शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

Kolhapur: ‘आंदोलन’च्या वजनकाट्याने ऊस वजनचोरीवर ‘अंकुश’; शेतकऱ्यांच्या पैशातून उभा केला महाराष्ट्रातील पहिला वजनकाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 11:57 IST

साखर कारखानदारांनी काट्याची धास्ती घेतली

कोल्हापूर : आंदोलन अंकुश संघटनेच्या पुढाकारातून शेतकऱ्यांच्या पैशांतून शिरोळ येथे महाराष्ट्रातील पहिला वजनकाटा उभा केला असून, या काट्याची धास्ती साखर कारखानदारांनी घेतली आहे. त्यामुळे या परिसरातील कारखान्यांनी वजनकाटे अचूक ठेवल्याने हंगामात शेतकऱ्यांची किमान ७७ कोटींची लूट वाचल्याचा दावा संघटनेचे नेते धनाजी चुडमुंगे यांनी केला आहे.उसाची काटामारी नवीन नाही, याबाबत शेतकरी संघटनांच्या वतीने अनेक वेळा आवाज उठवला आहे. पण, सगळी यंत्रणा साखर कारखान्यांच्या हातात असल्याने फारसे यश हातात आले नाही. यासाठी ‘आंदोलन अंकुश’ने काटा उभारण्याचा निर्णय घेतला. नृसिंहवाडी येथील रामचंद्र गेंडे यांनी स्वत:ची जमीन दिली, तर शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन ३३ लाखांचा वजनकाटा उभारला. या काट्यामुळे भागातील दत्त, गुरुदत्त, जवाहर, शरद, पंचगंगा व सांगलीतील दत्त इंडिया या साखर कारखान्यांचे एकूण गाळप हे ५० लाख टनापेक्षा जास्त झाले आहे. २० टनांच्या दोन ट्रॉलीच्या सरासरी १ टन उसाची काटामारी व्हायची. मात्र, येथे काटा बसवल्यानंतर सगळ्याच कारखान्यांनी काटे अचूक करून घेतले आहेत.हंगामात २,६०० ऊस वाहनांचे मोफत वजनहंगामात या काट्यावर २,६०० ऊस वाहनांचे मोफत वजन करून दिले. त्यामध्ये, सीमा भागातील काही कारखान्यांच्या वजनात तफावत आढळली.‘इंडिकेटर’वरूनच थेट वजन पावती द्यावीसर्वच कारखान्यांचे वजनकाटे डिजिटल आहेत. मात्र, ऑनलाइन नसल्याने वजनात फेरफार करता येतो. यासाठी शासनाने सर्व्हरच्या नियंत्रणाखाली काटे आणले तर छेडछाड निदर्शनास येते. त्यामुळे इंडिकेटरवरुनच थेट वजन पावती द्यावी, अशी मागणी चुडमुंगे यांनी केली.इंडिकेटरला संगणक जोडण्याचा आदेश घातकलोडसेल ते इंडिकेटरपर्यंतच्या केबलना कोणतेही छुपे उपकरण जोडू नये, त्याचबरोबर इंडिकेटरला संगणक जोडून पावती देऊ नये, असा आदेश नियंत्रक वैधमापन शास्त्र विभागाचे डॉ. रवींद्र सिंगल यांनी नाेव्हेंबर २०२२ला काढला. हा आदेश कारखान्यांना अडचणीचा असल्याने त्यांची बदली झाली आणि डॉ. सुरेश मेकला यांनी ही अटच रद्द केली. हे घातक असल्याचे चुडमुंगे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsugarcaneऊसSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी