शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

Kolhapur: राजकीय स्टंटबाजीने 'पंचगंगा शुद्धीकरण' गढूळ; नुसता आवाज उठवायचा, प्रत्यक्षात पाठपुरावा नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 13:25 IST

अतुल आंबी इचलकरंजी : खासदार धैर्यशील माने यांनी पंचगंगा नदीमध्ये उतरून ‘नमामि पंचगंगा’ असा नारा देत नदी प्रदूषणाबद्दल आवाज ...

अतुल आंबीइचलकरंजी : खासदार धैर्यशील माने यांनी पंचगंगा नदीमध्ये उतरून ‘नमामि पंचगंगा’ असा नारा देत नदीप्रदूषणाबद्दल आवाज उठविला. त्यापाठोपाठ आमदार प्रकाश आवाडे यांनीही नदी प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे दाखवले. परंतु गेल्या पाच वर्षात प्रत्यक्षात नदी प्रदूषणाबाबत ठोस उपाययोजना झाल्याच नाहीत. त्यामुळे शहरवासीयांच्या उशाला नदी असताना शुद्ध व मुबलक पाण्यासाठी गावोगाव भटकावे लागत आहे. याच मुद्द्यावरून अनेक गावांमधून इचलकरंजीला पाणी देण्यासाठी विरोधही होत आहे.पंचगंगा नदी प्रदूषित झाल्याने इचलकरंजी शहरवासीयांनी सन २००१ साली कृष्णा पाणी योजना राबवली. ४५ दशलक्ष लिटर उपसा असलेल्या या योजनेतून सध्या ३६ द.लि. पाणी शहरामध्ये पोहोचते. त्याचबरोबर पंचगंगा नदीवरील जुन्या सन १९६५ च्या योजनेतून नऊ ते बारा दशलक्ष लिटर पाणी मिळते. दोन्ही योजनेतून मिळणारे ४२ ते ४५ दशलक्ष लिटर पाणी शुद्धीकरण करून दोन ते चार दिवसाआड शहरवासीयांना पुरवले जाते. हे पाणी पुरत नसल्याने सन २०५० सालची लोकसंख्या गृहीत धरून नव्याने ६९ दशलक्ष लिटरची योजना राबविण्याचा निर्णय घेत सध्या सुळकूड-दूधगंगा योजनेतून पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु या योजनेलाही विरोध होत आहे.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पंचगंगा नदी शुद्धीकरण करून गैबी बोगद्याद्वारे येणारे काळम्मावाडीचे शुद्ध पाणी शहरासाठी घ्या अथवा जुनी कृष्णा योजना बळकट करून तेथून कृष्णेचे पाणी घ्या, असा प्रस्ताव मांडला. त्यावर कृष्णा नदीत पंचगंगा नदीचे पाणी ज्याठिकाणी मिसळते, तेथून काही अंतरावरून इचलकरंजीचे मजरेवाडी उपसा केंद्र आहे. त्यामुळे शहराला सध्या पंचगंगेचे प्रदूषित पाणी मिळत असल्याचे शहरातील प्रतिनिधींनी सांगितले. त्यावर मुश्रीफ यांनी शिरटी येथून उपसा करण्याचा सल्ला दिला. ही माहिती समजताच शिरटीहून ही विरोध सुरू झाला.हा सर्व खटाटोप पंचगंगा नदी प्रदूषित असल्याने सुरू आहे. शहरालगत पंचगंगा नदी असताना फक्त ती प्रदूषित झाली असल्याने अन्य गावांतून दुसऱ्या नदीतील पाणी आणण्यासाठी जंग जंग पछाडावे लागत आहे. त्यात लोकप्रतिनिधींचे राजकारण घुसल्याने विरोधाला विरोध सुरू झाला आहे. या प्रदूषणाला इचलकरंजी कारणीभूत असल्याने ग्रामीण भागांतून विरोधाला जोर लागला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून योजना राबवून दुसऱ्या नदीतून पाणी आणायचे आणि ते प्रदूषित करून पंचगंगा नदीत सोडायचे आणि ग्रामीण भागातील जनतेने प्रदूषित पाणी प्यायचे हा प्रकार योग्य नाही, अशी भावनाही ग्रामीण भागांतून व्यक्त होते.जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पंचगंगाा नदी शुद्धीकरणासाठी एकत्रित आणि प्रामाणिक प्रयत्न केल्यास नदी प्रदूषण रोखणे शक्य आहे. संपूर्ण पंचगंगा नदीकाठावरील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. तसेच शेतीला आणि जनावरांनाही शुद्ध पाणी मिळेल. पण त्यासाठी राजकारण विरहित चळवळ राबवावी लागेल.

महापालिकेच्या उपाययोजनाही तोकड्यामहापालिकेने शहरातील निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर चाप लावण्यासाठी नळाला तोट्या बसवणे, यासारख्या कोणत्याच ठोस उपाययोजना केल्या नाहीत. त्यानंतर निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणाही तोकडी आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अनेकवेळा नोटिसा मिळूनही म्हणाव्या तशा हालचाली झाल्या नाहीत.

शेती व जनावरांनाही प्रदूषित पाणीपंचगंगा नदीकाठावरील शेती आणि जनावरांना प्रदूषित पाणी दिले जाते. त्यातून मिळणारे उत्पादनही प्रदूषित स्वरुपाचे मिळते. त्यातून अनेकांना विविध आजारांना बळी पडावे लागत आहे. याचा फारसा गांभीर्याने विचार शासन पातळीवरही होत नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण