शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

वनतारा अधिकारी कोल्हापुरी, हत्तीण देण्याची तयारी; केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देणे गरजेचे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 12:26 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत निर्णय

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे गुजरातमधील वनतारामध्ये पाठविण्यात आलेल्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणीसाठी आता न्यायालयीन लढाई लढावी लागणार आहे. हत्तीण मठाकडे परत येण्यासाठी केंद्र शासनाच्या वन विभागातर्फे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले जाणार आहे. त्यासाठी केंद्राकडे जिल्ह्यातील दोन्ही खासदारांकडून पाठपुरावा करून कायदेशीर प्रक्रिया केली जाईल.केंद्र शासन, राज्य शासन व वन विभागाच्या सहकार्याने सर्वोच्च न्यायालयात ताकदीने लढा दिला जाईल. त्यासाठी वनताराचेदेखील सहकार्य असेल. जिल्हाधिकारी कार्यालयात वनताराचे वरिष्ठ अधिकारी व नांदणी मठाचे मठाधीश यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर पालकमंत्र्यांनी ही माहिती दिली.नांदणी जैन मठातील महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये नेल्यानंतर वनताराबद्दल नांदणीकरांसोबतच कोल्हापूरवासियांमध्ये प्रचंड असंतोष होता. त्यातूनच बाॅयकाॅट जिओ, १ लाख सह्यांची मोहीम सुरू झाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर खासदार धनंजय महाडिक व धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून शुक्रवारी वनताराची टीम नांदणी मठाधीशांसोबत चर्चेसाठी कोल्हापुरात दाखल झाली.मात्र, नांदणीतील वातावरण बघता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राहुल आवाडे, अशाेकराव माने, सांगलीचे आमदार सुरेश खाडे आदी उपस्थित होते. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी पत्रकारांना माहिती दिली.ते म्हणाले, महादेवीसोबत जैन बांधवांसह समस्त कोल्हापूरकरांच्या भावना जुळल्या असल्याने ती वनतारामध्ये गेल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये पाठविण्यात आले आहे. त्यामुळे तिला परत कोल्हापुरात आणायचे असेल तर कायदेशीर प्रक्रियाच करावी लागेल.

केंद्र शासनाच्या वन विभागातर्फे सकारात्मक प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करावे लागेल. त्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही खासदारांच्या पाठपुराव्याने केंद्राकडून कायदेशीर प्रक्रिया केली जाईल. शर्थीचे प्रयत्न केले जातील. या प्रक्रियेसाठी वनताराकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे. कायदेशीर प्रक्रियेनंतर महादेवीला परत आणण्यात अडचणी येणार नाहीत.

नांदणी मठाधीश निघून गेले..जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात लोकप्रतिनिधी व अधिकारी असले, तरी जिल्हाधिकाऱ्यांच्या ॲन्टी चेंबरमध्ये फक्त नांदणीचे महाराज व वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातच चर्चा झाली. अर्ध्या-पाऊण तासाने नांदणीचे मठाधीश बैठकीतून दालनाबाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. कोणाशीही संवाद न साधता ते गाडीत बसून निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ नांदणी ग्रामस्थदेखील गेले.

कोल्हापूरकरांची गर्दी.. कडेकोट बंदोबस्तवनताराची टीम जिल्हाधिकारी कार्यालयात आल्याचे समजताच कार्यालयाबाहेर नांदणी ग्रामस्थांसह कोल्हापूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती. नांदणीचे मठाधीश बाहेर आल्यानंतर नागरिकांनी हत्तीसाठी घोषणा दिल्या. दुसरीकडे कार्यालयाबाहेर व दालनाबाहेरदेखील कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एसआरपीएफ जवान, वर्दीतील पोलिस तसेच साध्या वेशातील पोलिसदेखील येथे मोठ्या प्रमाणात तैनात होते.

नांदणीऐवजी कोल्हापुरातवनताराची टीम मठाधीश यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी नांदणीला निघाली होती. मात्र, पोलिसांनी त्यांना नांदणीला जाण्यापासून थांबवले. सध्या हत्तीच्या प्रकरणामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष असून, तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मधला मार्ग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचे ठरले. दुपारी पावणे तीन वाजता दोन्ही खासदारांसह वनताराची टीम व त्यानंतर नांदणीचे महाराज आले.

वनताराचा संबंध नाही..वनताराबद्दल कोल्हापूरकरांमध्ये प्रचंड रोष आहे. याबद्दल पालकमंत्री म्हणाले, वनतारा हे हत्ती संगोपन केंद्र आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकालानंतर महादेवीला कुठे ठेवायचे? हा विषय पुढे आल्यानंतर वनताराचा पर्याय पुढे आला. त्या पलीकडे वनताराचा या प्रकरणाशी काही संबंध नाही. उलट कोल्हापूरकरांना लागेल ती मदत वनताराकडून केली जाणार आहे.

राजकारण नको..महादेवी हत्तीणीविषयी जैन धर्मियांमध्ये आपुलकीची भावना आहे. या भावनिक मुद्द्याचे राजकारण केले जात आहे. माझी सर्वांना विनंती आहे की, या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये.

आता माघार नाही! १३०० वर्षांचा इतिहास असणाऱ्या मठातील महादेवीसाठी संघर्ष सुरू