शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

सरकार भाजपचेच तरीही आंदोलन का करावे लागते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 14:57 IST

प्रश्नाची तड लावण्यापेक्षा महापालिका निवडणुकीचे राजकारण

कोल्हापूर : कोल्हापूर शहराचे बकालीकरण करणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध आंदोलनाची सुरुवात म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे मंगळवारी महापालिकेसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. राज्यात आणि देशात भाजपची सत्ता असतानाही कोल्हापुरात एखाद्या प्रश्नाबद्दल आंदोलन करण्याची वेळ आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.साडेतीन वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्द असताना आणि लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप नसतानाही कोल्हापुरातील नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. शहराचे बकालीकरण सुरू आहे. येत्या १५ दिवसांत सर्व समस्यांचे निराकरण न झाल्यास आणि शहराचे बकालीकरण न थांबल्यास तीव्र जनआंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा ‘भाजप’चे माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी एका पत्रकाद्वारे दि. २७ मेरोजी दिला होता.पाणीपुरवठा, आरोग्य, विकासकामे, नगररचना, उद्यान, इस्टेट विभाग अशा नागरिकांशी थेट संबंध असणाऱ्या सर्वच खात्यांच्या कामात कमालीचा ढिसाळपणा आला आहे. थेट पाइपलाइनचे पाणी कोल्हापुरात दोन महिन्यांपूर्वी येऊनही कोणत्या ना कोणत्या भागात रोज पाण्यासाठी आंदोलने होत आहेत. कचरा उठाव आणि प्रक्रिया यांचा कोणताही ताळमेळ होत नसल्याने कचरा उठावात वारंवार अडचणी निर्माण होत असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसत आहेत. गटार, छोटे चॅनेल व नाले गाळाने भरून गेले आहेत. इस्टेट आणि परवाना विभागाच्या अनागोंदीपूर्ण दुर्लक्षामुळे शहरात ठिकठिकाणी अतिक्रमणे, टपऱ्या आणि बेकायदेशीर यात्री निवासांचे पेव फुटले आहे, याकडे ठाणेकर यांनी लक्ष वेधले आहे.राज्यात महायुतीचे सरकार असताना तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ महायुतीचे असताना शहरात अनेक समस्या जाणवत आहेत आणि त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना आंदोलन करावे लागत आहे. अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात; पण तरीही आंदोलन केले जात आहे. यामागे प्रश्नाची तड लावण्यापेक्षा महापालिका निवडणुकीचे राजकारण अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपा