शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

ठाकरेंना फसवणाऱ्यांना भविष्यात कळेल, शिंदे-फडणवीस सरकारबाबत माजी मंत्री सतेज पाटील म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 13:49 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फसवणाऱ्यांना भविष्यात कळेल

कोल्हापूर : राज्यात नवीन सरकार येऊन महिना उलटला तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. सामान्य माणसांची कामे ठप्प झाली असून, मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता जनतेलाच मोर्चे काढावे लागतील, असा टोला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना भाजपला लगावला.आमदार पाटील म्हणाले, राज्यात पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आमची मागणी असताना त्याबाबत निर्णय घेण्यासाठी कोणी मंत्रीच नाही. किमान भाजप व शिंदे गटाचे चार -चार मंत्री घेऊन कामांना गती दिली पाहिजे. याउलट हजारो कोटींच्या कामांना स्थगिती देऊन राज्य सरकारने नेमके काय साधले? रस्ते, धरणे आदी सामान्य माणसांचीच ही कामे होती. कर्मचाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नती थांबवल्या आहेत. एकूणच राज्याचा कारभार ठप्प झाल्याने आता जनतेलाच याबाबत मोर्चा काढावा लागणार आहे.

जि. प.साठी शक्य तिथे आघाडीजिल्हा परिषद, महापालिका निवडणूका यापूर्वी स्वबळावर लढलो आहे. आता जिथे शक्य आहे, त्या ठिकाणी दोन्ही काँग्रेस, शिवसेना एकत्रितपणे लढण्यासाठी माझी तयारी असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

‘ते’ मंडलिक, मानेंनी सांगावे

कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासह नाईट लँडिंगसाठी कोणी प्रयत्न केले, केंद्रीय मंत्र्यांच्या कोणी गाठीभेटी घेतल्या, हे खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने यांनी सांगावे. पत्र आल्यानंतर कोणी श्रेय घेत असेल तर त्यावर आपण काय बोलणार? असा सवालही आमदार पाटील यांनी केला.

ठाकरेंना फसवणाऱ्यांना भविष्यात कळेलशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फसवूून सत्तेवर आले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला हे आवडलेले नाही. भविष्यातील निवडणुकीत हे चुकीचे घडले, हे त्यांच्या लक्षात येईल, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदे