शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी म्हणजे ‘भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी’; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 05:36 IST

राष्ट्रवादी काँग्रेस ‘भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी’ असून त्यांनी केलेला भ्रष्टाचार ओकायला लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिला.

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस ‘भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी’ असून त्यांनी केलेला भ्रष्टाचार ओकायला लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून माघार घेतली. पवार म्हणतात की, सर्जिकल स्ट्राइक माझ्याच सल्ल्याने झाला. मग तुमच्या सल्ल्याने चालणारे सरकार सत्तेत येणार असेल तर पवार यांच्या राष्ट्रवादी काँगे्रसनेच लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.भाजपा-शिवसेना-रिपाइं युतीच्या महाराष्ट्रातील प्रचाराचा प्रारंभ येथील तपोवन मैदानावर जनसमुदायाच्या साक्षीने झाला. लोकसभेचे मतदान ही फक्त औपचारिकता राहिली असून राज्यातील सर्व ४८ जागा आम्हीच जिंकू, असा विश्वास युतीच्या नेत्यांनी व्यक्त केला. सर्व नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरच टीकेची झोड उठवली व काँग्रेसला बेदखल केले.सभेला कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने लोक आले होते. सभेत मुख्यमंत्री व ठाकरे यांनीही भारताने केलेल्या हवाई हल्ल्याचे जोरदार समर्थन केले व युतीचा या निवडणुकीतील प्रचार हिंदुत्वाभोवतीच केंद्रित होणार असल्याचे स्पष्ट केले.मुख्यमंत्री म्हणाले, कोल्हापूर हे शक्तिपीठ असल्यानेच आम्ही प्रचाराची सुरुवात येथून केली. हे परिवर्तन आता राज्यभर घडणार आहे. काँग्रेसवाल्यांनी काल ५६ पक्षांच्या आघाडीची घोषणा केली. रस्त्यावर दिसेल त्याला पक्षात घेऊन ही आघाडी बनली आहे. देश चालवायला ५६ पक्ष नव्हे तर ५६ इंचाची छाती लागते. तुमच्या कॅप्टननेच माढ्यातून माघार घेतली. उमेदवार मिळेना झालेत. त्यामुळे युतीचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे.सातारा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने माथाडी कामगारांचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार नरेंद्र पाटील यांना पक्षात घेऊन त्यांची उमेदवारी जाहीर केली. शरद पवार यांना कृपा करून भाजपामध्ये घेऊ नका, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करून ठाकरे म्हणाले, कोल्हापूरची आजची सभा ही विजयाची मुहूर्तमेढ रोवणारी आहे. पुन्हा सत्तेत आल्यावर आम्ही अयोध्येत राममंदिर उभारल्याशिवाय राहणार नाही. आमची सत्ता आल्यावर पंतप्रधान मोदीच होतील परंतु तुमच्या ५६ पक्षांच्या कडेबोळ््याकडे उमेदवार कोण आहे, हे एकदा सांगावे. पश्चिम महाराष्ट्रातून युतीच्या खासदारांची रांग लागलेली दिसेल.सभेस केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, रासपचे महादेव जानकर, कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भाषणे झाली. आमदार सुरेश हाळवणकर यांनी संयोजन केले. सभेला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांसह पश्चिम महाराष्ट्रातीलदोन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.लंगोटही काढून घेतले..बारामतीचा पोपट असा पुनरुच्चार करून मुख्यमंत्र्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. ते म्हणाले, हा पोपट नव्याने बोलू लागला आहे. त्याचे कपडे आम्ही विधानसभेला व महापालिका निवडणुकीत उतरविले. आता उरलासुरला लंगोटही उद्धव यांनी काढून घेतला. त्यामुळे आता तुम्ही शांत घरी बसा, सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका.गिरीश महाजन यांची धडकीगिरीश महाजन यांनी इतके बॉम्ब लावले की त्यांना नुसतं बघितले तरी विरोधकांना धडकी भरते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapurकोल्हापूर