शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

वरुणराजा रुसला, कोल्हापुरात गेल्या २१ दिवसांत थेंबही नाही बरसला; पिकांची वाढ खुंटली

By राजाराम लोंढे | Updated: September 2, 2023 14:22 IST

कृषी विभागाकडून नुकसानीचा नजर अंदाज

राजाराम लोंढेकोल्हापूर : गेल्या २१ दिवसांत शिरोळ तालुक्यातील ‘शिरोळ’ व ‘कुरुंदवाड’ या मंडळांत पावसाचा एक थेंबही झालेला नाही. त्यामुळे सोयाबीन, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले असून वाढ खुंटली आहे. कृषी विभागाने पिकांच्या नुकसानीचा नजर अंदाजाचे काम सुरू केले असून विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसानभरपाई मिळणार आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही कमी-अधिक प्रमाणात पिकांना झटका बसला असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.मान्सूनच्या गेल्या तीन महिन्यांत जेमतेम महिनाभर पाऊस झाला असून दोन महिने पावसाचा लपंडाव सुरू आहे. मुळात पेरण्या उशिरा झाल्याने सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पिकांची मुळे कोवळी असल्याने त्यांना पाण्याची गरज आहे. मात्र, पाऊस नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. आज पाऊस सुरू होईल, उद्या सुरू होईल, या आशेवर शेतकरी रोज आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. कडकडीत ऊन पडत असल्याने चिंता वाढली असून, मोठ्या कष्टाने जगवलेली पिके डोळ्यांसमोर करपू लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले आहे.

शिरोळ तालुक्यातील दोन मंडळांमध्ये तब्बल २१ दिवसांपासून पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. जिल्ह्यातील बहुतांश मंडळांमध्ये ८ ते १० दिवस पाऊसच नाही.पिकांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

जिथे पाण्याची सोय आहे, तिथे पाणी देऊन तर जिथे नाही तिथे घागरीने पाणी आणून पिकांना जगवण्याची धडपड शेतकऱ्याची सुरू आहे.कृषी अधिकाऱ्यांचे दौरे सुरू

पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या अधिकारी दौऱ्यावर असून तालुकानिहाय आढावा घेऊन उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.पावसाचा अंदाज आणि ढगाळ वातावरण

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस होताना दिसत नाही. शुक्रवारपासून तुरळक पावसाची शक्यता वर्तविली होती. मात्र, दिवसभर ढगाळ वातावरण राहिले, काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या आहेत. मंगळवारपासून (दि. ५) जिल्ह्यात पावसाला सुरुवात होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.कमी वाढीवर फुलोरा येण्याचा धोकावाढ सुरू असताना पाणी मिळाले नाहीतर पूर्ण वाढ होणार नाही. त्यामुळे वाढ न होताच शेंगा, फुलोरा येण्याचा धोका अधिक असल्याचे मत कृषी विभागाचे आहे.

शेततळ्याला महत्त्व आलेशासनाने मागेल त्याला शेततळे देण्याची योजना आणली आहे. मात्र, जिल्ह्यातून त्याला अत्यल्प प्रतिसाद आहे. पावसाच्या काळात शेततळी भरून ठेवली असती तर त्याचा वापर आता करता आला असता, त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेततळ्याचे महत्त्व कळले आहे.

पावसाने ओढ दिल्याने माळरान, डोंगरमाथ्यावरील खरीप अडचणीत आले आहे. पाण्याची सोय आहे, त्या शेतकऱ्यांनी पाणी देण्याची गरज आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस सुरु होईल, असा अंदाज आहे. - दत्तात्रय दिवेकर (जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसFarmerशेतकरी