शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

Kolhapur: इचलकरंजीला एक थेंबही पाणी देणार नाही, ए. वाय. पाटील यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 13:31 IST

..तर भावी पिढी माफ करणार नाही

तुरंबे : राधानगरी धरणांचा तालुका आहे. या पाण्यावर मूळचा हक्क येथील शेतकऱ्यांचा आहे. तो डावलून जर सुळकुड योजना पाणी नेणार असेल तर इचलकरंजीला एक थेंब पाणी जाऊ देणार नाही, असा निर्धार अजित पवार गट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केला.अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथे तालुका सरपंच परिषद आणि काळम्मावाडी बचाव कृती समितीच्या बैठकीत ते बोलत होते.पाटील म्हणाले, शिवाजीराव खोराटे यांनी पहिली पाणी परिषद सरवडेत घेतली.,स्वर्गीय हिंदुराव पाटील यांच्यासह तत्कालीन नेत्यांनी व्यापक आंदोलन केल्याने धरण झाले. धरणासाठी विस्थापित झालेल्या नऊ गावांचे प्रश्न प्रलंबित आहेत. धरणाची गळती, गार्डनची दुरवस्था, विश्रामगृह दुरवस्था, नियंत्रणासाठी धरणस्थळी अधिकारी नाहीत आणि कार्यालय नाही यांचाही विचार करावे लागेल.आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, दूधगंगा धरणाच्या पाण्याचे लेखापरीक्षण करावे लागेल. ज्याचा हक्क आहे त्यालाच पाणी मिळाले पाहिजे. हे पाणी दुसऱ्या कोणत्याही संस्थेला ज्यांचा या धरणाच्या लाभ क्षेत्राशी काही संबंध नाही त्यांना का द्यायचे? असा सवाल केला. तीव्र लढा उभारून शासनाशी संघर्ष करू. एकवेळ सरकारच्या विरोधात लढाई उभारू पण शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहू असे आश्वासन त्यांनी दिले.माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, आंदोलन करावे लागले तरी हरकत नाही. शेती आणि पिण्यासाठी लागणारे पाणी हे येथील मूळ शेतकऱ्यांच्या हक्काचे आहे. त्यांच्यासाठी आम्ही ताकदीने मदत करू. सुळकुड योजनेचा घाट थांबवा नाही तर शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.यावेळी सत्यजित जाधव, भूषण पाटील, नामदेव चौगले, शहाजी पाटील, बापू किल्लेदार, प्रकाश पोवार, संभाजी देसाई, सिकंदर मुल्लाणी, सागर कोंडेकर, यांनी मनोगते मांडली. यावेळी अध्यक्ष नेताजी पाटील, बिद्री संचालक युवराज वारके, प्रभाकर पाटील, एकनाथ पाटील, नाना पाटील, अरुण जाधव, फिरोजखान पाटील, लहुजी जरग, नानासो पाटील, युवराज वारके, हिंदुराव चौगले, अरुण जाधव, अशोकराव फराकटे, रंगराव किल्लेदार उपस्थित होते.

...तर भावी पिढी माफ करणार नाहीआमच्या आजोबा, पणजोबा यांनी दूधगंगा धरण उभारण्यासाठी संघर्ष केला. या धरणाचे पाणी कर्नाटक, कोल्हापूरला जाते. आता निसर्ग लहरी आहे. पाऊस झालेला नाही. जर हे पाणी सगळे पळवून नेणार असतील, आणि आपण ते थांबवू शकलो नाही तर भावी पिढी तुम्हाला माफ करणार नाही, असे मत सागर कोंडेकर व प्रभाकर पाटील यांनी व्यक्त केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीWaterपाणी