शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

नागपंचमी विशेष: दिसला साप की ठेचा डोकं, असं कशाला? 

By संदीप आडनाईक | Updated: July 29, 2025 13:59 IST

हा आरोग्याचा सण आहे, हे जाणून घेतले पाहिजे.

संदीप आडनाईक कोल्हापूर : समाजात साप या सरपटणाऱ्या वन्यप्राण्याविषयी अनेक गैरसमजुती आहेत. बिनविषारी सापांना विषारी समजून मारले जाणे, साप डूख धरतो अशा अंधश्रद्धांमुळे किडकं, लांबडं, जनावर असे संबोधून समोर साप दिसला की घ्या काठी अन् ठेचा डोकं या मानसिकतेमुळे शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या सापाकडे शत्रू म्हणून पाहिले जात आहे; पण नागपंचमीनिमित्ताने गोडधोड केले जाते, त्यामुळे हा आरोग्याचा सण आहे, हे जाणून घेतले पाहिजे.नागपंचमीला सर्वांचे विशेषत: महिलांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी चांगल्या प्रथा आहेत, त्याचे पालन केले पाहिजे. या दिवशी लाह्यांचा नैवेद्य दिला जातो. घरात कोणताही पदार्थ चिरणे, भाजणे, कापणे आणि तळणे वर्ज्य असते, जमीन खणत नाहीत. कोकणात गोमाटीच्या वेलीचीही पूजा केली जाते. गोमाटी, राजीगरा यांसारख्या रानभाज्यांचे पदार्थ केले जातात.

चंदगड भागात दिवाळीसारखा फराळ केला जातो. यामागे आरोग्य जपण्याचा हेतू आहे. शिवाय साप हे शीतरक्ताचे सजीव आहेत, त्यामुळे त्यांना स्वतःच्या शरीराचे तापमान स्वतः नियंत्रित करता येत नाही. तो मांसाहारी सजीव आहे. त्यामुळे तो दूध पीत नाही.कुंभार समाजाचा पुढाकारनागपंचमीचे महत्त्व व पूर्वपरंपरा आजही ग्रामीण भागात मोठी आहे. कुंभार समाज पारंपरिक पद्धतीने पाच व सातफड्यांचे मातीचे नाग पूजेसाठी उत्तमरीत्या बनवीत असतात. परंतु, वास्तवात असे नाग नसतात, याची जनजागृती निसर्गमित्र संस्थेने सात वर्षांपासून केली. त्यांना पटवून दिल्यामुळे आता एक फड्याचे मातीचे नाग कुंभार समाज विक्रीसाठी ठेवत आहे. शाहूपुरीतील मंगल पुरेकर यांनी या नागपंचमीनिमित्त तब्बल १००० मातीचे एकफड्याचे नाग तयार केले आणि ते विकले जात आहेत.

चंदगड भागात नागपंचमीला भाजलेले पदार्थ केले जातात. कापणे, चिरणे, जाळले जात नाहीत. कोणत्याही सजीवाला इजा केली जात नाही. भाजणी, राजीगरा, चिरमुरे, खोबरे, रवा आणि कडक लाडवांचा, लाह्यांचा आणि फळांचा आहारात समावेश असतो. २१ दिवस दिवाळीसारखे फराळ केले जातात. कोणत्याही यंत्राचा वापर केला जात नाही. - शोभा तळसंदेकर, चंदगड.अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आता कुंभार समाजातील काहीजणांनी पुढाकार घेतला आहे. ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आता कुंभार समाजातील काहीजणांनी पुढाकार घेतला आहे. - अनिल चौगुले, निसर्गप्रेमी.