शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
3
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
4
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
5
टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

ऐतिहासिक चित्रपट बनवताना मर्यादेचे भान आवश्यक : सुभाष घई, कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पत्रकारांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 6:12 PM

आपण ऐतिहासिक आणि पौराणिक कथा ऐकत मोठे झाले, त्या संस्कारात वाढलो. त्यामुळे ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करताना त्यातील प्रतिमांना धक्का न लावता मर्यादेचे भान राखा असा सल्ला ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांनी गुरूवारी दिला. कोल्हापुरातील शाहु स्मारक भवनात आयोजित कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त कोल्हापूर दौºयावर आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कलामहर्षि बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, सचिव दिलीप बापट उपस्थित होते.

ठळक मुद्देसुभाष घई यांचा कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात संवाद ऐतिहासिक चित्रपट बनवताना मर्यादेचे भान आवश्यक : घई

कोल्हापूर : आपण ऐतिहासिक आणि पौराणिक कथा ऐकत मोठे झाले, त्या संस्कारात वाढलो. त्यामुळे ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करताना त्यातील प्रतिमांना धक्का न लावता मर्यादेचे भान राखा असा सल्ला ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांनी गुरूवारी दिला.कोल्हापुरातील शाहु स्मारक भवनात आयोजित कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कलामहर्षि बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, सचिव दिलीप बापट उपस्थित होते.सुभाष घई म्हणाले, चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे नव्हे तर जागृतीचे सशक्त माध्यम आहे. भारतीय संस्कृतीत मर्यादा आणि संस्कांचे अनन्य साधारण महत्व असल्याने आपला देश विविधतेने नटला आहे. व्यक्ती, जाती, धर्म आणि विचारांची भिन्नता असणे स्वाभाविक आहे. 

दिग्दर्शक एक कथा चित्रपटातून रसिकांपुढे मांडत असतो. पण ती कथा जेंव्हा इतिहासातील सत्य घटनेवर आधारित असते तेंव्हा वैयक्तिक न राहता समाजावर परिणामकारक असते. त्यामुळे सत्य घटना सांगण्यासाठी मनोरंजनांचा आधार घेतला गेला किंवा दिग्दर्शकाने स्वत:ची कल्पना त्यात वापरली तरी ती एका मर्यादेत राहिली पाहीजे.

आपल्या कलाकृतीमुळे एखाद्याचे समाधानच होणार नसेल तो विषयच हाताळू नये. मात्र लोकही चित्रपट पाहण्याआधीच तर्क आणि निर्णय लावून मोकळे होतात. प्रत्येक क्षेत्रात चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात. चांगले चित्रपट यादगार बनतात.युट्युबसारख्या सोशल मिडियावर थेट प्रसारित होणाऱ्या चित्रपटांबद्दल ते म्हणाले, हे माध्यमे तर चित्रपटांचे भविष्य आहेत. नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण कलाकृती जगासमोर नेऊ शकतो. माध्यम कोणताही असो त्याचा महोत्सव झाला पाहीजे. रसिकांना, अभ्यासकांना आणि यात करिअर करू इच्छिणाऱ्यांना त्याचे ज्ञान मिळाले पाहीजे.

राम गबाले माझे गुरू...यावेळी त्यांनी कोल्हापूरबद्दल विशेष कोतुकोदगार काढले. ते म्हणाले, मी व्ही. शांताराम यांचे चित्रपट पाहत मोठा झालो. राम गबाले हे तर माझे गुरू होते. मी या क्षेत्रात प्रगती करू शकलो त्यात मराठी चित्रपटांचा मोठा वाटा आहे.

भारतीय सिनेमात कलामहर्षि बाबूराव पेंटर यांच्यासह अनेक कोल्हापूरकरांनी मोलाचे योगदान दिले आहे. आजच्या पिढीला याबद्दल अज्ञान आहे, त्यांना पुन्हा या क्षेत्राकडे वळवायचे असेल तर किफ्फ सारखे चित्रपट महोत्सव झाले पाहीजे. मी आजवर तीन मराठी चित्रपट बनवले आहेत त्यातील संहिता या किफ्फमध्ये प्रदर्शित होत आहे.

स्वत:मधले गुण ओळखा..यावेळी झालेल्या कार्यशाळेत त्यांनी तरुणाईला स्वत:मधील गुण ओळखून करीअरची वाट निवडण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, शाळा, महाविद्यालयांमधले पुस्तकी ज्ञान मिळाले की चांगली नोकरी मिळते यासाठी शिकू नका, तर त्यासोबत कलेचे कौशल्यही आत्मसात करा.

आवडीच्या क्षेत्रात सिनेमा पाहिले की मुलं बिघडतात या विचारसरणीच्या सामान्य कुटूंबातून मी या क्षेत्रात आलो आणि यशस्वी झालो. त्यामुळे स्वप्न बघा आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या. शॉर्टकटने काहिही मिळणार नाही. यश मिळवण्यासाठी संघर्ष करावाच लागेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरentertainmentकरमणूक