शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

उत्तर कर्नाटकातील कारखानेही देणार एकरकमी एफआरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:45 AM

राम मगदूम । लोकमत न्यूज नेटवर्क गडहिंग्लज/बेळगाव : सांगली जिल्ह्यांप्रमाणे एकरकमी एफआरपी देण्याबरोबर गेल्या हंगामातील ऊसदराच्या फरकाची थकीत रक्कम ...

राम मगदूम ।लोकमत न्यूज नेटवर्कगडहिंग्लज/बेळगाव : सांगली जिल्ह्यांप्रमाणे एकरकमी एफआरपी देण्याबरोबर गेल्या हंगामातील ऊसदराच्या फरकाची थकीत रक्कम देण्यास उत्तर कर्नाटकातील साखर कारखानदारांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या उपस्थितीत झालेल्या शेतकरी संघटना प्रतिनिधींच्या संयुक्त बैठकीत मान्यता दिली. त्यामुळे ऊसदराच्या प्रश्नांवरून दीड महिन्यांपासून बंद असलेले बागलकोट जिल्ह्यातील कारखाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने कारखानदारांनी निश्वास सोडला तर एकरकमी एफआरपीची हमी मिळाल्याने सीमाभागातील शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली बंगलोर येथील मंत्रालयात ही संयुक्त बैठक झाली. महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिव राजेंद्र गड्यान्नावर, कर्नाटकातील ऊस बागायतदार शांतकुमार, रयत संघटनेचे गंगाधर यांनी त्यांच्यासमोर सीमाभागासह उत्तर कर्नाटकातील ऊस उत्पादकांच्या व्यथा मांडल्या.बेळगाव व बागलकोट जिल्ह्यातील कारखानदारांनी गेल्या हंगामात स्वत:हून जाहीर केलेल्या दरातील थकीत ऊसबिलाची रक्कम सुमारे ७०० ते ८०० कोटी इतकी असून ती तातडीने मिळालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी करण्यात आली. त्यासंदर्भात लवकरच संबंधित कारखानदारांची स्वतंत्र बैठक बोलावून थकीत रक्कम अदा करण्याची सूचना केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.तोडणी-वाहतुकीचा खर्च, उसाचे वजन व साखर उताºयात शेतकºयांची फसवणूक होत असल्याचा मुद्दा संघटनांनी जोरदारपणे मांडला. त्यावर नियंत्रणासाठी स्वतंत्र समिती नेमण्याची मागणी झाली. त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.मुख्यमंत्री कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर, साखरमंत्री के. जे. जॉर्ज, सार्वजनिक बांधकाम मंत्री एच. डी. रेवण्णा, आरोग्य व ऊर्जामंत्री डी. के. शिवकुमार, मुख्य सचिव विजय भास्कर, साखर आयुक्त अजय नागभूषण यांच्यासह संबंधित जिल्हाधिकारी व अधिकाºयांसह शेतकरी उपस्थित होते.चर्चेतील ठळक मुद्देबेळगाव, बागलकोट, विजापूर, धारवाड, दावणगिरी, गुलबर्गा व मंड्या या जिल्ह्यातील साखर कारखानदार बैठकीस उपस्थित होते.उसाचा दर जागेवरच ठरवावा व नेट एफआरपी मिळावी आणि एफआरपीचा बेस ९.५० टक्क्यांवरून पूर्वीप्रमाणे १० टक्के करण्यात यावा, अशी मागणी झाली. यासंदर्भात केंद्राकडे शिफारस करून मंजुरीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील उसाइतकीच बेळगाव जिल्ह्यातील कृष्णा खोरे पट्ट्यातील उसाची रिकव्हरी असल्यामुळे महाराष्ट्राइतकीच व एकरकमी एफआरपी मिळावी, अशी ‘स्वाभिमानी’सह सर्व रयत संघटनांची मागणी होती.त्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी कागवाड, निपाणी, मुधोळ, बागलकोट आदी ठिकाणी मेळावे घेऊन जनजागृती केली होती. त्यामुळे सीमाभागातील अनेक शेतकरीदेखील या बैठकीस आवर्जून उपस्थित होते.