शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Kolhapur: ‘आंदोलन’च्या वजनकाट्याने ऊस वजनचोरीवर ‘अंकुश’; शेतकऱ्यांच्या पैशातून उभा केला महाराष्ट्रातील पहिला वजनकाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 11:57 IST

साखर कारखानदारांनी काट्याची धास्ती घेतली

कोल्हापूर : आंदोलन अंकुश संघटनेच्या पुढाकारातून शेतकऱ्यांच्या पैशांतून शिरोळ येथे महाराष्ट्रातील पहिला वजनकाटा उभा केला असून, या काट्याची धास्ती साखर कारखानदारांनी घेतली आहे. त्यामुळे या परिसरातील कारखान्यांनी वजनकाटे अचूक ठेवल्याने हंगामात शेतकऱ्यांची किमान ७७ कोटींची लूट वाचल्याचा दावा संघटनेचे नेते धनाजी चुडमुंगे यांनी केला आहे.उसाची काटामारी नवीन नाही, याबाबत शेतकरी संघटनांच्या वतीने अनेक वेळा आवाज उठवला आहे. पण, सगळी यंत्रणा साखर कारखान्यांच्या हातात असल्याने फारसे यश हातात आले नाही. यासाठी ‘आंदोलन अंकुश’ने काटा उभारण्याचा निर्णय घेतला. नृसिंहवाडी येथील रामचंद्र गेंडे यांनी स्वत:ची जमीन दिली, तर शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन ३३ लाखांचा वजनकाटा उभारला. या काट्यामुळे भागातील दत्त, गुरुदत्त, जवाहर, शरद, पंचगंगा व सांगलीतील दत्त इंडिया या साखर कारखान्यांचे एकूण गाळप हे ५० लाख टनापेक्षा जास्त झाले आहे. २० टनांच्या दोन ट्रॉलीच्या सरासरी १ टन उसाची काटामारी व्हायची. मात्र, येथे काटा बसवल्यानंतर सगळ्याच कारखान्यांनी काटे अचूक करून घेतले आहेत.हंगामात २,६०० ऊस वाहनांचे मोफत वजनहंगामात या काट्यावर २,६०० ऊस वाहनांचे मोफत वजन करून दिले. त्यामध्ये, सीमा भागातील काही कारखान्यांच्या वजनात तफावत आढळली.‘इंडिकेटर’वरूनच थेट वजन पावती द्यावीसर्वच कारखान्यांचे वजनकाटे डिजिटल आहेत. मात्र, ऑनलाइन नसल्याने वजनात फेरफार करता येतो. यासाठी शासनाने सर्व्हरच्या नियंत्रणाखाली काटे आणले तर छेडछाड निदर्शनास येते. त्यामुळे इंडिकेटरवरुनच थेट वजन पावती द्यावी, अशी मागणी चुडमुंगे यांनी केली.इंडिकेटरला संगणक जोडण्याचा आदेश घातकलोडसेल ते इंडिकेटरपर्यंतच्या केबलना कोणतेही छुपे उपकरण जोडू नये, त्याचबरोबर इंडिकेटरला संगणक जोडून पावती देऊ नये, असा आदेश नियंत्रक वैधमापन शास्त्र विभागाचे डॉ. रवींद्र सिंगल यांनी नाेव्हेंबर २०२२ला काढला. हा आदेश कारखान्यांना अडचणीचा असल्याने त्यांची बदली झाली आणि डॉ. सुरेश मेकला यांनी ही अटच रद्द केली. हे घातक असल्याचे चुडमुंगे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsugarcaneऊसSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी