शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

यंत्रमागाचे आधुनिकीकरण गरजेचे, इचलकरंजीत यंत्रमागधारकांचा मेळावा : नरेशकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 12:50 AM

साध्या यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आधुनिकीकरणाशिवाय पर्याय नाही. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना उपलब्ध आहेत.

ठळक मुद्देशासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा

इचलकरंजी : साध्या यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आधुनिकीकरणाशिवाय पर्याय नाही. यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना उपलब्ध आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी यंत्रमागधारकांनी पुढे आले पाहिजे. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही प्रभारी वस्त्रोद्योग आयुक्त नरेशकुमार यांनी दिली.

येथील घोरपडे नाट्यगृहात केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशनच्यावतीने आयोजित यंत्रमागधारकांच्या मेळाव्यात तेबोलत होते. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर व नगराध्यक्षा अलका स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.

नरेशकुमार म्हणाले, बदलत्या काळानुसार व्यवसायात आवश्यक बदल करून घेणे हे बाजारात टिकून राहण्यासाठी गरजेचे असते. त्यासाठी साध्या यंत्रमागधारकांनी त्याचे आधुनिक रॅपियर यंत्रमागातरूपांतर करावे. त्यासाठी केंद्र सरकार ५० टक्के, राज्य सरकार ३५ टक्के व स्वभांडवल १५ टक्के अशीयोजना आहे. त्याचबरोबर सूताच्या कृत्रिम दरवाढीला पर्याय म्हणून किमान ११ यंत्रमागधारकांनी एकत्रित येऊन यार्न बॅँक सुरू करावी. त्यांच्याकडून जेवढे भांडवल एकत्रित होईल, तेवढेच भांडवल केंद्र सरकार देणार आहे. याचा सूत खरेदीसाठी उपयोग करावा. कारखानदारांनी एकत्रित येऊन ग्रुपशेड पद्धतीने व्यवसाय करावा. त्यासाठीही योजना आहेत.

वीज बचत करून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सरकारच्या योजनेचा लाभ घेऊन कारखान्यावर सोलर पॅनेल बसवावे. कामगारांसाठी असलेल्या विमा योजनेचाही लाभ घ्यावा. अशा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी यंत्रमागधारकांनी पुढे यावे, असे आवाहन केले.

आमदार हाळवणकर यांनी, उद्योगधंद्यात राजकारण आणणाऱ्यांच्या नादाला यंत्रमागधारकांनी लागू नये. आपल्या धंद्यावर लक्ष केंद्रित करावे. सरकारने पाच टक्के व्याजात सवलत जाहीर केली आहे. आगामी अधिवेशनात वीज दराबाबतही सवलत जाहीर करेल. यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. साध्या यंत्रमागाचे आधुनिकीकरण केल्यास उत्पादन वाढणार आहे. तसेच आवाज कमी, दुरुस्ती खर्च कमी, गती जास्त त्यामुळे उत्पादन वाढून उत्पन्न व पर्यायाने नफा वाढणार आहे. त्यासाठी ६५ पार्ट बदलून साध्या यंत्रमागाचे आधुनिक मागात रूपांतर होते, ते करण्याचा संकल्प यंत्रमागधारकांनी करावा. त्यातून नक्कीच व्यवसायाला गती मिळेल, असे आवाहन केले.

मेळाव्यात नरेंद्र वन्नम, पी. ए. कुलकर्णी, सुरेश इंगळे, किसन पवार, अशोक स्वामी, आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी अजित जाधव, दीपक राशिनकर, आदींसह प्रमुख पदाधिकारी, तसेच यंत्रमागधारक उपस्थित होते.पथदर्शी प्रकल्पकेंद्र व राज्य शासनामार्फत साध्या यंत्रमागाचे आधुनिक यंत्रमागात रूपांतर करण्यासाठी सुरू केलेली ही योजना इचलकरंजी, सोलापूर, भिवंडी, नागपूर या चार शहरांसाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून शासनाने सुरू केली आहे.

इचलकरंजीत यंत्रमागधारकांच्या मेळाव्यात प्रभारी वस्त्रोद्योग आयुक्त नरेशकुमार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अजित जाधव, दीपक राशिनकर, सुरेश हाळवणकर, अलका स्वामी, अशोक स्वामी, नरेंद्र वन्नम, आदी उपस्थित होते.