शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोल्हापूर जिल्ह्यात अठरा बंधारे पाण्याखाली, पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 18:06 IST

गेले दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्यांचे पाणी पात्राबाहेर फेकले गेले आहे. तब्बल अठरा बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात अठरा बंधारे पाण्याखालीशाहूवाडी, राधानगरी, आजरा, चंदगडसह गगनबावड्यात अतिवृष्टी पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर

कोल्हापूर : गेले दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्यांचे पाणी पात्राबाहेर फेकले गेले आहे. तब्बल अठरा बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

शाहूवाडी, राधानगरी, आजरा, चंदगडसह गगनबावड्यात अतिवृष्टी झाली असून, धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत आहे. ‘घटप्रभा’ व ‘कोदे’ धरण तुडुंब झाले असून, सहा धरणे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत.पाऊस एकसारखा सुरू नसला तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. पंधरा-वीस मिनिटे येणाऱ्या सरीने सगळीकडे पाणीच पाणी होते. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४४.९७ मिलिमीटर पाऊस झाला.

शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, आजरा व चंदगड तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून, गगनबावड्यात तब्बल १०५.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.

घटप्रभा व कोदे धरण पूर्ण भरल्याने त्यातून अनुक्रमे प्रतिसेकंद ५४१८ घनफूट व ५९९ घटफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीला फुग आली आहे. नद्यांचे पाणी पात्राबाहेर फेकले जात आहे. ‘तुळशी’, ‘वारणा’, ‘कासारी’, ‘कडवी’, ‘कुंभी’, ‘जांबरे’ ही सहा धरणे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत.

पंचगंगेची पातळी २८ फुटांपर्यंत गेली असून, तब्बल १८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील एस. टी.सह इतर वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी असला तरी ग्रामीण भागात अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत.‘तरणा’ जोरदार बरसणार!शुक्रवारी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी सूर्याने ‘पुनर्वसू’ नक्षत्रात प्रवेश केला. या नक्षत्र काळात पडणाºया पावसाला ‘तरणा’ पाऊस म्हणतात. वाहन ‘बेडूक’ असल्याने ‘तरणा’ जोरदार बरसण्याची शक्यता आहे.

दीड लाखाचे नुकसानशुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात आठ कच्च्या तर तीन पक्क्या घरांची पडझड झाली आहे. यामध्ये दीड लाखाचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

प्रमुख धरणातील पाणी साठा ‘टीएमसी’ व टक्केवारी-धरण                         क्षमता                        सध्याचा साठा                   टक्केवारीराधानगरी                   ८.३६१                                      ३.४८                         ४२तुळशी                        ३.४७१                                       १.८५                         ५३वारणा                         ३४.३९९                                    १८.४७                       ५४दूधगंगा                       २५.३९३                                     ९.८६                        ३९कासारी                          २.७७४                                     १.४३                        ५२कडवी                             २.५१६                                     १.५८                        ६३कुंभी                               २.७१५                                     १.५४                        ५७पाटगाव                          ३.७१६                                     १.७८                        ४८चिकोत्रा                           १.५२२                                     ०.२०                      १३चित्री                               १.८८६                                     ०.६६                      ३५ 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर