शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महावितरणच्या अभियंत्यांना महिलांनी दिलं मंगळसुत्र, कूंकू व बांगड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 18:22 IST

कोल्हापूर : महावितरण शेतक-यांना रात्री वीज देत असल्याने शेतक-यांना  वीजेचा शॅाक लागून, गवा , बिबट्या , अस्वल , हत्ती ...

कोल्हापूर : महावितरण शेतक-यांना रात्री वीज देत असल्याने शेतक-यांना  वीजेचा शॅाक लागून, गवा , बिबट्या , अस्वल , हत्ती यासारख्या वन्यप्राण्यांच्या हल्यात मृत्यू होऊन आमच्या माता भगिनी विधवा होत आहेत. यामुळे राज्यातील शेतक-यांच्या पत्नीचे  मंगळसुत्र व कुंकवाचे रक्षण करण्यासाठी  सरकारने शेतीला दिवसा वीजपुरवठा करावा. अशी मागणी स्वाभिमानी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली.कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर गेल्या ७ दिवसापासून शेतीपंपास दिवसा वीज द्या या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आज स्वाभिमानी महिला आघाडीच्यावतीने कोल्हापूर महावितरणचे अधिक्षक अभियंता अंकुर कावळे यांना महिलांनी मंगळसुत्र, कूंकू व बांगड्या देऊन यांचे रक्षण करा अशा भावना व्यक्त केल्या.यावेळी बोलताना जि. प. सदस्या पद्माराणी पाटील म्हणाल्या की,  शेतक-यास रात्री अपरात्री शेतामध्ये पाणी पाजविण्यासाठी जावे लागत आहे. राज्यात दैनंदिन एखादा शेतक-याचा वीजेच्या शॅाकने अथवा वन्यप्राण्यांच्या हल्याने जीव जात आहे. यामुळे शासनाने तातडीने याबाबत शेतीस दिवसा १० तास वीज देण्याचा निर्णय घ्यावा.निमशिरगाव ग्रा. प. सदस्या वैशाली पाटील म्हणाल्या, रात्री पाणी पाजण्यासाठी शिवारात जात असताना वन्यप्राणी यांच्यापासून जीवितास धोका आहे. आजपर्यंत राज्यातील हजारो शेतक-यांचा यामध्ये जीव गेला आहे. यामुळे राज्यातील संपुर्ण महिला शेतक-यांच्यावतीने आपण आमच्या या भावना सरकारला पोहोचवून संपुर्ण राज्यातील शेतक-यांच्या माता भगिनीचे विधवा होण्यापासून रक्षण करावे.यावेळी जि. प. सदस्या शुभांगी शिंदे, परितेच्या पंचायत समिती सदस्य जयश्री पाटील,  संगीता शेट्टी , सन्मती पाटील , श्रीमती. सुवर्णा पाटील यांचेसह निमशिरगाव , जयसिंगपूर , परिते , शिरोळ , हातकंणगले व करवीर तालुक्यांतील महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीelectricityवीजSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना