शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी सोलापूरच्या मुस्लिम बांधवांची धावाधाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 14:21 IST

महाराष्ट्रात पूरग्रस्तांच्या मदतीचेही मार्केटींग आणि त्यावर टीका-टीप्पणी सुरू असतानाच शेजारच्या कर्नाटकातील मुस्लिम बांधव आपल्या हातातील कामधंदा बाजूला ठेवून सीमाभागातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी धावाधाव करीत आहेत. मानवतेचे हे पुजारी आहेत हुक्केरी तालुक्यातील संकेश्वरजवळील सोलापूरचे..!

ठळक मुद्देपूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी सोलापूरच्या मुस्लिम बांधवांची धावाधाव !सीमाभागातील पूरग्रस्तांना पुरवताहेत तयार गरम जेवण

गडहिंग्लज : महाराष्ट्रात पूरग्रस्तांच्या मदतीचेही मार्केटींग आणि त्यावर टीका-टीप्पणी सुरू असतानाच शेजारच्या कर्नाटकातील मुस्लिम बांधव आपल्या हातातील कामधंदा बाजूला ठेवून सीमाभागातील पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी धावाधाव करीत आहेत. मानवतेचे हे पुजारी आहेत हुक्केरी तालुक्यातील संकेश्वरजवळील सोलापूरचे..!सीमाभागातील गडहिंग्लज आणि हुक्केरी तालुक्यातील नदीकाठच्या अनेक गावांना हिरण्यकेशी नदीच्या महापुराचा मोठा फटका बसला. निम्मीच्या निम्मी गाव पाण्यात बुडाली. शेकडो घर जमीनदोस्त झाली. गुरा-ढोरासह घर सोडायची वेळ अनेकांवर आली. त्यामुळे शेजारधर्म म्हणून आजूबाजूच्या गावची माणसं मदतीला धावून येताहेत.कोण धान्य घेवून येतो तर कोण जनावरांना वैरण आणतो आहे. परंतु, सोलापूरचे मुस्लिम बांधव भाजी-भाकरीच तयार जेवण आणून स्वत: वाढतात.सोलापूर येथे मुस्लिम समाजाची ३५० कुटुंबे आहेत. सर्व मंडळी अडी-अडचणीच्यावेळी एकमेकांच्या मदतीला न बोलावता धावून जातात. पैशाअभावी कुणा गरीबाच शुभकार्य थांबणार नाही, याची काळजी घेतात. समाजातील गरीब माणसाच्या अंत्यविधीचा खर्चही वर्गणी काढून करतात. म्हणूनच त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पूरग्रस्तांना जेवण देण्याचे काम हाती घेतले आहे.गडहिंग्लज तालुक्यातील हिटणी, हेब्बाळ, नूल, हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर, कोचरी, कुरणी, बस्तवाड या गावातील पूरग्रस्तांना त्यांनी जेवण दिले. कांही गावात खीर आणि शिरकुर्माही वाटला. जेवणाची भांडी ने-आण करण्यासाठी दीपक लोहार व अब्दुल मकानदार हे आपली वाहने मोफत देत आहेत. हसनभाई मुल्ला व नसरूद्दीन सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सिकंदर जमादार, मलिक मुल्ला, बशीर सुतार, मुझफ्फर मुल्ला, वासीम मदारखान, शब्बीर मदारखान यांच्यासह सर्व समाजबांधव हे काम उत्स्फूर्तपणे करीत आहेत.

हसनभाई देतात दूधप्रगतशील शेतकरी हसनभाई मुल्ला यांनी गोठा पद्धतीने ५० गायी पाळल्या आहेत. त्यांनी आपले संपूर्ण दूध पूरग्रस्तांसाठी देवू केले आहे. त्यातून खीर व शिरकुर्मा करून पूरग्रस्तांना वाटला जात आहे.

 घरा-घरातून भाकऱ्याघरा-घरातून प्रत्येकी १० भाकऱ्या गोळा केल्या जातात. भाजी, भात व आमटी एकाच ठिकाणी बनविली जाते. आचारी सिकंदर जमादार हे काम विनामोबदला करीत आहेत.

प्रसिद्धीपासून दूर..!आमच नाव, फोटो कांही नको. पण, कुठल्या गावाला जेवण लागल तर जरूर सांगा, आम्ही हजर आहोत, असं ते अत्यंत विनयाने सांगतात. त्यांच्या माणुसकीच्या जागराने दान-धर्मातही आपली छबी ठेवणाऱ्यांना चपराक मिळाली आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरSolapurसोलापूरMuslimमुस्लीम