शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

उर्दू माध्यमातील निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांची सातवीनंतर सुट्टीच, सर्वाधिक मुलींची संख्या

By भीमगोंड देसाई | Updated: December 20, 2024 12:41 IST

शैक्षणिक भविष्य अंधकारमय, हायस्कूल, कॉलेजची संख्या कमी

भीमगोंडा देसाईकोल्हापूर : शहरातील महापालिकेच्या उर्दू माध्यमात शिकणाऱ्या १०५३ पैकी सातवीनंतर केवळ ४०२ विद्यार्थीच बारावीपर्यंत शिक्षण घेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. निम्याहून अधिक म्हणजे तब्बल ६५१ विद्यार्थी पुढील शिक्षणाला कायमस्वरूपी सुटी देत आहेत. शाळा सोडलेली मुले बालवयातच आई, वडिलांसोबत कष्टाची किंवा फळे, भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करताना दिसतात. मुलींची लग्न करून दिली जातात. हुशार असून, हे विद्यार्थी पुढील शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

राजर्षी शाहू महाराज यांनी त्या काळी सर्व समाजांतील मुले शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी जातीनिहाय वसतिगृह सुरू केली. शिक्षणाला प्रोत्साहन दिले. मात्र काळाच्या ओघात बदल करीत केलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढते आहे. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी काही महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत पहिलीपासून इंग्रजी, सेमी इंग्रजी सुरू केले आहे. या शाळांचा नावलौकिकही आहे. पण उर्दू शाळांमध्ये असा बदल झाला नाही.पाचपैकी एका शाळेत सेमी इंग्रजीचा प्रयोग झाला. पण तो फारसा यशस्वी झाला नाही. म्हणून तब्बल १०५३ विद्यार्थी उर्दू माध्यमातून शिक्षण घेतात. पण सातवीनंतर निम्याहून अधिक विद्यार्थी पुढील शिक्षण घेत नाहीत. बारावीनंतर उर्दूतून पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अधिकृत आकडेवारीही उपलब्ध नाही, इतकी अनास्था शासकीय शिक्षण प्रशासनामध्ये आहे.

उर्दू माध्यमातील विद्यार्थी संख्या..- पहिली ते सातवीपर्यंत : १०५३मुले : ४०७मुली : ६४६- सातवी ते बारावीपर्यंत : ४०२मुले : ११९मुली : २८३- सातवीपर्यंतच्या एकूण शाळा : ५बारावीपर्यंत शाळा : २

‘मराठी’ शाळांकडेच दुर्लक्ष; तर उर्दूचे काय?शहरातीत महापालिकेच्या असणाऱ्या ५३ मराठी माध्यमांच्या शाळांमध्येच गुणवत्तापूर्ण शिक्षण, सेवा, सुविधा मिळण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. वर्गखोल्या, संरक्षण भिंतीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून आवश्यक तितका निधी मिळत नाही. मराठी माध्यमाच्या शाळांची अशी स्थिती असेल तर उर्दू माध्यमातील शाळांकडे कोण पाहणार? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

करिअर, उच्चशिक्षणात संधी कमी असल्याने दहा वर्षांच्या तुलनेत अलीकडे उर्दू माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. म्हणून राज्य शासनाने शाळांमध्ये उर्दू विषय ऐच्छिक करावा. करिअरमध्ये जागतिक पातळीवर प्रचंड स्पर्धा आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजीला महत्त्व आले आहे. म्हणूनही मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकविण्याला प्राधान्य दिले आहे. - आदिल फरास, माजी नगरसेवक, कोल्हापूर 

सातवीनंतर पुढील शिक्षणासाठी उर्दू माध्यमांच्या हायस्कूल जवळपास पुरेशा प्रमाणात नाहीत. म्हणून मुस्लीम समाजातील अनेक कुटुंबांना आपल्या मुलांचे पुढील शिक्षण थांबवावे लागत आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या मुलींची आहे. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळालेच पाहिजे. पण सध्या असे होताना दिसत नाही. - हुमायून मुरसल, अभ्यासक, मुस्लीम समाज, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळाStudentविद्यार्थीMuslimमुस्लीम