शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: सुळकूड पाणी योजनेबाबत समिती नेमण्याच्या हालचाली, मुंबईत आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 12:19 IST

इचलकरंजी व कागलचे बैठकीकडे लक्ष

अतुल आंबीइचलकरंजी : इचलकरंजी-सुळकूड पाणी योजना अंमलबजावणीसंदर्भात तोडगा काढण्यासाठी संयुक्त समिती नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत. परंतु समिती नेमून निर्णय होईपर्यंत आचारसंहिता लागल्यास पुन्हा हा प्रश्न प्रलंबित राहणार आहे. तिसऱ्या पर्यायाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदार, खासदार आणि कृती समिती एकत्रित ताकद लावून हा प्रश्न सोडवतात की, कोणत्या पर्यायी मार्गात अडकतात, याकडे लक्ष लागले आहे.

शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे, यासाठी संघर्ष सुरू आहे. दानोळी योजनेला विरोधानंतर सुळकूड योजना मंजूर झाली. मात्र, तेथील नागरिकांनी विरोध केला. सुमारे १६० कोटींचा निधी मंजूर होऊनही या योजनेची अंमलबजावणी झालेली नाही. इचलकरंजीतील नागरिक योजना व्हावी यासाठी आंदोलनांच्या माध्यमातून संघर्ष करीत आहेत. दूधगंगा काठावरील नागरिकांनी इचलकरंजीला पाणी देण्यास विरोध केला आहे. त्यासाठी तेथेही आंदोलने केली जात आहेत.साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या इचलकरंजीला पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दोन्हींकडील लोकप्रतिनिधी तसेच आंदोलनाशी संबंधित कृती समितीमधील सातजणांना आज, शुक्रवारी बैठकीसाठी निमंत्रित केले आहे. दोन्ही ठिकाणची परिस्थिती पाहता संयुक्त समिती नियुक्तीच्या हालचाली शासन पातळीवर सुरू आहेत. तसेच शहराला पाणी देण्यासाठी तिसरा पर्याय कोणता निघू शकतो, याबाबतही चर्चा होणार आहे.समिती नियुक्ती करून योजनेबाबत अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करून पुन्हा चर्चेच्या बैठका होत राहिल्यास आचारसंहिता लागून हा प्रश्न भिजत राहू शकतो. शहरातील जनतेचा रोष पाहता याचा थेट फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता असल्याने शासन दरबारी बैठक लावून या विषयाची धार कमी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदार प्रकाश आवाडे, खासदार धैर्यशील माने यांच्यासह कृती समितीमधील प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी शहराच्या पाणीप्रश्नासाठी एकमत करून शासनावर दबाव निर्माण करण्याची गरज आहे. त्यामध्ये दुफळी राहिल्यास मूळ विषयाला बगल मिळू शकते. त्यामुळे मंजूर योजनेवर सर्वजण ठाम राहणे आवश्यक आहे.राजकारणविरहित निर्णय आवश्यकया योजनेच्या मंजुरीनंतर कागल तालुक्यातून विरोध सुरू झाला. त्यामध्ये तेथील लोकप्रतिनिधींनी उडी घेतल्याने राजकीय वक्तव्ये सुरू झाली. त्यापाठोपाठ शहरातील आमदार, खासदार आणि कृती समिती यांच्यामध्येही राजकीय टीकाटिप्पणी सुरू झाली. प्रत्येक आंदोलनात होणाऱ्या घोषणाबाजीतही विरोधाभास जाणवला. या घडामोडींतून योजना मात्र लटकून राहिली. त्यामुळे या बैठकीतून राजकारणविरहित निर्णय व्हावा, अशी नागरिकांना अपेक्षा आहे.कृती समितीमधील सातजणांना निमंत्रणस्थानिक आमदार, खासदार यांच्यासह सत्ताधारी पक्षातील इचलकरंजीतील प्रतिनिधींना मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीसाठी बोलविले आहे. कृती समितीमधील प्रताप होगाडे, मदन कारंडे, संजय कांबळे, सयाजी चव्हाण, सागर चाळके, राहुल खंजिरे, अभिजीत पटवा या सातजणांना निमंत्रित केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी