शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

सोने दरातील स्थिरतेसाठी सट्टेबाजार रोेखण्याची गरज

By admin | Updated: March 1, 2015 23:18 IST

फत्तेचंद रांका यांचे आवाहन -- थेट संवाद

गेल्या दीड-दोन वर्षात सोन्याच्या दरात प्रचंड चढ-उतार होत आहे. याची कारणे काय? सोन्याचा दर उतरणार असल्याच्या अफवाही पसरत आहेत. याला प्रमुख कारणे कोणती? सोन्याचे सध्याचे आणि आगामी महत्त्व कसे असणार, त्यामधील गुंतवणूक उपयुक्त आहे काय, सोन्याचे ग्राहक आता जमीन, शेअर मार्केट, कारखानदारी व आॅटोमोबाईल क्षेत्राकडे वळत आहेत. त्याचा परिणाम काय होत आहे, आदी विषयांवर सराफ, सुवर्णकार फेडरेशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला संवाद...---प्रश्न : गेल्या दीड-दोन वर्षापासून सोन्याच्या दरात प्रचंड चढ-उतार होत आहे. याची कारणे काय? उत्तर : गेल्या दोन वर्षापासून ‘एमसीएक्स’नुसार (मेटल कमोडिटी एक्स्चेंज) आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामध्ये गुंतवणूक होत आहे. यामध्ये एकप्रकारे सट्टाबाजारच चालतो. यानुसार सोन्यामध्ये तीस टक्के रक्कम भरुन आॅनलाईन सोने खरेदी करता येऊ शकते. त्यानंतर तीन महिन्यामध्ये ते विकता येऊ शकते. अशाप्रकारे हा सट्टा चालू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आता अशाप्रकारे सट्टेबाजार करणाऱ्यांची ‘लॉबी’ तयार झाली आहे. ही लॉबी सोन्याचा दर पाडणे, चढविणे आदी अफवा पसरविणे आदी प्रकार करीत आहे. यावर सर्व देशांनी बंधन घालायला हवे. त्यानंतरच सोन्याचा दर मागणी व पुरवठ्यानुसार ठरून सोन्याच्या दराला स्थिरता प्राप्त होईल. प्रश्न : सोन्यामधील गुंतवणूक कमी होऊन ती जमिनीसह इतर क्षेत्रात होताना दिसते? उत्तर : सोन्यामधील गुंतवणूक कमी होत आहे, ही चुकीची माहिती आहे. गेल्या दोन ते तीन वर्षात भारताची सोन्याची आयात वर्षाला ४८५ टनावरुन आता तब्बल ९०० टनावर गेली आहे. खरेदीदारांची संख्या वाढल्याशिवाय इतकी आयात कशी वाढेल. दुसऱ्या बाजूला ज्वेलर्स दुकानांचीही संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. सोन्यामधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षेची गुंतवणूक समजली जाते. सोने असणे म्हणजेच तुमचे ‘एटीएम’मध्ये पैसे असण्यासारखे आहे. जगाच्या पातळीवर सोने ही अशी वस्तू आहे, की ज्याला सर्वत्र महत्त्व आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक ही वाढतच जाणार आहे. प्रश्न : सोन्यातील गुंतवणूक ही प्रगतीला पोषक नाही, असे बऱ्याच अर्थतज्ज्ञांचे मत आहे?उत्तर : सुवर्ण बाजारपेठ भारतासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. कलाकुसरीच्या दागिन्यांसाठीही भारतीय बाजारपेठ जगात प्रसिध्द आहे. शासनाने सोन्याची निर्यात वाढविण्यासाठी उपाययोजना करायला हव्यात. त्यामुळे परकीय चलनही मिळेल, रोजगारही मिळेल. आपला प्रमुख व्यवसाय असतानाही चीन, जपान यांनी या क्षेत्रात आपलीे निर्यात वाढवून अर्थव्यवस्था सुधारली आहे. आपल्याकडे जे पिकते, ते विकायला हवे. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था किती मजबूत आहे, हे त्याच्या सोन्याच्या साठ्यावरच ठरविले जात आहे. त्यामुळे यामधील गुंतवणूक ही अनावश्यक म्हणता येणार नाही.प्रश्न : आपल्याकडील गलई व्यवसाय नुकसानीत जात आहे, याची कारणे काय आहेत?उत्तर : आपल्याकडील गलई व्यावसायिकांनी अत्याधुनिकतेची कास धरली पाहिजे. यामध्ये आता अत्याधुनिक यंत्रणा आल्या आहेत. त्यांचा वापर केला पाहिजे. इतर ठिकाणी याचा वापर सुरु झाल्यामुळेच याचा फटका आपल्याला बसत आहे. प्रश्न : सराफ व्यावसायिकांच्या मुख्य समस्या काय आहेत? उत्तर : सराफ व्यवसाय सध्या अनेक समस्यांमधून जात आहे. कामगार कायदे खूपच अडचणीचे ठरत आहेत. एलबीटीसह विविध करांच्या जाळ्यात या व्यवसायाला अडकविण्यात आले आहे. सुरक्षिततेचाही प्रश्न सर्वत्र आहेच. यासाठी आपल्या संघटनेकडून कोणती काळजी घ्यायला हवी, याचे प्रबोधन करण्यात येत आहे. पोलिसांचाही अनेकदा चौकशीच्या नावाखाली ससेमिरा असतो. यालाही बंधने घालायला हवीत. हॉलमार्कच्याही अडचणी आहेत. यातून मार्ग काढायला हवा.प्रश्न : सुवर्ण बाजारपेठेचे भविष्यातील अस्तित्व काय असणार आहे?उत्तर : आगामी किमान २५ ते ३० वर्षे सोन्याचे महत्त्व हे निश्चितच महत्त्वपूृर्ण असणार आहे. भारतामध्ये सोन्याला धार्मिक अधिष्ठान आहे. लग्नात किमान दोन तोळे तरी सोन्याची गरज भासतेच. वर्षाला प्रत्येक जिल्ह्यात २५ ते ३० हजार लग्ने होतात. सोन्याची पूजा केली जाते. यामुळे भविष्यातही याचे महत्त्व अबाधित राहणार आहे. सोने हे केवळ आभूषण, सौंदर्याचे लेणेच नव्हे, तर किमती वस्तू आहे. प्रसंगी तुमची जमीन, मालमत्ता याच्यापेक्षाही सोन्याला महत्त्व आहे आणि हे महत्त्व जगाच्या पाठीवर सर्वत्रच आहे.अंजर अथणीकर