शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेंना फसवणाऱ्यांना भविष्यात कळेल, शिंदे-फडणवीस सरकारबाबत माजी मंत्री सतेज पाटील म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 13:49 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फसवणाऱ्यांना भविष्यात कळेल

कोल्हापूर : राज्यात नवीन सरकार येऊन महिना उलटला तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. सामान्य माणसांची कामे ठप्प झाली असून, मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता जनतेलाच मोर्चे काढावे लागतील, असा टोला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना भाजपला लगावला.आमदार पाटील म्हणाले, राज्यात पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आमची मागणी असताना त्याबाबत निर्णय घेण्यासाठी कोणी मंत्रीच नाही. किमान भाजप व शिंदे गटाचे चार -चार मंत्री घेऊन कामांना गती दिली पाहिजे. याउलट हजारो कोटींच्या कामांना स्थगिती देऊन राज्य सरकारने नेमके काय साधले? रस्ते, धरणे आदी सामान्य माणसांचीच ही कामे होती. कर्मचाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नती थांबवल्या आहेत. एकूणच राज्याचा कारभार ठप्प झाल्याने आता जनतेलाच याबाबत मोर्चा काढावा लागणार आहे.

जि. प.साठी शक्य तिथे आघाडीजिल्हा परिषद, महापालिका निवडणूका यापूर्वी स्वबळावर लढलो आहे. आता जिथे शक्य आहे, त्या ठिकाणी दोन्ही काँग्रेस, शिवसेना एकत्रितपणे लढण्यासाठी माझी तयारी असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

‘ते’ मंडलिक, मानेंनी सांगावे

कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासह नाईट लँडिंगसाठी कोणी प्रयत्न केले, केंद्रीय मंत्र्यांच्या कोणी गाठीभेटी घेतल्या, हे खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने यांनी सांगावे. पत्र आल्यानंतर कोणी श्रेय घेत असेल तर त्यावर आपण काय बोलणार? असा सवालही आमदार पाटील यांनी केला.

ठाकरेंना फसवणाऱ्यांना भविष्यात कळेलशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फसवूून सत्तेवर आले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला हे आवडलेले नाही. भविष्यातील निवडणुकीत हे चुकीचे घडले, हे त्यांच्या लक्षात येईल, असे आमदार पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदे