शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Kolhapur: इचलकरंजीला एक थेंबही पाणी देणार नाही, ए. वाय. पाटील यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 13:31 IST

..तर भावी पिढी माफ करणार नाही

तुरंबे : राधानगरी धरणांचा तालुका आहे. या पाण्यावर मूळचा हक्क येथील शेतकऱ्यांचा आहे. तो डावलून जर सुळकुड योजना पाणी नेणार असेल तर इचलकरंजीला एक थेंब पाणी जाऊ देणार नाही, असा निर्धार अजित पवार गट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केला.अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथे तालुका सरपंच परिषद आणि काळम्मावाडी बचाव कृती समितीच्या बैठकीत ते बोलत होते.पाटील म्हणाले, शिवाजीराव खोराटे यांनी पहिली पाणी परिषद सरवडेत घेतली.,स्वर्गीय हिंदुराव पाटील यांच्यासह तत्कालीन नेत्यांनी व्यापक आंदोलन केल्याने धरण झाले. धरणासाठी विस्थापित झालेल्या नऊ गावांचे प्रश्न प्रलंबित आहेत. धरणाची गळती, गार्डनची दुरवस्था, विश्रामगृह दुरवस्था, नियंत्रणासाठी धरणस्थळी अधिकारी नाहीत आणि कार्यालय नाही यांचाही विचार करावे लागेल.आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, दूधगंगा धरणाच्या पाण्याचे लेखापरीक्षण करावे लागेल. ज्याचा हक्क आहे त्यालाच पाणी मिळाले पाहिजे. हे पाणी दुसऱ्या कोणत्याही संस्थेला ज्यांचा या धरणाच्या लाभ क्षेत्राशी काही संबंध नाही त्यांना का द्यायचे? असा सवाल केला. तीव्र लढा उभारून शासनाशी संघर्ष करू. एकवेळ सरकारच्या विरोधात लढाई उभारू पण शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहू असे आश्वासन त्यांनी दिले.माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, आंदोलन करावे लागले तरी हरकत नाही. शेती आणि पिण्यासाठी लागणारे पाणी हे येथील मूळ शेतकऱ्यांच्या हक्काचे आहे. त्यांच्यासाठी आम्ही ताकदीने मदत करू. सुळकुड योजनेचा घाट थांबवा नाही तर शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.यावेळी सत्यजित जाधव, भूषण पाटील, नामदेव चौगले, शहाजी पाटील, बापू किल्लेदार, प्रकाश पोवार, संभाजी देसाई, सिकंदर मुल्लाणी, सागर कोंडेकर, यांनी मनोगते मांडली. यावेळी अध्यक्ष नेताजी पाटील, बिद्री संचालक युवराज वारके, प्रभाकर पाटील, एकनाथ पाटील, नाना पाटील, अरुण जाधव, फिरोजखान पाटील, लहुजी जरग, नानासो पाटील, युवराज वारके, हिंदुराव चौगले, अरुण जाधव, अशोकराव फराकटे, रंगराव किल्लेदार उपस्थित होते.

...तर भावी पिढी माफ करणार नाहीआमच्या आजोबा, पणजोबा यांनी दूधगंगा धरण उभारण्यासाठी संघर्ष केला. या धरणाचे पाणी कर्नाटक, कोल्हापूरला जाते. आता निसर्ग लहरी आहे. पाऊस झालेला नाही. जर हे पाणी सगळे पळवून नेणार असतील, आणि आपण ते थांबवू शकलो नाही तर भावी पिढी तुम्हाला माफ करणार नाही, असे मत सागर कोंडेकर व प्रभाकर पाटील यांनी व्यक्त केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीWaterपाणी