अहिल्यादेवींच्या विचारांचा जागर घालण्याची गरज - ए. वाय. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST2021-06-01T04:18:46+5:302021-06-01T04:18:46+5:30

कोल्हापूर : देशाला आज अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची फार गरज असून, त्यासाठी त्यांच्या विचारांचा जागर घातला पाहिजे, असे प्रतिपादन ...

The need to awaken the thoughts of Ahilya Devi - a. Y. Patil | अहिल्यादेवींच्या विचारांचा जागर घालण्याची गरज - ए. वाय. पाटील

अहिल्यादेवींच्या विचारांचा जागर घालण्याची गरज - ए. वाय. पाटील

कोल्हापूर : देशाला आज अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची फार गरज असून, त्यासाठी त्यांच्या विचारांचा जागर घातला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९६ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष शिरीष देसाई. भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष कृष्णात पुजारी, दत्तात्रय हजारे, प्रा. राजेंद्र कोळेकर, प्रा. लक्ष्मण करपे, महादेव सनगर आदींनी मनोगत व्यक्त केले. कोल्हापूर दक्षिण विधानसभा भटक्या विमुक्त सेलच्या अध्यक्ष म्हणून सचिन जाधव यांना नियुक्त पत्र देण्यात आले.

संतोष जाधव, गणेश पवार, हरिभाऊ काळे, अर्जुन जाधव, मंजुनाथ माने, मच्छिंद्र बनसोडे, विकास घागरे, संभाजी पाटील, संभाजी हराळे आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अनिल साळाेखे, ए. वाय. पाटील आदी उपस्थित होते. (फोटो- ३१०५२०२१-कोल-एनसीपी)

Web Title: The need to awaken the thoughts of Ahilya Devi - a. Y. Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.