शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
3
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
4
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
5
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
6
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
7
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
8
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
9
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
10
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
11
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
12
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
13
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
14
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
15
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
16
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
17
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
18
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
19
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
20
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज

Kolhapur: राजकीय स्टंटबाजीने 'पंचगंगा शुद्धीकरण' गढूळ; नुसता आवाज उठवायचा, प्रत्यक्षात पाठपुरावा नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 13:25 IST

अतुल आंबी इचलकरंजी : खासदार धैर्यशील माने यांनी पंचगंगा नदीमध्ये उतरून ‘नमामि पंचगंगा’ असा नारा देत नदी प्रदूषणाबद्दल आवाज ...

अतुल आंबीइचलकरंजी : खासदार धैर्यशील माने यांनी पंचगंगा नदीमध्ये उतरून ‘नमामि पंचगंगा’ असा नारा देत नदीप्रदूषणाबद्दल आवाज उठविला. त्यापाठोपाठ आमदार प्रकाश आवाडे यांनीही नदी प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे दाखवले. परंतु गेल्या पाच वर्षात प्रत्यक्षात नदी प्रदूषणाबाबत ठोस उपाययोजना झाल्याच नाहीत. त्यामुळे शहरवासीयांच्या उशाला नदी असताना शुद्ध व मुबलक पाण्यासाठी गावोगाव भटकावे लागत आहे. याच मुद्द्यावरून अनेक गावांमधून इचलकरंजीला पाणी देण्यासाठी विरोधही होत आहे.पंचगंगा नदी प्रदूषित झाल्याने इचलकरंजी शहरवासीयांनी सन २००१ साली कृष्णा पाणी योजना राबवली. ४५ दशलक्ष लिटर उपसा असलेल्या या योजनेतून सध्या ३६ द.लि. पाणी शहरामध्ये पोहोचते. त्याचबरोबर पंचगंगा नदीवरील जुन्या सन १९६५ च्या योजनेतून नऊ ते बारा दशलक्ष लिटर पाणी मिळते. दोन्ही योजनेतून मिळणारे ४२ ते ४५ दशलक्ष लिटर पाणी शुद्धीकरण करून दोन ते चार दिवसाआड शहरवासीयांना पुरवले जाते. हे पाणी पुरत नसल्याने सन २०५० सालची लोकसंख्या गृहीत धरून नव्याने ६९ दशलक्ष लिटरची योजना राबविण्याचा निर्णय घेत सध्या सुळकूड-दूधगंगा योजनेतून पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु या योजनेलाही विरोध होत आहे.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पंचगंगा नदी शुद्धीकरण करून गैबी बोगद्याद्वारे येणारे काळम्मावाडीचे शुद्ध पाणी शहरासाठी घ्या अथवा जुनी कृष्णा योजना बळकट करून तेथून कृष्णेचे पाणी घ्या, असा प्रस्ताव मांडला. त्यावर कृष्णा नदीत पंचगंगा नदीचे पाणी ज्याठिकाणी मिसळते, तेथून काही अंतरावरून इचलकरंजीचे मजरेवाडी उपसा केंद्र आहे. त्यामुळे शहराला सध्या पंचगंगेचे प्रदूषित पाणी मिळत असल्याचे शहरातील प्रतिनिधींनी सांगितले. त्यावर मुश्रीफ यांनी शिरटी येथून उपसा करण्याचा सल्ला दिला. ही माहिती समजताच शिरटीहून ही विरोध सुरू झाला.हा सर्व खटाटोप पंचगंगा नदी प्रदूषित असल्याने सुरू आहे. शहरालगत पंचगंगा नदी असताना फक्त ती प्रदूषित झाली असल्याने अन्य गावांतून दुसऱ्या नदीतील पाणी आणण्यासाठी जंग जंग पछाडावे लागत आहे. त्यात लोकप्रतिनिधींचे राजकारण घुसल्याने विरोधाला विरोध सुरू झाला आहे. या प्रदूषणाला इचलकरंजी कारणीभूत असल्याने ग्रामीण भागांतून विरोधाला जोर लागला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून योजना राबवून दुसऱ्या नदीतून पाणी आणायचे आणि ते प्रदूषित करून पंचगंगा नदीत सोडायचे आणि ग्रामीण भागातील जनतेने प्रदूषित पाणी प्यायचे हा प्रकार योग्य नाही, अशी भावनाही ग्रामीण भागांतून व्यक्त होते.जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पंचगंगाा नदी शुद्धीकरणासाठी एकत्रित आणि प्रामाणिक प्रयत्न केल्यास नदी प्रदूषण रोखणे शक्य आहे. संपूर्ण पंचगंगा नदीकाठावरील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. तसेच शेतीला आणि जनावरांनाही शुद्ध पाणी मिळेल. पण त्यासाठी राजकारण विरहित चळवळ राबवावी लागेल.

महापालिकेच्या उपाययोजनाही तोकड्यामहापालिकेने शहरातील निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर चाप लावण्यासाठी नळाला तोट्या बसवणे, यासारख्या कोणत्याच ठोस उपाययोजना केल्या नाहीत. त्यानंतर निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणाही तोकडी आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अनेकवेळा नोटिसा मिळूनही म्हणाव्या तशा हालचाली झाल्या नाहीत.

शेती व जनावरांनाही प्रदूषित पाणीपंचगंगा नदीकाठावरील शेती आणि जनावरांना प्रदूषित पाणी दिले जाते. त्यातून मिळणारे उत्पादनही प्रदूषित स्वरुपाचे मिळते. त्यातून अनेकांना विविध आजारांना बळी पडावे लागत आहे. याचा फारसा गांभीर्याने विचार शासन पातळीवरही होत नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण