शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 13:08 IST

पिण्याच्या पाण्याबाबत योग्य दक्षता न घेणाऱ्या जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेकडून ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतींना सात दिवसांची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींना नोटिसापिण्याच्या पाण्याबाबत दक्षता न घेतल्याचा परिणाम

कोल्हापूर : पिण्याच्या पाण्याबाबत योग्य दक्षता न घेणाऱ्या जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेकडून ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतींना सात दिवसांची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.जिल्हा पाणी गुणवत्ता संनियंत्रण समितीची बैठक मंगळवारी जिल्हा परिषदेमध्ये आयोजित करण्यात आली होती. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मनीष पवार, भूजल सर्वेक्षणचे ऋषिकेश गोसकी हे यावेळी उपस्थित होते.आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यातील सर्वच गावांच्या पिण्याच्या पाण्याची उद्भवस्थाने तपासली जातात. पाण्याचे शुद्धिकरण, उद्भवस्थानांची स्वच्छता, गळती या सर्वांची पाहणी करण्यात येते. यानंतर या ग्रामपंचायतींसाठी लाल, पिवळे आणि हिरवे कार्ड दिले जाते.

या तपासणीमध्ये जिल्ह्यातील ६० गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या उद्भवस्थानांनजीक अस्वच्छता, गळती असल्याचे निदर्शनास आले होते. अशा गावांना पिवळे कार्ड देण्यात आले होते. यातील आजरा, गवसे, इटे, चाफवडे, चितळे (ता. आजरा), कोदाळी, वाघोत्रे (ता. चंदगड),कातळी (ता. गगनबावडा), चिखली, बेलेवाडी काळम्मा, बेलवळे खुर्द (ता. कागल) आणि यवलूज (ता. पन्हाळा) या १२ ग्रामपंचायतींनी आवश्यक त्या सुधारणा केल्याने त्यांना पुन्हा हिरवे कार्ड देण्यात आले.मात्र उर्वरित ४८ ग्रामपंचायतींनी काय सुधारणा केल्या, काय उपाययोजना केली याची माहितीच जिल्हा परिषदेकडे न दिल्याने अखेर या सर्व ग्रामपंचायतींना नोटिसा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या ग्रामपंचायतींना सुधारणा करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 

 

टॅग्स :Waterपाणीzpजिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायतkolhapurकोल्हापूर