शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

गोकुळमध्ये मुरलीधर जाधव यांना पुन्हा संधी शक्य, न्यायालयात येत्या बुधवारी निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 11:40 IST

राज्यात सत्तांतर झाल्यावर २१ सप्टेंबर २०२२ च्या आदेशान्वये त्यांचे पद रद्द करण्यात आले

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या शासन नियुक्त संचालकपदी मुरलीधर जाधव यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयात यासंदर्भात येत्या बुधवारी (दि.२५) न्यायमूर्ती के. एच. श्रीराम व राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. बुधवारी (दि.१८) झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने जाधव यांची नियुक्ती रद्द करण्याचा आदेश मागे घेता की आम्ही आदेश द्यायला हवा अशी विचारणा करून सरकारला फटकारले आहे. पुढील सुनावणीपर्यंत नवीन संचालकाची नियुक्ती करू नये, असेही बजावले.गोकुळमध्ये सत्तांतर होऊन सतेज पाटील-हसन मुश्रीफ गटाची सत्ता आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाधव यांची शासन नियुक्त प्रतिनिधी म्हणून ९ जुलै २०२१ ला नियुक्ती केली. या जागेवर सत्तारूढ गटाला वीरेंद्र मंडलिक यांना संधी द्यायची होती. त्यामुळे जाधव यांना अगोदर महाविकास आघाडीतच संघर्ष करावा लागला. पुढे त्यांना सत्तेत सामावून घेण्यात आले. संचालक मंडळाच्या काही बैठकांना ते उपस्थित राहिले. राज्यात सत्तांतर झाल्यावर २१ सप्टेंबर २०२२ च्या आदेशान्वये त्यांचे पद रद्द करण्यात आले. त्यास त्यांनी २८ सप्टेंबरला उच्च न्यायालयात आव्हान दिले. बुधवारी झालेल्या सुनावणीत सरकारने आम्हांला नेमणुकीचा अधिकार आहे तसा तो ती रद्द करण्याचाही असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले. न्यायालयाने त्यास हरकत घेतली. जाधव यांची नियुक्ती निबंधकांनी केली आहे व नियुक्ती रद्दचा आदेश उपसचिवांनी काढला. उपसचिव हे निबंधक आहेत का अशी विचारणा न्यायालयाने केली. ज्या कायद्यानुसार त्यांची नियुक्ती केली त्या कायद्यामध्ये त्यांना काढून टाकण्याची काय तरतूद आहे अशी विचारणा न्यायालयाने केली. सरकारने केलेली नियुक्ती सरकार बदलले म्हणून बदलता येणार नाही अशीही टिप्पणी न्यायालयाने केली. त्यांनी संस्थेच्या हितास बाधा पोहोचवली असल्यास तशी निबंधकांनी त्यांना नोटीस बजावून त्यात त्यांच्यासह गोकुळचेही म्हणणे घ्यायला हवे होते असेही न्यायालयाने म्हटले.

पदासाठी चढाओढमुख्यमंत्री शिंदे गटात आलेले खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र, खासदार धैर्यशील माने गटा़चे झाकीरहुसेन भालदार आणि महाडिक गटाचे तानाजी पाटील यांनी या जागेसाठी ताकद लावली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर खासदार माने यांच्या बंगल्यावर मुरलीधर जाधव यांनी काढलेला मोर्चा या सगळ्याच्या मुळाशी आहे. त्यामुळे जाधवच राहतात की नव्याला संधी मिळते याबद्दल उत्सुकता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul Milkगोकुळ