शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

शेतीची नवे विधेयके शेतकऱ्यांना उद‌्ध्वस्त करणारी : डॉ. गणेश देवी यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 18:31 IST

पंतप्रधान मोदी यांच्या भांडवलदारधार्जिण्या धोरणामुळे देशाची तिजोरी तिरडीवर पोहोचली आहे, अशी टीका राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी गुरुवारी येथे केली. सुधारित तीन शेती विधेयके शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणारी आहेत. त्यांना विरोध करण्यासाठी पक्ष, गट-तट विसरून रस्त्यावर उतरा; नाही तर पुढील ५० वर्षे परिणाम भोगा, असा इशाराही त्यांनी दिला.

ठळक मुद्देशेतीची नवे विधेयके शेतकऱ्यांना उद‌्ध्वस्त करणारीडॉ.गणेश देवी यांचा इशारा : गटतट विसरून रस्त्यावर उतरा

कोल्हापूर : पंतप्रधान मोदी यांच्या भांडवलदारधार्जिण्या धोरणामुळे देशाची तिजोरी तिरडीवर पोहोचली आहे, अशी टीका राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी गुरुवारी येथे केली. सुधारित तीन शेती विधेयके शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करणारी आहेत. त्यांना विरोध करण्यासाठी पक्ष, गट-तट विसरून रस्त्यावर उतरा; नाही तर पुढील ५० वर्षे परिणाम भोगा, असा इशाराही त्यांनी दिला.पंतप्रधान मोदी यांनी बहुमताच्या जोरावर संसदेत शेतीची तीन सुधारित विधेयके मंजूर करून घेतली आहेत. याला देशभरातील शेतकरी तीव्र विरोध करीत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रसेवा दलाच्या सोशल फोरमअंतर्गत जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. शेतकरी व संबंधित घटकामध्ये या विधेयकाविषयी वस्तुस्थिती मांडावी म्हणून गणेश देवी हे गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत.कोल्हापुरात आल्यानंतर गुरुवारी सकाळी ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांची भेट घेऊन ते बाजार समितीत आयोजित अडते, व्यापारी, शेतकरी यांच्या बैठकीला आले. त्यांच्याशी संवाद साधताना नवीन कायदे आणि त्यांचे बाजार समितीच्या घटकांवर होणारे परिणाम यांचे विस्तृत विवेचन करून गाफील राहू नका. तीव्र लढ्यासाठी सज्ज राहा असे त्यांनी आवाहन केले. प्रा. जालंधर पाटील यांनी प्रास्ताविक केले. धनाजी गुरव, सूर्यकांत पाटील यांनी मनोगत मांडले. मोहन सालपे यांनी आभार मानले. 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डkolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र