शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ५० टन कचरा पंचगंगेत वाहून आला, राजाराम बंधाऱ्याजवळ तटला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:45 IST

कचऱ्यात प्लास्टिकच्या बाटल्यांची संख्या लक्षणीय

रमेश पाटील कसबा बावडा: कोल्हापूर शहर आणि उपनगरात काल, गुरुवारी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे जयंती नाल्यातून वाहून आलेला ५० टनहून अधिक कचरा राजाराम बंधाऱ्याजवळ नदीपात्रात तटला आहे. साधारणता दोन एकराचे क्षेत्रफळ मावेल इतका हा कचरा नदीपात्रात पसरला होता. महापालिकेने जेसीबीच्या साह्याने हा कचरा हटवण्याचे काम तात्काळ सुरू केले असले तरी याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.गुरुवारी दुपारी शहर आणि परिसराला ढगफुटीसदृश्य पावसाने झोडपून काढले. गटारे भरून पाणी रस्त्यावर वाहू लागल्याने रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले. या पाण्यातून मोठ्या प्रमाणात कचराही वाहून आला. कचरा जयंती नाल्याद्वारे पंचगंगा नदीतून वाहत राजाराम बंधारा येथे अडकला. याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महापालिका यंत्रणेला जाग आली.एक जेसीबी, एक डंपर, तीन ट्रॅक्टर आणि काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सुमारे ५० टनाहून अधिक कचरा यावेळी नदीपात्रातून काढण्यात आला. यावेळी बंधार्‍यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यामुळे नेहमी या मार्गावरून जाणाऱ्या लोकांची गैरसोय झाली.जबाबदार कोण ? या कचऱ्यात प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा भरून टाकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोलचे कागद, लाकडं आणि अन्य इतर कचरा मोठ्या प्रमाणात दिसून आला. या कचऱ्याकडे बघितल्यानंतर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.