शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

'वन' जमिनीचे महिन्यात हस्तांतरण

By admin | Updated: May 30, 2015 00:46 IST

चंद्रकांतदादा पाटील : कोल्हापूर-मुंबई विमानसेवेबाबत सरकारची सकारात्मक भूमिका

कोल्हापूर : कोल्हापूरची विमानसेवा सुरू करण्याबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे. ‘एअर इंडिया’ने कोल्हापुरातून सेवा पुरविण्यासाठी तयारी दर्शविली आहे. त्यासाठी सरकारकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल. कोल्हापूर-मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे दिली. याबाबत त्यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याशी चर्चा केली.केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी विमानतळावर ते आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पालकमंत्री पाटील म्हणाले, विमानतळाबाबत मुंबईत पालक सचिव आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण, एमआयडीसीचे अधिकारी यांच्या बैठकीला मला काही कारणास्तव उपस्थित राहता आले नाही. मात्र, या बैठकीत ‘एअर इंडिया’ने मुंबई-कोल्हापूर विमानसेवा सुरू करण्याची तयारी दाखविली आहे. यात एअर इंडियाने विमानसेवा पुरवीत असताना काही तोटा झाल्यास त्यासाठी राज्य सरकारने मदत करावी, अशी अट घातली आहे. सेवा पुरविण्यातील अडथळे दूर करण्यासह कंपनीने घातलेल्या अटींबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. दरम्यान, सायंकाळी सहाच्या सुमारास पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. सैनी यांच्याशी विमानसेवा आणि विस्तारीकरण याबाबत चर्चा केली. प्रारंभी डॉ. सैनी यांनी मुंबईतील बैठकीची माहिती देत विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या वन विभागाच्या जमीन हस्तांतरणाबाबत भारतीय विमानतळ प्राधिकरणाने तत्काळ प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना दिल्याचे सांगितले. त्यावर पालकमंत्री पाटील यांनी प्रस्ताव सादर झाल्यानंतर शासन पातळीवरील विविध स्वरूपांतील मान्यता देण्याची प्रक्रिया पूर्ण करून महिन्याभरात प्राधिकरणाकडे संबंधित जमिनीचे हस्तांतरण केले जाईल. तसेच विस्तारीकरण आणि अन्य सुविधांच्या पूर्ततेबाबत दिल्ली येथे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली जाईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)नितीन गडकरी यांचे स्वागत...खास विमानाने दिल्ली येथून सकाळी पावणेबाराच्या सुमारास केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे कोल्हापूर विमानतळ येथे आगमन झाले. याठिकाणी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, महानगर जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, राहुल चिकोडे, विजय जाधव, आदी उपस्थित होते. विमानतळावरून ते हेलिकॉप्टरने सांगलीतील वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजच्या कार्यक्रमासाठी गेले. सायंकाळी पाच वाजता ते विमानतळावर आले. तेथून विमानाने ते मुंबईला रवाना झाले.