शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

उर्दू माध्यमातील निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांची सातवीनंतर सुट्टीच, सर्वाधिक मुलींची संख्या

By भीमगोंड देसाई | Updated: December 20, 2024 12:41 IST

शैक्षणिक भविष्य अंधकारमय, हायस्कूल, कॉलेजची संख्या कमी

भीमगोंडा देसाईकोल्हापूर : शहरातील महापालिकेच्या उर्दू माध्यमात शिकणाऱ्या १०५३ पैकी सातवीनंतर केवळ ४०२ विद्यार्थीच बारावीपर्यंत शिक्षण घेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. निम्याहून अधिक म्हणजे तब्बल ६५१ विद्यार्थी पुढील शिक्षणाला कायमस्वरूपी सुटी देत आहेत. शाळा सोडलेली मुले बालवयातच आई, वडिलांसोबत कष्टाची किंवा फळे, भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करताना दिसतात. मुलींची लग्न करून दिली जातात. हुशार असून, हे विद्यार्थी पुढील शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

राजर्षी शाहू महाराज यांनी त्या काळी सर्व समाजांतील मुले शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी जातीनिहाय वसतिगृह सुरू केली. शिक्षणाला प्रोत्साहन दिले. मात्र काळाच्या ओघात बदल करीत केलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढते आहे. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी काही महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत पहिलीपासून इंग्रजी, सेमी इंग्रजी सुरू केले आहे. या शाळांचा नावलौकिकही आहे. पण उर्दू शाळांमध्ये असा बदल झाला नाही.पाचपैकी एका शाळेत सेमी इंग्रजीचा प्रयोग झाला. पण तो फारसा यशस्वी झाला नाही. म्हणून तब्बल १०५३ विद्यार्थी उर्दू माध्यमातून शिक्षण घेतात. पण सातवीनंतर निम्याहून अधिक विद्यार्थी पुढील शिक्षण घेत नाहीत. बारावीनंतर उर्दूतून पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अधिकृत आकडेवारीही उपलब्ध नाही, इतकी अनास्था शासकीय शिक्षण प्रशासनामध्ये आहे.

उर्दू माध्यमातील विद्यार्थी संख्या..- पहिली ते सातवीपर्यंत : १०५३मुले : ४०७मुली : ६४६- सातवी ते बारावीपर्यंत : ४०२मुले : ११९मुली : २८३- सातवीपर्यंतच्या एकूण शाळा : ५बारावीपर्यंत शाळा : २

‘मराठी’ शाळांकडेच दुर्लक्ष; तर उर्दूचे काय?शहरातीत महापालिकेच्या असणाऱ्या ५३ मराठी माध्यमांच्या शाळांमध्येच गुणवत्तापूर्ण शिक्षण, सेवा, सुविधा मिळण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. वर्गखोल्या, संरक्षण भिंतीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून आवश्यक तितका निधी मिळत नाही. मराठी माध्यमाच्या शाळांची अशी स्थिती असेल तर उर्दू माध्यमातील शाळांकडे कोण पाहणार? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

करिअर, उच्चशिक्षणात संधी कमी असल्याने दहा वर्षांच्या तुलनेत अलीकडे उर्दू माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. म्हणून राज्य शासनाने शाळांमध्ये उर्दू विषय ऐच्छिक करावा. करिअरमध्ये जागतिक पातळीवर प्रचंड स्पर्धा आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजीला महत्त्व आले आहे. म्हणूनही मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकविण्याला प्राधान्य दिले आहे. - आदिल फरास, माजी नगरसेवक, कोल्हापूर 

सातवीनंतर पुढील शिक्षणासाठी उर्दू माध्यमांच्या हायस्कूल जवळपास पुरेशा प्रमाणात नाहीत. म्हणून मुस्लीम समाजातील अनेक कुटुंबांना आपल्या मुलांचे पुढील शिक्षण थांबवावे लागत आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या मुलींची आहे. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळालेच पाहिजे. पण सध्या असे होताना दिसत नाही. - हुमायून मुरसल, अभ्यासक, मुस्लीम समाज, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळाStudentविद्यार्थीMuslimमुस्लीम