शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
4
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
5
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
6
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
7
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
8
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
9
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
10
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
11
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
12
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
13
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
14
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
15
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
16
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
17
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
18
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
19
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
20
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर

जि.प.कडे जुनी माहिती, छायाचित्रांची वानवा -संकलन आवश्यक : डिजिटलायझेशन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 00:59 IST

जिल्हा परिषदेची स्थापना होऊन आता येत्या तीन वर्षांत ६० वर्षे पूर्ण होतील; परंतु या जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाचे केंद्र असलेल्या आणि राजकीय विद्यापीठ म्हणून पाहिले जात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची

ठळक मुद्देशिवेंद्रसिंहराजे भोसले : गाफील राहू नका

समीर देशपांडे ।

कोल्हापूर : जिल्हा परिषदेची स्थापना होऊन आता येत्या तीन वर्षांत ६० वर्षे पूर्ण होतील; परंतु या जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाचे केंद्र असलेल्या आणि राजकीय विद्यापीठ म्हणून पाहिले जात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची पुरेशी माहिती जिल्हा परिषदेकडेच उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

राजस्थानमध्ये पहिल्यांदा पंचायतराज व्यवस्था अस्तित्वात आल्यानंतर सन १९६२ मध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्या अस्तित्वात आल्या. सुरुवातीला जी कामे लोकल बोर्डाकडून केली जात होती, तीच कामे पुढे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होऊ लागली. आपापल्या गावच्या गरजा ओळखून कार्यकर्ते पाठपुरावा करू लागले आणि मग दिवाबत्तीपासून ते रस्ते, शाळांच्या सुविधा गावागावांमध्ये उपलब्ध होऊ लागल्या.

सुरुवातीला सोयींचा अभाव, साधने अपुरी, दळणवळणासाठी रस्ते नाहीत, अशाही परिस्थितीमध्ये पदाधिकारी आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नेटाने काम करून गावागावांचा चेहरा बदलला. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करताना कोल्हापूर जिल्ह्याचा चांगला ठसा उमटवला.

सन २००० नंतरही निर्मल ग्रामपासून आता सुंदर शौचालय स्पर्धेपर्यंत अनेक बाबतीत कोल्हापूर जिल्हा परिषद देशभरामध्ये अव्वल राहिली आहे. मात्र, स्थापनेपासूनचे विविध सभांचे इतिवृत्तवगळता कोणतेही रेकॉर्ड जिल्हा परिषदेकडे उपलब्ध नाही. एवढेच नव्हे, तर सन १९८८ मध्ये जुन्या कागलकर हाऊसमधून जिल्हा परिषद सध्याच्या इमारतीमध्ये स्थलांतरित झाली तेव्हाचीही माहिती, निमंत्रण पत्रिकाही सध्या उपलब्ध नाही. सुरुवातीला सध्या जिथे करवीर पंचायत समिती आहे, तेथून जिल्हा परिषदेच्या कामाला सुरुवात झाली. कालांतराने कागलकर हाऊस विकत घेण्यात आले आणि नंतर सध्याची इमारत बांधण्यात आली; मात्र या वाटचालीची माहिती जिल्हा परिषदेमध्ये मिळत नाही.राजकीय विद्यापीठयाच जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, आणि सभापती, सदस्य म्हणून काम करणाºया नेत्यांनी मुंबई, दिल्लीपर्यंत राजकीय झेप घेतली आहे. सदाशिवराव मंडलिक, बाळासाहेब माने, राजू शेट्टी, संजय मंडलिक, धैर्यशील माने या खासदारांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषदेतच घडली, तर हरिभाऊ कडव, बाबासाहेब कुपेकर, हसन मुश्रीफ, भरमूआण्णा पाटील, नामदेवराव भोईटे, बाबासाहेब पाटील-सरूडकर, सत्यजित पाटील, प्रकाश आबिटकर, अमल महाडिक यांच्यासारख्या अनेक आजी-माजी मंत्री, आमदारांची राजकीय कारकीर्द ही जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून घडली आहे.हे करता येईलमाजी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवाहन करून, असे जुने रेकॉर्ड संकलित करता येईल. यामध्ये जुनी छायाचित्रे, जुन्या स्मरणिका, लेख, अहवाल, वृत्तपत्रांमधील जाहिराती यांचा समावेश असेल. सध्या जिल्हा परिषदेमध्ये जुन्या कागदपत्रांचे डिजिटलायझेशन सुरू आहे. त्यासोबतच जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने हा उपक्रम हाती घेतल्यास ते मोलाचे ठरणार आहे.अध्यक्षांसोबत रेकॉर्डही गेलेजिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर त्यांच्याशी संबंधित छायाचित्रे, बातम्या, अन्य माहिती सर्व साहित्य त्यांच्यासोबतच दिले गेले; त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे एकाही अध्यक्षांची माहिती उपलब्ध नाही. त्या-त्या वेळच्या अध्यक्षांच्या स्वीय साहाय्यकांकडे तोंडी माहिती आहे. 

अतिशय महत्त्वाचा मुद्दा ‘लोकमत’कडून उपस्थित केला जात आहे. मला जेव्हा याबाबतची माहिती समजली तेव्हा मला धक्का बसला. आपल्याच संस्थेची माहिती आपल्याकडे उपलब्ध नसणे बरोबर नाही; त्यामुळे याबाबत तातडीने माजी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाºयांना आवाहन केल्यास त्यांच्याकडून ही माहिती, छायाचित्रे आपल्याला मिळू शकतात. प्रत्येक पंचायत समितीमध्ये हे साहित्य कॉपी करून परत देण्याची व्यवस्था केली तर चांगली माहिती संकलित होऊ शकेल.- अरुण इंगवले, ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद