपये किलोपर्यंत लसणाचा दर पोहोचला आहे.पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. भाजीपाला खराब झाला असला तरी आवक बऱ्यापैकी आहे. त्यामुळे दरात फारशी चढउतार दिसत नाही. वांगी ६० रुपये, टोमॅटो ३०, तर ढब्बू ४० रुपये किलो आहे. गवार, भेंडी, कारली, दोडक्याच्या दरात फारसा फरक दिसत नाही. फ्लॉवर व कोबीही ग्राहकांच्या आवाक्यात आहे. मेथीचे दरही वाढले असून, २० रुपये पेंढी आहे.फळमार्केटमध्ये सध्या सीताफळाची आवक वाढली आहे. दरातही घसरण झाली असून, किरकोळ बाजारात ५० रुपये किलोपर्यंत दर आहे. सफरचंदबरोबर संत्री व मोसंबीची आवक चांगली आहे. दिवाळीनंतर वास्तविक कडधान्य मार्केट स्थिर राहणे अपेक्षित होते; पण मूग, मटकी, चवळी, काळा वाटाणा व पांढरा वाटाणाच्या दरात किलोमागे दहा रुपयांची वाढ झाली आहे.

नवीन ज्वारी बाजारात आली असली तरी तीही दुय्यम प्रतीची आहे. एरव्ही २० रुपये असणारी ज्वारी ३० रुपये किलो आहे. सरकी तेल, तूरडाळ व हरभरा डाळीचे दर तुलनेत स्थिर राहिले असून, साखरेचा दर ४० रुपयांवर कायम राहिला आहे.कोथिंबीरची पेंढी ७० रुपये!पावसामुळे कोथिंबीरचे नुकसान झाले असून, तिच्या आवकेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे एकदम उसळी घेतली असून किरकोळ बाजारात ७० रुपये पेंढीचा दर झाला आहे.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर