शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

राष्ट्रवादी म्हणजे ‘भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी’; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 05:36 IST

राष्ट्रवादी काँग्रेस ‘भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी’ असून त्यांनी केलेला भ्रष्टाचार ओकायला लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिला.

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस ‘भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी’ असून त्यांनी केलेला भ्रष्टाचार ओकायला लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून माघार घेतली. पवार म्हणतात की, सर्जिकल स्ट्राइक माझ्याच सल्ल्याने झाला. मग तुमच्या सल्ल्याने चालणारे सरकार सत्तेत येणार असेल तर पवार यांच्या राष्ट्रवादी काँगे्रसनेच लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.भाजपा-शिवसेना-रिपाइं युतीच्या महाराष्ट्रातील प्रचाराचा प्रारंभ येथील तपोवन मैदानावर जनसमुदायाच्या साक्षीने झाला. लोकसभेचे मतदान ही फक्त औपचारिकता राहिली असून राज्यातील सर्व ४८ जागा आम्हीच जिंकू, असा विश्वास युतीच्या नेत्यांनी व्यक्त केला. सर्व नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरच टीकेची झोड उठवली व काँग्रेसला बेदखल केले.सभेला कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने लोक आले होते. सभेत मुख्यमंत्री व ठाकरे यांनीही भारताने केलेल्या हवाई हल्ल्याचे जोरदार समर्थन केले व युतीचा या निवडणुकीतील प्रचार हिंदुत्वाभोवतीच केंद्रित होणार असल्याचे स्पष्ट केले.मुख्यमंत्री म्हणाले, कोल्हापूर हे शक्तिपीठ असल्यानेच आम्ही प्रचाराची सुरुवात येथून केली. हे परिवर्तन आता राज्यभर घडणार आहे. काँग्रेसवाल्यांनी काल ५६ पक्षांच्या आघाडीची घोषणा केली. रस्त्यावर दिसेल त्याला पक्षात घेऊन ही आघाडी बनली आहे. देश चालवायला ५६ पक्ष नव्हे तर ५६ इंचाची छाती लागते. तुमच्या कॅप्टननेच माढ्यातून माघार घेतली. उमेदवार मिळेना झालेत. त्यामुळे युतीचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे.सातारा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने माथाडी कामगारांचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार नरेंद्र पाटील यांना पक्षात घेऊन त्यांची उमेदवारी जाहीर केली. शरद पवार यांना कृपा करून भाजपामध्ये घेऊ नका, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करून ठाकरे म्हणाले, कोल्हापूरची आजची सभा ही विजयाची मुहूर्तमेढ रोवणारी आहे. पुन्हा सत्तेत आल्यावर आम्ही अयोध्येत राममंदिर उभारल्याशिवाय राहणार नाही. आमची सत्ता आल्यावर पंतप्रधान मोदीच होतील परंतु तुमच्या ५६ पक्षांच्या कडेबोळ््याकडे उमेदवार कोण आहे, हे एकदा सांगावे. पश्चिम महाराष्ट्रातून युतीच्या खासदारांची रांग लागलेली दिसेल.सभेस केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, रासपचे महादेव जानकर, कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भाषणे झाली. आमदार सुरेश हाळवणकर यांनी संयोजन केले. सभेला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांसह पश्चिम महाराष्ट्रातीलदोन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.लंगोटही काढून घेतले..बारामतीचा पोपट असा पुनरुच्चार करून मुख्यमंत्र्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. ते म्हणाले, हा पोपट नव्याने बोलू लागला आहे. त्याचे कपडे आम्ही विधानसभेला व महापालिका निवडणुकीत उतरविले. आता उरलासुरला लंगोटही उद्धव यांनी काढून घेतला. त्यामुळे आता तुम्ही शांत घरी बसा, सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका.गिरीश महाजन यांची धडकीगिरीश महाजन यांनी इतके बॉम्ब लावले की त्यांना नुसतं बघितले तरी विरोधकांना धडकी भरते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapurकोल्हापूर