कोल्हापूर: कोल्हापुरात मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच व्हावे या मागणीसाठी गेल्या ४० वर्षापासून सुरु असलेल्या लढ्याला अखेर आज यश आले. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांनी आज शुक्रवार (दि.१) याबाबतचे नोटिफिकेशन प्रसिद्ध केले. यानिर्णयानंतर वकिलांनी कोल्हापुरात एकच जल्लोष केला. सर्किट बेंच मंजूर झाल्याने सहा जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वाचा- सरन्यायाधीश गवई यांची शाहू छत्रपतींनी घेतली होती चार दिवसापुर्वीच भेट
मुंबईला जाण्याचा फेरा वाचणार
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांची नियुक्ती झाल्यापासून खंडपीठ मंजुरीच्या प्रक्रियेला अधिक वेग आला होता. सर्किट बेंचमुळे कोल्हापूरच्या विकासाला गती येणार आहे. सहा जिल्ह्यांतील वकील आणि पक्षकारांचा ओघ वाढणार असल्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. मुंबईला जाण्याचा फेरा वाचणार असल्याने पक्षकारांनाही याचा मोठा फायदा होणार आहे.