शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पोलीस स्मृति दिनानिमित्त कोल्हापुरात वीरमरण प्राप्त पोलीसांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 14:31 IST

कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मृतीस पोलिस प्रशासनाच्यावतीने स्मृतिस्तंभावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश म. आ. लवेकर यांच्या हस्ते कृतज्ञतापूर्वक पुष्पचक्र अर्पण करुन देशातील 379 वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली.

ठळक मुद्देवीरगती प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आदरांजली पोलिस स्मृतिस्तंभावर न्यायाधिश लवेकर यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण पोलीस दलाच्यावतीने बंदुकीच्या 3 फैऱ्यांची सलामी पोलीस बँड पथकाने बिगूल वाजवून मानवंदना

कोल्हापूर दि. 21 : कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मृतीस  पोलिस प्रशासनाच्यावतीने स्मृतिस्तंभावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश म.आ.लवेकर यांच्या हस्ते कृतज्ञतापूर्वक पुष्पचक्र अर्पण करुन देशातील 379 वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस दलाच्यावतीने बंदुकीच्या 3 फैऱ्यांची सलामी देण्यात आली. पोलीस बँड पथकाने बिगूल वाजवून मानवंदना दिली.

पोलीस दलातील ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. त्यांच्या स्मृतिस पोलीस स्मृतीदिनानिमित्त येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश म. आ. लवेकर यांच्यासह कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी आदि मान्यवरांनी स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करुन अदरांजली अर्पण केली.

यावेळी पोलीस  उपअधीक्षक सतीश माने, भरतकुमार राणे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, वसंतराव मुळीक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. म. आ. लवेकर म्हणाले, पोलीसांना नुसतीच कायदा व सुव्यवस्था पहावी लागत नसून हिंसाचारी, गुन्हेगारी, दहशतवादी आणि समाजद्रोही यांच्याशीही सामना करावा लागतो. कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांचे सुरक्षा व संरक्षण करण्याचे महान कर्तव्य करीत असताना दरवर्षी अनेक पोलीस अधिकाऱ्यांना व शिपायांना आपले प्राण गमवावे लागतात, त्यांच्याप्रती आपण नेहमीच आदर व्यक्त करणे, आपले सर्वांचे कर्तव्य आहे.  

लडाख येथे  20 ऑक्टोबर 1959 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन जवान बेपत्ता झाल्याने, त्यांचा शोध घेण्याकरिता आय.टी.बी.पी. आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 22 जवानांची एक तुकडी 21 ऑक्टोंबररोजी गेली होती. या तुकडीवर हॉटस्प्रिंग या ठिकाणी चिनी सैनिकांची अचानक शस्त्रानिशी जोरदार हल्ला चढविला, या हल्यात शोधतुकडीतील 10 जवान मृत्युमूखी पडले, 5 जवान जखमी झाले तर 7 जवानांना चिनी सैनिकांनी ताब्यात घेतले.

शत्रुशी निकराची लढत देतांना या शुरवीरांनी देशासाठी आपले देह धारातीर्थी ठेवले. तेंव्हापासून 21 ऑक्टोंबर हा दिवस देशातील पोलीस दलाच्यावतीने पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. पोलीस स्मृतिदिनी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी मागील एक वर्षाच्या कालावधीत ज्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले त्या सर्वांना अदरांजली वाहण्यात आली. 

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्यावतीने  सकाळी 8 वाजता पोलीस कवायत मैदानावर पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात आला. यावेळी गतवर्षी कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झालेल्या देशातील 379  पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नावे राष्ट्रीय पोलीस दिन संचलनात वाचली जावून स्मृतीस्तंभावर  मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन त्यांना अदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमास पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय,निवृत्त पोलीस अधिकारी, तसेच नागरीक उपस्थित होते.        

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर