शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

वरुणराजा रुसला, कोल्हापुरात गेल्या २१ दिवसांत थेंबही नाही बरसला; पिकांची वाढ खुंटली

By राजाराम लोंढे | Updated: September 2, 2023 14:22 IST

कृषी विभागाकडून नुकसानीचा नजर अंदाज

राजाराम लोंढेकोल्हापूर : गेल्या २१ दिवसांत शिरोळ तालुक्यातील ‘शिरोळ’ व ‘कुरुंदवाड’ या मंडळांत पावसाचा एक थेंबही झालेला नाही. त्यामुळे सोयाबीन, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले असून वाढ खुंटली आहे. कृषी विभागाने पिकांच्या नुकसानीचा नजर अंदाजाचे काम सुरू केले असून विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसानभरपाई मिळणार आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही कमी-अधिक प्रमाणात पिकांना झटका बसला असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.मान्सूनच्या गेल्या तीन महिन्यांत जेमतेम महिनाभर पाऊस झाला असून दोन महिने पावसाचा लपंडाव सुरू आहे. मुळात पेरण्या उशिरा झाल्याने सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पिकांची मुळे कोवळी असल्याने त्यांना पाण्याची गरज आहे. मात्र, पाऊस नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. आज पाऊस सुरू होईल, उद्या सुरू होईल, या आशेवर शेतकरी रोज आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. कडकडीत ऊन पडत असल्याने चिंता वाढली असून, मोठ्या कष्टाने जगवलेली पिके डोळ्यांसमोर करपू लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले आहे.

शिरोळ तालुक्यातील दोन मंडळांमध्ये तब्बल २१ दिवसांपासून पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. जिल्ह्यातील बहुतांश मंडळांमध्ये ८ ते १० दिवस पाऊसच नाही.पिकांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

जिथे पाण्याची सोय आहे, तिथे पाणी देऊन तर जिथे नाही तिथे घागरीने पाणी आणून पिकांना जगवण्याची धडपड शेतकऱ्याची सुरू आहे.कृषी अधिकाऱ्यांचे दौरे सुरू

पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या अधिकारी दौऱ्यावर असून तालुकानिहाय आढावा घेऊन उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.पावसाचा अंदाज आणि ढगाळ वातावरण

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस होताना दिसत नाही. शुक्रवारपासून तुरळक पावसाची शक्यता वर्तविली होती. मात्र, दिवसभर ढगाळ वातावरण राहिले, काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या आहेत. मंगळवारपासून (दि. ५) जिल्ह्यात पावसाला सुरुवात होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.कमी वाढीवर फुलोरा येण्याचा धोकावाढ सुरू असताना पाणी मिळाले नाहीतर पूर्ण वाढ होणार नाही. त्यामुळे वाढ न होताच शेंगा, फुलोरा येण्याचा धोका अधिक असल्याचे मत कृषी विभागाचे आहे.

शेततळ्याला महत्त्व आलेशासनाने मागेल त्याला शेततळे देण्याची योजना आणली आहे. मात्र, जिल्ह्यातून त्याला अत्यल्प प्रतिसाद आहे. पावसाच्या काळात शेततळी भरून ठेवली असती तर त्याचा वापर आता करता आला असता, त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेततळ्याचे महत्त्व कळले आहे.

पावसाने ओढ दिल्याने माळरान, डोंगरमाथ्यावरील खरीप अडचणीत आले आहे. पाण्याची सोय आहे, त्या शेतकऱ्यांनी पाणी देण्याची गरज आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस सुरु होईल, असा अंदाज आहे. - दत्तात्रय दिवेकर (जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसFarmerशेतकरी