शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

सरकार भाजपचेच तरीही आंदोलन का करावे लागते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 14:57 IST

प्रश्नाची तड लावण्यापेक्षा महापालिका निवडणुकीचे राजकारण

कोल्हापूर : कोल्हापूर शहराचे बकालीकरण करणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध आंदोलनाची सुरुवात म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे मंगळवारी महापालिकेसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. राज्यात आणि देशात भाजपची सत्ता असतानाही कोल्हापुरात एखाद्या प्रश्नाबद्दल आंदोलन करण्याची वेळ आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.साडेतीन वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्द असताना आणि लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप नसतानाही कोल्हापुरातील नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. शहराचे बकालीकरण सुरू आहे. येत्या १५ दिवसांत सर्व समस्यांचे निराकरण न झाल्यास आणि शहराचे बकालीकरण न थांबल्यास तीव्र जनआंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा ‘भाजप’चे माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी एका पत्रकाद्वारे दि. २७ मेरोजी दिला होता.पाणीपुरवठा, आरोग्य, विकासकामे, नगररचना, उद्यान, इस्टेट विभाग अशा नागरिकांशी थेट संबंध असणाऱ्या सर्वच खात्यांच्या कामात कमालीचा ढिसाळपणा आला आहे. थेट पाइपलाइनचे पाणी कोल्हापुरात दोन महिन्यांपूर्वी येऊनही कोणत्या ना कोणत्या भागात रोज पाण्यासाठी आंदोलने होत आहेत. कचरा उठाव आणि प्रक्रिया यांचा कोणताही ताळमेळ होत नसल्याने कचरा उठावात वारंवार अडचणी निर्माण होत असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसत आहेत. गटार, छोटे चॅनेल व नाले गाळाने भरून गेले आहेत. इस्टेट आणि परवाना विभागाच्या अनागोंदीपूर्ण दुर्लक्षामुळे शहरात ठिकठिकाणी अतिक्रमणे, टपऱ्या आणि बेकायदेशीर यात्री निवासांचे पेव फुटले आहे, याकडे ठाणेकर यांनी लक्ष वेधले आहे.राज्यात महायुतीचे सरकार असताना तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ महायुतीचे असताना शहरात अनेक समस्या जाणवत आहेत आणि त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना आंदोलन करावे लागत आहे. अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात; पण तरीही आंदोलन केले जात आहे. यामागे प्रश्नाची तड लावण्यापेक्षा महापालिका निवडणुकीचे राजकारण अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपा