शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

हे दसऱ्याचे भाषण नव्हे शिमग्याचे : ​​​​​चंद्रकांत पाटील यांची उद्धव यांच्यावर सडकून टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 18:07 IST

BJP , Uddhav Thackeray, Maratha Reservation, chandrakant patil, kolhapurnews हे दसऱ्याचे भाषण नव्हे शिमग्याचे भाषण होते, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. त्यावेळी महाराष्ट्र शासनाच्यावतीने एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता.याचा त्यांनी यावेळी निषेधही केला.

ठळक मुद्देहे दसऱ्याचे भाषण नव्हे शिमग्याचे : ​​​​​चंद्रकांत पाटील यांची उद्धव यांच्यावर सडकून टीका मराठा आरक्षणाबाबत गांर्भिय नसल्याने सरकारचा निषेध

कोल्हापूर : ​​​​​हे दसऱ्याचे भाषण नव्हे शिमग्याचे भाषण होते, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

मराठा आरक्षणापासून महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार पहिल्या दिवसापासून पळ काढत असल्याचा आरोप  यावेळी पाटील यांनी केला. आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होती. त्यामध्ये पुढची तारीख पडल्यानंतर कोल्हापुरात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र शासनाचा निषेधही केला.

दसऱ्यादिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणाबाबत विचारले असता पाटील म्हणाले, हे त्यांचे दसऱ्याचे भाषण नव्हते तर ते शिमग्याचे भाषण होते. सत्तेवर आल्यानंतर काही कामच केले नाही तर ते सांगणार काय ? त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा सन्मान ठेवला नाही. त्यामुळे मग शेण, गोमूत्र, काळ्या टोपीखालील डोके यावर ते बोलले. मात्र शेतकरी, महापूर, अतिवृष्टी, कर्जमाफी याबाबत ते काहीही बोलले नाहीत.पाटील म्हणाले, आज सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाबाबतचा प्रकार पाहिल्यानंतर हे सरकार पहिल्या दिवसापासून मराठा आरक्षणापासून पळ काढत असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. आज दोन नंबरला केस होती. ती पुकारली तेव्हा त्यावेळी महाराष्ट्र शासनाच्यावतीने एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता.

न्यायाधीशांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली; परंतु प्रश्नाचे महत्त्व ओळखून त्यांनी नंतर पुन्हा सुनावणी घेतली. यावेळी शासनाने चार आठवड्यांची मुदत मागितली आणि पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही याचिका चालावी, अशी इच्छा प्रदर्शित केली. मात्र, यासाठीची जी पूर्वतयारी करणे गरजेची होती ती अजिबात नव्हती.

संबंधित मंत्री, ॲडव्होकेट जनरल, त्यांना इनपूट देणारे आणखी काही तज्ज्ञ वकील, या क्षेत्रांतील जाणकार यातील कुणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे आता चार आठवडे पुन्हा सारे शांत होणार आहे. आता जो युक्तिवाद होईल तो पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे होईल. तोपर्यंत महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रवेश, विविध परीक्षा, नोकरी भरती सर्व काही ठप्प होणार आहे. आम्ही एवढी ताकद लावली होती की १ वर्ष सर्वोच्च न्यायालयातील केस चालवली असे ते म्हणाले.या पत्रकार परिषदेला भाजपचे कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेkolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षण