शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
4
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
5
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
6
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
7
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
8
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
9
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
10
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
11
Beauty Jha : संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
12
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
13
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
14
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
15
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
16
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
17
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
18
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
19
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
20
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात अठरा बंधारे पाण्याखाली, पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 18:06 IST

गेले दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्यांचे पाणी पात्राबाहेर फेकले गेले आहे. तब्बल अठरा बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात अठरा बंधारे पाण्याखालीशाहूवाडी, राधानगरी, आजरा, चंदगडसह गगनबावड्यात अतिवृष्टी पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर

कोल्हापूर : गेले दोन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्यांचे पाणी पात्राबाहेर फेकले गेले आहे. तब्बल अठरा बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

शाहूवाडी, राधानगरी, आजरा, चंदगडसह गगनबावड्यात अतिवृष्टी झाली असून, धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत आहे. ‘घटप्रभा’ व ‘कोदे’ धरण तुडुंब झाले असून, सहा धरणे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत.पाऊस एकसारखा सुरू नसला तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. पंधरा-वीस मिनिटे येणाऱ्या सरीने सगळीकडे पाणीच पाणी होते. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४४.९७ मिलिमीटर पाऊस झाला.

शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, आजरा व चंदगड तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून, गगनबावड्यात तब्बल १०५.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.

घटप्रभा व कोदे धरण पूर्ण भरल्याने त्यातून अनुक्रमे प्रतिसेकंद ५४१८ घनफूट व ५९९ घटफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीला फुग आली आहे. नद्यांचे पाणी पात्राबाहेर फेकले जात आहे. ‘तुळशी’, ‘वारणा’, ‘कासारी’, ‘कडवी’, ‘कुंभी’, ‘जांबरे’ ही सहा धरणे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक भरली आहेत.

पंचगंगेची पातळी २८ फुटांपर्यंत गेली असून, तब्बल १८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील एस. टी.सह इतर वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी असला तरी ग्रामीण भागात अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत.‘तरणा’ जोरदार बरसणार!शुक्रवारी सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी सूर्याने ‘पुनर्वसू’ नक्षत्रात प्रवेश केला. या नक्षत्र काळात पडणाºया पावसाला ‘तरणा’ पाऊस म्हणतात. वाहन ‘बेडूक’ असल्याने ‘तरणा’ जोरदार बरसण्याची शक्यता आहे.

दीड लाखाचे नुकसानशुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात आठ कच्च्या तर तीन पक्क्या घरांची पडझड झाली आहे. यामध्ये दीड लाखाचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

प्रमुख धरणातील पाणी साठा ‘टीएमसी’ व टक्केवारी-धरण                         क्षमता                        सध्याचा साठा                   टक्केवारीराधानगरी                   ८.३६१                                      ३.४८                         ४२तुळशी                        ३.४७१                                       १.८५                         ५३वारणा                         ३४.३९९                                    १८.४७                       ५४दूधगंगा                       २५.३९३                                     ९.८६                        ३९कासारी                          २.७७४                                     १.४३                        ५२कडवी                             २.५१६                                     १.५८                        ६३कुंभी                               २.७१५                                     १.५४                        ५७पाटगाव                          ३.७१६                                     १.७८                        ४८चिकोत्रा                           १.५२२                                     ०.२०                      १३चित्री                               १.८८६                                     ०.६६                      ३५ 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर