शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

अनाथ-निराधारांना एक टक्का आरक्षण; पात्रता निकष काय.. जाणून घ्या

By विश्वास पाटील | Updated: April 8, 2023 13:53 IST

समाजाच्या मुख्य धारेत आणणारा निर्णय; आरक्षण धोरणात दुरुस्ती 

विश्वास पाटील कोल्हापूर : अनाथ-निराधारांना समाजाच्या मुख्य धारेत आणणारा निर्णय महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. त्याचा आदेश ६ एप्रिलला काढला आहे. अनाथ आरक्षण धोरणामध्ये या आदेशान्वये शासनाने बदल केला आहे. ज्यामुळे अनाथ-निराधार मुलांना आता हक्काच्या नोकरीत कायदेशीर एक टक्का आरक्षण मिळेलच; परंतु त्यांना विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेतही आरक्षणाचा लाभ होईल. त्याचा लाभ संस्थांतून बाहेर पडलेल्या मुला-मुलींना होऊ लागला आहे. अनेकजण राजपत्रित अधिकारी झाले आहेत.अनाथ मुलांना मंत्रिमंडळाच्या १७ जानेवारी २०१८ च्या बैठकीत खुल्या प्रवर्गातून शिक्षण व नोकरीमध्ये एक टक्का समांतर आरक्षण लागू केले. त्यामध्ये अनाथांची तीन प्रकारांमध्ये वर्गवारी केली होती. त्यांना खुल्या प्रवर्गातून आरक्षण देण्याऐवजी दिव्यांगांच्या धर्तीवर उपलब्ध पदसंख्येच्या एक टक्का आरक्षण लागू करण्याची मागणी राज्यभरातील या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी केली होती. त्याची दखल घेऊन २३ मार्च २०२३ मंत्रिमंडळाच्या बैठकीत अगोदरच्या शासन आदेशात दुरुस्ती करण्यात आली. त्यानुसार आता अनाथांना दिव्यांगांच्या धर्तीवर शिक्षण व शासकीय (निमशासकीय, शासन अनुदानित संस्थांमधील) पद भरतीमध्ये उपलब्ध पदांच्या एक टक्के आरक्षण लागू करण्यास शासनाने मान्यता दिली. उपलब्ध जागा समप्रमाणात असल्यास संस्थात्मक व संस्थाबाह्य मुलांना समान संधी मिळेल; परंतु विषम संख्येत असल्यास अगोदर जागांची समप्रमाणात विभागणी करावी व उरलेले अधिकचे एक पद संस्थात्मक प्रवर्गास मिळेल. त्यापुढील पदभरतीत अधिकचे पद संस्थाबाह्य प्रवर्गासाठी मिळेल.

अनाथ आरक्षण पात्रता निकष

  • संस्थात्मक : वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी ज्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे व ज्यांचे शासनमान्य संस्थेत पालनपोषण झाले आहे अशी मुले-मुली.
  • संस्थाबाह्य : वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी ज्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे; परंतु ज्यांचे शासनमान्य संस्थेबाहेर नातेवाइकांकडे संगोपन झाले आहे अशी मुले-मुली.

राज्य शासनाने अनाथ आरक्षण धोरणामध्ये बदल करण्याचा घेतलेला निर्णय अनाथ निराधार मुलांना न्याय देणारा आहे. त्यामुळे या आरक्षण धोरणातील दुरुस्तीचे राज्यभरातील सर्व संस्था व संस्थांतून बाहेर पडलेली मुलेही स्वागतच करतील. शासनाचेही या निर्णयाबद्दल अभिनंदन. - डॉ. सुनीलकुमार लवटे बालकल्याण चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते

नव्या निर्णयाचा फायदा कुणाला..?बालन्याय अधिनियमाच्या अधीन राहून चालणाऱ्या संस्था : ३००आजपर्यंत या संस्थांतून बाहेर पडलेली मुले-मुली : २५ हजार 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरreservationआरक्षण